शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

सासरी मोरगावात दीपालीवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:14 IST

बडनेरा : महिला वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या मृतदेहावर नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मोरगाव येथे शुक्रवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात ...

बडनेरा : महिला वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या मृतदेहावर नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मोरगाव येथे शुक्रवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या कर्तबगार महिला अधिकाऱ्याचा हृदयद्रावक शेवटाबाबत सर्व नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. संपूर्ण गाव शोकाकुल झाले असून एकाही घरात चूल पेटली नाही.

मेळघाटातील डिजिटल व्हिलेज हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण यांचे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मोरगाव हे सासर आहे. त्यांच्याप्रती गावकऱ्यांमध्ये कौतुकाने बोलले जात होते. अत्यंत मनमिळावू, सर्वांना आपलेसे करणाऱ्या दीपालीचा मृत्यू गावाला चटका लावून गेला. प्रत्येक कार्याप्रसंगी त्या मोरगावात अनेकदा येत होत्या. गावाशी त्यांचे कौटुंबिक नाते जुळले होते. अत्यंत हुशार कर्तबगार म्हणून त्यांचे गावात नावलौकिक आहे. त्यांच्या समाजात एकमेव अधिकारी म्हणून त्या ओळखल्या जात असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

वरिष्ठ वनाधिकाऱ्यांच्या दबावामुळे आत्महत्या केल्याची बाब चर्चेत आल्याने मोरगावात ‘त्या’ वनाधिकाऱ्यांच्या प्रति तीव्र संताप व्यक्त होत आहे. सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास शवविच्छेदनानंतर दीपाली यांचा मृतदेह गावात आणण्यात आला. त्यावेळी गावकऱ्यांनी एकच आक्रोश केला. अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दीपाली चव्हाण यांच्या मृत्यूला जो कुणी कारणीभूत असेल त्यांना कठोर शिक्षा लवकरात लवकर मिळालीच पाहिजे, असा जनआक्रोश या गावात आहे. अंत्यसंस्काराला खासदार नवनीत राणा, चीफ वाइल्ड लाइफ वॉर्डन महाराष्ट्र स्टेट नितीन काकोडकर, वनबलप्रमुख साई प्रकाश, बेलदार समाजाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजू साळुंखे, उपवनसंरक्षक पीयूष जगताप, लोणी पोलीस ठाण्याचे साहायक पोलीस निरीक्षक अहेरकर यांच्यासह पंचक्रोशीतील गावकरी व नातेवाईक हजर होते.

बॉक्स

खासदारांनी दिले आश्वासन

अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी गावकऱ्यांसह नातेवाईकांनी खासदार नवनीत राणा यांच्याकडे केली. आपण स्वत: केंद्रीय कॅबिनेट मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी बोलून रेड्डी यांच्यावर कारवाई करू, असे आश्वासन खासदार नवनीत राणा यांनी गावकऱ्यांना दिले.

बॉक्स

नातेवाईकांचा आक्रोश

रुपाली चव्हाण यांचा मृतदेह मोरगावात शुक्रवारी सायंकाळी आणण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येत त्यांचे नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी पोहोचले होते. मृतदेह येताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. त्यांच्या आईला अश्रू आवरणे कठीण झाले होते. त्यांनीदेखील संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी खसदारांकडे केली.