शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Ganesh Chaturthi 2018; अमरावती जिल्ह्यातील गंगाधरस्वामी मठात १०५५ वर्षांची गणेशपरंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 10:08 IST

जिल्ह्यातल्या नेरपिंगळाई येथील गुरू गंगाधर वीरशैव मठातील ऐतिहासिक गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. शके ८८५ अर्थात इ.स. ९६३ पासून १०५५ वर्षांची या गणेशोत्सवाची परंपरा आहे.

ठळक मुद्देलोटांगणाची परंपरा भाविकांची अपार श्रद्धासर्वधर्म समभावाचे प्रतीक ठरला उत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: जिल्ह्यातल्या नेरपिंगळाई येथील गुरू गंगाधर वीरशैव मठातील ऐतिहासिक गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. शके ८८५ अर्थात इ.स. ९६३ पासून १०५५ वर्षांची या गणेशोत्सवाची परंपरा आहे. येथील विसर्जन सोहळा देखील वैशिष्ट्यपूर्ण असतो. भाविक विसर्जन स्थळापासून मठापर्यंत म्हणजे दीड किमी अंतर दगड-धोंड्यातून लोटांगण घालत येतात. ही दैवी अनुभूती मानली जाते.या मठाच्या स्थापनेची नोंद मठाच्या प्रवेशद्वारावर आजही आहे. बाराव्या शतकातील कल्याणमधील क्रांतीनंतर सर्व शरणार्थी देशाच्या विविध भागात विखुरले गेले. शरणार्थी बालबस्व यांना घेऊन येथे राहत असताना ते अचानक बेपत्ता झाले. ते परत यावेत, यासाठी गणेशाची आराधना केली आणि नवस बोलला. बालबस्व धावत येऊन त्यांना बिलगले. त्यांनी गणेशाची स्थापना केली आणि गणेशोत्सव प्रारंभ केला, अशी आख्यायिका आहे. गणेशाची स्थापना करण्यात आली, त्याठिकाणी आजही विधीवत माती ठेवली जाते. या मातीवर काशीखंड या धार्मिक ग्रंथाचे संस्कार केले जातात. यानंतर अमरावती येथील मूर्तिकार आजणे यांच्याकडून पारंपरिक स्वरूपाची सात ते आठ फूट उंचीची मूर्ती घडविली जाते.मठाधिपतींकडून आस्थेवाईक चौकशीगंगाधर स्वामींच्या काळात शंभराहून अधिक दिंड्या गणेशोत्सवात सहभागी व्हायच्या. आतादेखील दहा दिवस भाविक व गावकऱ्यांना मठातर्फे अन्नदान केले जाते. विद्यमान मठाधिकारी शिवशंकर शिवाचार्य स्वामी पंगतीत फिरून काय हवं-नको, याची विचारपूस करतात.सामाजिक सौहार्दाचे प्रतीकमठाव्यतिरिक्त गावात पन्नासावर गणेश मंडळे आहेत. काही मंडळांचे अध्यक्ष तर मुस्लिम बांधव राहिले आहेत. मठातील आरतीला सर्वधर्मीयांची उपस्थिती असते. विसर्जन सोहळ्याच्या अग्रभागी मठाचा गणपती, मागे मंडळांचा व त्यानंतर घरगुती गणेशमूर्ती असतात. मुस्लिम भागातून जाणाऱ्या

 मिरवणुकीसाठी पिण्याच्या पाण्याची सोय मुस्लिम बांधव करतात. मिरवणुकीत दिंड्या, ढोल-ताशे, भजनी मंडळ व सार्वजनिक देखाव्यांचा समावेश असतो.भाविक घालतात लोटांगणविसर्जन स्थळापासून ते मठापर्यंत मार्गातील दगड-धोंडे पार करून, उन्हाची पर्वा न करता भाविक लोटांगण घालतात. मठातील विहिरीच्या पाण्याने त्यांना अंघोळ घातली जाते व मठाधिपती त्यांना प्रसाद देतात. या लोटांगणादरम्यान कुणालाही इजा होत नाही, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८