शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

Ganesh Chaturthi 2018; अमरावती जिल्ह्यातील गंगाधरस्वामी मठात १०५५ वर्षांची गणेशपरंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 10:08 IST

जिल्ह्यातल्या नेरपिंगळाई येथील गुरू गंगाधर वीरशैव मठातील ऐतिहासिक गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. शके ८८५ अर्थात इ.स. ९६३ पासून १०५५ वर्षांची या गणेशोत्सवाची परंपरा आहे.

ठळक मुद्देलोटांगणाची परंपरा भाविकांची अपार श्रद्धासर्वधर्म समभावाचे प्रतीक ठरला उत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: जिल्ह्यातल्या नेरपिंगळाई येथील गुरू गंगाधर वीरशैव मठातील ऐतिहासिक गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. शके ८८५ अर्थात इ.स. ९६३ पासून १०५५ वर्षांची या गणेशोत्सवाची परंपरा आहे. येथील विसर्जन सोहळा देखील वैशिष्ट्यपूर्ण असतो. भाविक विसर्जन स्थळापासून मठापर्यंत म्हणजे दीड किमी अंतर दगड-धोंड्यातून लोटांगण घालत येतात. ही दैवी अनुभूती मानली जाते.या मठाच्या स्थापनेची नोंद मठाच्या प्रवेशद्वारावर आजही आहे. बाराव्या शतकातील कल्याणमधील क्रांतीनंतर सर्व शरणार्थी देशाच्या विविध भागात विखुरले गेले. शरणार्थी बालबस्व यांना घेऊन येथे राहत असताना ते अचानक बेपत्ता झाले. ते परत यावेत, यासाठी गणेशाची आराधना केली आणि नवस बोलला. बालबस्व धावत येऊन त्यांना बिलगले. त्यांनी गणेशाची स्थापना केली आणि गणेशोत्सव प्रारंभ केला, अशी आख्यायिका आहे. गणेशाची स्थापना करण्यात आली, त्याठिकाणी आजही विधीवत माती ठेवली जाते. या मातीवर काशीखंड या धार्मिक ग्रंथाचे संस्कार केले जातात. यानंतर अमरावती येथील मूर्तिकार आजणे यांच्याकडून पारंपरिक स्वरूपाची सात ते आठ फूट उंचीची मूर्ती घडविली जाते.मठाधिपतींकडून आस्थेवाईक चौकशीगंगाधर स्वामींच्या काळात शंभराहून अधिक दिंड्या गणेशोत्सवात सहभागी व्हायच्या. आतादेखील दहा दिवस भाविक व गावकऱ्यांना मठातर्फे अन्नदान केले जाते. विद्यमान मठाधिकारी शिवशंकर शिवाचार्य स्वामी पंगतीत फिरून काय हवं-नको, याची विचारपूस करतात.सामाजिक सौहार्दाचे प्रतीकमठाव्यतिरिक्त गावात पन्नासावर गणेश मंडळे आहेत. काही मंडळांचे अध्यक्ष तर मुस्लिम बांधव राहिले आहेत. मठातील आरतीला सर्वधर्मीयांची उपस्थिती असते. विसर्जन सोहळ्याच्या अग्रभागी मठाचा गणपती, मागे मंडळांचा व त्यानंतर घरगुती गणेशमूर्ती असतात. मुस्लिम भागातून जाणाऱ्या

 मिरवणुकीसाठी पिण्याच्या पाण्याची सोय मुस्लिम बांधव करतात. मिरवणुकीत दिंड्या, ढोल-ताशे, भजनी मंडळ व सार्वजनिक देखाव्यांचा समावेश असतो.भाविक घालतात लोटांगणविसर्जन स्थळापासून ते मठापर्यंत मार्गातील दगड-धोंडे पार करून, उन्हाची पर्वा न करता भाविक लोटांगण घालतात. मठातील विहिरीच्या पाण्याने त्यांना अंघोळ घातली जाते व मठाधिपती त्यांना प्रसाद देतात. या लोटांगणादरम्यान कुणालाही इजा होत नाही, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८