शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संक्रमितांचे आठ दिवसात चार उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 05:00 IST

या आठ दिवसांत कोरोना संक्रमितांचे तीन उच्चांक स्थापित झाले. यामध्ये २८ ऑगस्टला २०६ संक्रमित निष्पन्न झाले, ही तोपर्यतची सर्वाधिक संख्या होती. हा उच्चांक ३ सप्टेंबरला मोडीत निघाला. या दिवशी २१८ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. त्यानंतर ५ सप्टेंबरला २२७ व ६ ला २६८ रुग्णांची नोंद झाली. ही संख्या कोरोना संसर्ग काळातील सर्वाधिक संख्या असल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे.

ठळक मुद्दे६ सप्टेंबरला सर्वाधिक २६८ रुग्ण : कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस चिंताजनक वाढ

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढतच आहे. आठ दिवसांत संक्रमित रुग्णांचे चार उच्चांक स्थापित झाले. ६ सप्टेंबरला झालेली २६८ रुग्णांची नोंद ही पाच महिन्यांच्या संक्रमण काळातील सर्वाधिक संख्या आहे. सप्टेंबरच्या पहिल्या सहा दिवसांत विक्रमी १०५४ कोरोनाग्रस्तांच्या नोंदीनेदेखील जिल्ह्याची चिंता वाढविली आहे.या आठ दिवसांत कोरोना संक्रमितांचे तीन उच्चांक स्थापित झाले. यामध्ये २८ ऑगस्टला २०६ संक्रमित निष्पन्न झाले, ही तोपर्यतची सर्वाधिक संख्या होती. हा उच्चांक ३ सप्टेंबरला मोडीत निघाला. या दिवशी २१८ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. त्यानंतर ५ सप्टेंबरला २२७ व ६ ला २६८ रुग्णांची नोंद झाली. ही संख्या कोरोना संसर्ग काळातील सर्वाधिक संख्या असल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे.जिल्ह्यात ४ एप्रिलला झालेल्या पहिल्या कोरोनाग्रस्ताच्या नोंदीनंतरच्या पाच महिन्यात जिल्ह्यात तब्बल ७००४ कोरोनाग्रस्त निष्पन्न झाले आहेत. जिल्ह्यात ४ एप्रिलला १ रुग्ण, त्यानंतरच्या १० दिवसात फक्त ५ रुग्णांची भर पडली. १ मे रोजी ४० रुग्ण म्हणजेच जिल्ह्यातील कोरोना संक्रमण काळाच्या पहिल्या महिन्यात कोरोनाचे फक्त ४० रुग्ण होते. त्यानंतर १५ मेपर्यत ५० रुग्णांची भर पडल्याने ९० झालेत. त्यानंतर मात्र रुग्णसंख्या वाढायला लागली. नंतरच्या १५ दिवसांत १ जुलै रोजी ५६९ रुग्णसंख्या झाली. पहिल्या एक हजार कोरोनाग्रस्ताची नोंद १५ जुलै रोजी झाली. त्यानंतर १ ऑगस्टला २१५७ रुग्णांची नोंद झाली होती.लॉकडाऊन-३ च्या शिथिलतेनंतर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढायला लागला. यामध्ये ५ ऑगस्टला २५९८ रुग्ण, १० ऑगस्टला ३१६८ रुग्ण, १५ ऑगस्टला ३५५८ संक्रमित, २० ऑगस्टला ४१३९ रुग्ण, २५ ऑगस्टला कोरोनाग्रस्तांची संख्या ४६८७ वर पोहोचली. यानंतर जिल्ह्यात कोरोनाच्या उदे्रकाला सुरुवात झाली. रोज कोेरोनाचा ब्लास्ट व्हायला लागला. ऑगष्ट महिन्याअखेर जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ५५९२ वर पोहोचली व ६ सप्टेंबरला ७००४ झाली असल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे.रिकव्हरी रेट ७५.२८ जिल्हयात कोरोना संसर्गाच्या पाच महिन्यांत ६७३६ कोरोनाग्रस्ताची नोंद झाली. त्यातुलनेत आतापर्यंत ५२७३ रुग्णांना उपचारानंतर बरे वाटल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. या काळात त्यांना १४ दिवस गृहविलगीकरणात राहावे लागणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पाच दिवसांत ७८५ कोरोनाग्रस्तांना संक्रमणमुक्त करण्यात आलेले आहे. एकूण कोरोनाग्रस्तांचे प्रमाण ७५.२८टक्के आहे. जिल्ह्यात ८० टक्क्यांवर रुग्ण असिम्टमॅटीक असल्याने जिल्ह्याचा रिकव्हरी रेटदेखील अन्य जिल्ह्याच्या तुलनेत जास्त असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या