शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत आरक्षित जागांचा बिल्डर्सकडून ‘गेम’

By admin | Updated: December 18, 2015 00:42 IST

शहर विकास आराखड्यात आरक्षित जागा काबीज करण्यासाठी न्यायालयाचा आधार घेत बिल्डर्सकडून ‘गेम’ केला जात आहे.

अमरावती : शहर विकास आराखड्यात आरक्षित जागा काबीज करण्यासाठी न्यायालयाचा आधार घेत बिल्डर्सकडून ‘गेम’ केला जात आहे. ‘जागेची रक्कम द्या, अन्यथा त्या परत करा’, अशी भूमिका हल्ली बिल्डर्संनी घेतली आहे. त्याअनुषंगाने सात आरक्षित जागांसाठी १७ कोटी रुपये जमीनमालकांना देण्याबाबतचा प्रस्ताव पुढे आला आहे.महापालिकेने शहर विकास आराखड्यात मंजूर ले-आऊटमध्ये एकूण ५२५ जागा आरक्षित केली आहेत. या आरक्षित जागा निर्धारित कालावधीत विकसित करून संबंधित जमीनमालकाला जागेचा मोबदला देणे अनिवार्य आहे. महापालिकेने निर्धारित कालावधीत आरक्षित जागा विकसित केली नाही तर जमीन मालकाला न्यायालयात धाव घेऊन कलम सहाप्रमाणे १२७ ची नोटीस बजावून आरक्षित जागेचा मोबदला सहा महिन्यांच्या आत मागता येतो. अन्यथा जागेची रक्कम मिळाली नाही तर सदर जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया राबविता येते. त्यानुसार हल्ली महापालिकेत सात आरक्षित जागांचे देय्य रक्कम १७ कोटी रुपयांचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर आणला जाणार आहे. मात्र १७ कोटी रुपये कोठून द्यावे, हा प्रश्न प्रशासनापुढे उभा ठाकला आहे. भूमिअधिग्रहणासाठी शासनाकडून येणारे अनुदान यापूर्वीच खर्च करण्यात आले आहे. मात्र, जमीनमालकांनी आरक्षित जागेचा मोबदला देण्याबाबतची नोटीस बजावल्याने ही रक्कम निर्धारित कालावधीत प्रशासनाने देणे अनिवार्य आहे. त्याकरिता १७ कोटी रुपये देय्य रक्कमेला स्थायी समितीची मान्यता मिळविणे आवश्यक असल्यामुळे प्रशासनाने तशी तयारी चालविली आहे. शनिवारी स्थायी समितीपुढे आरक्षित जागेचा मोबदला देण्यासंदर्भाचा विषय प्रशासनाकडून मांडला जाणार आहे. या प्रस्तावावर स्थायी समिती कोणता निर्णय घेते, हे स्पष्ट होईल. मात्र महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याचे बघून बिल्डर्संनी आरक्षित जागेचा ‘गेम’ वाजविण्याची रणनीती आखल्याचे दिसून येते. परंतु आरक्षित जागा परत जाऊ देणार नाही, असे प्रशासनाचे धोरण आहे. भूसंपादनासाठी पैशाची जुळवाजुळव करण्याची तयारी महापालिकेने केली आहे. (प्रतिनिधी)जागांवर बिल्डर्सची नजरशहरात ५२५ आरक्षित जागांपैकी अनेक जागा मूळ जमिन मालकांना हाताशी धरुन बिल्डर्संनी ताब्यात घेतल्यात. जागेचा मोबदला मिळावा, यासाठी प्रशासनाकडून १४ प्रकरणे स्थायी समितीत सादर केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सात आरक्षित जागा मोबदल्याचे प्रकरण हाताळले जाईल, अशी माहिती आहे. मात्र तिजोरीत पैसा नसल्यामुळे कदाचित या आरक्षित जागा परत गेल्यास वावगे ठरणार नाही. आरक्षित जागांवर बिल्डर्संची नजर असल्याचे चित्र आहे.निर्णयाला निधीचे ‘ब्रेक’शहरात आरक्षित जागा विकसित करण्याचा निर्णय यापूर्वी महापालिका सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. त्यानुसार भूसंपादनासाठी प्रायोगिक तत्त्वावर ५० कोटी रुपये द्यावे, असा प्रस्ताव महापालिकेने राज्य शासनाकडे पाठविला. यावर शासनाने गांभीर्याने विचार केला नाही. त्यामुळे आरक्षित जागा ताब्यात घेण्यासाठी १३ व १४ व्या वित्त अनुदानातून भूसंपादन करण्याचे धोरण प्रशासनाने अवलंबविले. या निर्णयाला निधीअभावी ‘ब्रेक’ लागण्याची दाट शक्यता आहे.भूसंपादनाची १४ प्रकरणे आहेत. पहिल्या टप्प्यात सात प्रकरणे हाताळायची असून त्याकरिता १७ कोटी रुपये अपेक्षित आहेत. मान्यतेसाठी स्थायीपुढे हे प्रकरणे ठेवली जातील. - सुरेंद्र कांबळे, एडीटीपी, महापालिका