शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Ganesh Chaturthi 2018; अमरावती जिल्ह्यातील गंगाधरस्वामी मठात १०५५ वर्षांची गणेशपरंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 10:08 IST

जिल्ह्यातल्या नेरपिंगळाई येथील गुरू गंगाधर वीरशैव मठातील ऐतिहासिक गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. शके ८८५ अर्थात इ.स. ९६३ पासून १०५५ वर्षांची या गणेशोत्सवाची परंपरा आहे.

ठळक मुद्देलोटांगणाची परंपरा भाविकांची अपार श्रद्धासर्वधर्म समभावाचे प्रतीक ठरला उत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: जिल्ह्यातल्या नेरपिंगळाई येथील गुरू गंगाधर वीरशैव मठातील ऐतिहासिक गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. शके ८८५ अर्थात इ.स. ९६३ पासून १०५५ वर्षांची या गणेशोत्सवाची परंपरा आहे. येथील विसर्जन सोहळा देखील वैशिष्ट्यपूर्ण असतो. भाविक विसर्जन स्थळापासून मठापर्यंत म्हणजे दीड किमी अंतर दगड-धोंड्यातून लोटांगण घालत येतात. ही दैवी अनुभूती मानली जाते.या मठाच्या स्थापनेची नोंद मठाच्या प्रवेशद्वारावर आजही आहे. बाराव्या शतकातील कल्याणमधील क्रांतीनंतर सर्व शरणार्थी देशाच्या विविध भागात विखुरले गेले. शरणार्थी बालबस्व यांना घेऊन येथे राहत असताना ते अचानक बेपत्ता झाले. ते परत यावेत, यासाठी गणेशाची आराधना केली आणि नवस बोलला. बालबस्व धावत येऊन त्यांना बिलगले. त्यांनी गणेशाची स्थापना केली आणि गणेशोत्सव प्रारंभ केला, अशी आख्यायिका आहे. गणेशाची स्थापना करण्यात आली, त्याठिकाणी आजही विधीवत माती ठेवली जाते. या मातीवर काशीखंड या धार्मिक ग्रंथाचे संस्कार केले जातात. यानंतर अमरावती येथील मूर्तिकार आजणे यांच्याकडून पारंपरिक स्वरूपाची सात ते आठ फूट उंचीची मूर्ती घडविली जाते.मठाधिपतींकडून आस्थेवाईक चौकशीगंगाधर स्वामींच्या काळात शंभराहून अधिक दिंड्या गणेशोत्सवात सहभागी व्हायच्या. आतादेखील दहा दिवस भाविक व गावकऱ्यांना मठातर्फे अन्नदान केले जाते. विद्यमान मठाधिकारी शिवशंकर शिवाचार्य स्वामी पंगतीत फिरून काय हवं-नको, याची विचारपूस करतात.सामाजिक सौहार्दाचे प्रतीकमठाव्यतिरिक्त गावात पन्नासावर गणेश मंडळे आहेत. काही मंडळांचे अध्यक्ष तर मुस्लिम बांधव राहिले आहेत. मठातील आरतीला सर्वधर्मीयांची उपस्थिती असते. विसर्जन सोहळ्याच्या अग्रभागी मठाचा गणपती, मागे मंडळांचा व त्यानंतर घरगुती गणेशमूर्ती असतात. मुस्लिम भागातून जाणाऱ्या

 मिरवणुकीसाठी पिण्याच्या पाण्याची सोय मुस्लिम बांधव करतात. मिरवणुकीत दिंड्या, ढोल-ताशे, भजनी मंडळ व सार्वजनिक देखाव्यांचा समावेश असतो.भाविक घालतात लोटांगणविसर्जन स्थळापासून ते मठापर्यंत मार्गातील दगड-धोंडे पार करून, उन्हाची पर्वा न करता भाविक लोटांगण घालतात. मठातील विहिरीच्या पाण्याने त्यांना अंघोळ घातली जाते व मठाधिपती त्यांना प्रसाद देतात. या लोटांगणादरम्यान कुणालाही इजा होत नाही, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८