शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

धामणगावच्या स्वातंत्र्य सेनानींनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात भोगला सहा महिने कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:15 IST

महात्मा गांधी ची सुगनचंद लुनावत यांनी घेतली होती प्रेरणा मोहन राऊत धामणगाव रेल्वे : महात्मा गांधी यांच्या ‘चले जाव’ ...

महात्मा गांधी ची सुगनचंद लुनावत यांनी घेतली होती प्रेरणा

मोहन राऊत

धामणगाव रेल्वे : महात्मा गांधी यांच्या ‘चले जाव’ चळवळीत उडी घेत धामणगावातील स्वातंत्र्य सेनानींनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले. नागपुरात सहा महिने शिक्षा भोगताना अनंत यातना सहन केल्या. त्यांचे स्मरण स्वातंत्र्यदिनी तालुकावासीयांच्या रोमरोमात जाज्वल्य देशभक्तीचे स्फूरण चढविते.

स्वातंत्र्यपूर्व काळात लाखो देशबांधवांनी दिलेल्या बलिदानाच्या पायाभरणीवर स्वातंत्र्याची इमारत उभी आहे. सारे देशभक्त ‘जिंकू किंवा मरू’ या प्रेरणेने लढायला तयार झाले. यात विद्यानगरी म्हणून लौकिकप्राप्त धामणगाव नगरीदेखील मागे नव्हती. सुगनचंद लुणावत, अंबादास भेंडे, बाबासाहेब अंदुरकर, अमरसिंह ठाकूर, नारायण इंगळे, गुलाबराव झाडे यांच्यासह अनेक स्वातंत्र्य सेनानी या नगरीत होऊन गेले. सुगणचंद लुणावत हे महात्मा गांधींनी सांगितलेल्या अहिंसेच्या मार्गाने लढा उभारत असताना सन १९४१ मध्ये त्यांना अटक झाली होती. नागपूर येथील तुरुंगात १२ जानेवारी ते २२ जून १९४१ पर्यंत सहा महिने ठेवण्यात आले. त्यांना तेथे अंबाडीचे बेत तयार करण्याचे काम देण्यात आले होते. लुणावत हे महात्मा गांधी यांच्या म्हणण्याप्रमाणे आमदारकीचा राजीनामा देऊन स्वतंत्र्य लढ्यात सहभागी झाले होते. त्यांनी लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांच्या सोबतीने स्वातंत्र्याकरिता लढा दिला होता. त्याच काळात कावली वसाड येथील स्वातंत्र्य सेनानींनी इंग्रजांविरुद्ध मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. त्यावेळी गुलाबराव झाडे, नारायण इंगळे यांना अटक झाली होती.

धामणगाव तालुक्यातील १०९ सैनिक करतात भारतमातेचे रक्षण

तालुक्यातील युवकांनी स्वातंत्र्योत्तर काळातही देशासाठी योगदान दिले आहे. तालुक्यातील दोन जवान शहीद झाले, तर १०९ सैनिक तिन्ही दलांमध्ये तैनात आहेत. सावळा, निंबोली, शेंदूरजना खुर्द ही गावे आजही सैनिकांची गावे म्हणून ओळखली जातात. जळगाव आर्वीसारख्या दोन हजार लोकसंख्येच्या या गावातील स्वप्निल क्षीरसागर हा २० वर्षाचा युवक देशसेवा करीत आहे. धामणगाव शहरात ११, तर मंगरूळ दस्तगीर येथील आठ सैनिक आहेत. काशीखेड, आसेगाव, निंभोरा बोडका, वरूड बगाजी, ढाकुलगाव, रायपूर कासरखेड, वकनाथ, नारगावंडी, बोरगाव निस्ताने, पिंपळखुटा, झाडगाव, वाढोणा येथील अनेक जवान सैन्यदलात सामील होऊन भारतमातेची सेवा करीत आहेत.