शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

कोरोना संक्रमितांचे आठ दिवसात चार उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 05:00 IST

या आठ दिवसांत कोरोना संक्रमितांचे तीन उच्चांक स्थापित झाले. यामध्ये २८ ऑगस्टला २०६ संक्रमित निष्पन्न झाले, ही तोपर्यतची सर्वाधिक संख्या होती. हा उच्चांक ३ सप्टेंबरला मोडीत निघाला. या दिवशी २१८ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. त्यानंतर ५ सप्टेंबरला २२७ व ६ ला २६८ रुग्णांची नोंद झाली. ही संख्या कोरोना संसर्ग काळातील सर्वाधिक संख्या असल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे.

ठळक मुद्दे६ सप्टेंबरला सर्वाधिक २६८ रुग्ण : कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस चिंताजनक वाढ

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढतच आहे. आठ दिवसांत संक्रमित रुग्णांचे चार उच्चांक स्थापित झाले. ६ सप्टेंबरला झालेली २६८ रुग्णांची नोंद ही पाच महिन्यांच्या संक्रमण काळातील सर्वाधिक संख्या आहे. सप्टेंबरच्या पहिल्या सहा दिवसांत विक्रमी १०५४ कोरोनाग्रस्तांच्या नोंदीनेदेखील जिल्ह्याची चिंता वाढविली आहे.या आठ दिवसांत कोरोना संक्रमितांचे तीन उच्चांक स्थापित झाले. यामध्ये २८ ऑगस्टला २०६ संक्रमित निष्पन्न झाले, ही तोपर्यतची सर्वाधिक संख्या होती. हा उच्चांक ३ सप्टेंबरला मोडीत निघाला. या दिवशी २१८ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. त्यानंतर ५ सप्टेंबरला २२७ व ६ ला २६८ रुग्णांची नोंद झाली. ही संख्या कोरोना संसर्ग काळातील सर्वाधिक संख्या असल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे.जिल्ह्यात ४ एप्रिलला झालेल्या पहिल्या कोरोनाग्रस्ताच्या नोंदीनंतरच्या पाच महिन्यात जिल्ह्यात तब्बल ७००४ कोरोनाग्रस्त निष्पन्न झाले आहेत. जिल्ह्यात ४ एप्रिलला १ रुग्ण, त्यानंतरच्या १० दिवसात फक्त ५ रुग्णांची भर पडली. १ मे रोजी ४० रुग्ण म्हणजेच जिल्ह्यातील कोरोना संक्रमण काळाच्या पहिल्या महिन्यात कोरोनाचे फक्त ४० रुग्ण होते. त्यानंतर १५ मेपर्यत ५० रुग्णांची भर पडल्याने ९० झालेत. त्यानंतर मात्र रुग्णसंख्या वाढायला लागली. नंतरच्या १५ दिवसांत १ जुलै रोजी ५६९ रुग्णसंख्या झाली. पहिल्या एक हजार कोरोनाग्रस्ताची नोंद १५ जुलै रोजी झाली. त्यानंतर १ ऑगस्टला २१५७ रुग्णांची नोंद झाली होती.लॉकडाऊन-३ च्या शिथिलतेनंतर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढायला लागला. यामध्ये ५ ऑगस्टला २५९८ रुग्ण, १० ऑगस्टला ३१६८ रुग्ण, १५ ऑगस्टला ३५५८ संक्रमित, २० ऑगस्टला ४१३९ रुग्ण, २५ ऑगस्टला कोरोनाग्रस्तांची संख्या ४६८७ वर पोहोचली. यानंतर जिल्ह्यात कोरोनाच्या उदे्रकाला सुरुवात झाली. रोज कोेरोनाचा ब्लास्ट व्हायला लागला. ऑगष्ट महिन्याअखेर जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ५५९२ वर पोहोचली व ६ सप्टेंबरला ७००४ झाली असल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे.रिकव्हरी रेट ७५.२८ जिल्हयात कोरोना संसर्गाच्या पाच महिन्यांत ६७३६ कोरोनाग्रस्ताची नोंद झाली. त्यातुलनेत आतापर्यंत ५२७३ रुग्णांना उपचारानंतर बरे वाटल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. या काळात त्यांना १४ दिवस गृहविलगीकरणात राहावे लागणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पाच दिवसांत ७८५ कोरोनाग्रस्तांना संक्रमणमुक्त करण्यात आलेले आहे. एकूण कोरोनाग्रस्तांचे प्रमाण ७५.२८टक्के आहे. जिल्ह्यात ८० टक्क्यांवर रुग्ण असिम्टमॅटीक असल्याने जिल्ह्याचा रिकव्हरी रेटदेखील अन्य जिल्ह्याच्या तुलनेत जास्त असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या