शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

चार मोठे प्रकल्प शंभर टक्क्यांच्या वाटेवर; नऊ मोठ्या प्रकल्पांना ८२.८४ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 17:58 IST

पश्चिम विदर्भात दमदार पाऊस

- संदीप मानकर

अमरावती : गत तीन ते चार दिवसांपासून पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये दमदार पावसामुळे पश्चिम विदर्भातील नऊ मोठ्या प्रकल्पांपैकी चार सिंचन प्रकल्प शंभर टक्क्यांच्या वाटेवर आहेत, तसेच नऊ मोठ्या प्रकल्पांत सरासरी ८२.८४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. 

अमरावती जिल्ह्यातील एकमेव मोठा प्रकल्प असलेला ऊर्ध्व वर्धा प्रकल्पांत ९३.९० टक्के पाणीसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्पात सर्वाधिक ९६.६६ टक्के पाणीसाठा आहे. बेंबळा प्रकल्पात ९१.७२ टक्के, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात ८९.९० टक्के पाणीसाठा आहे. सदर चार प्रकल्प लवकरच शंभरी गाठतील, असा विश्वास जलसंपदा विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे या भागातील पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची सुविधेचा प्रश्न मिटला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अरुणावती प्रकल्पात ५५.३३ टक्के पाणीसाठा आहे. अकोेला जिल्ह्यातील वान सिंचन प्रकल्पात ४६.३७ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात ५९.८८ टक्के, पेनटाकळी ८२.६९ टक्के, खडकपूर्णा प्रकल्पात ७७.५७ टक्के पाणीसाठा आहे. 

चार धरणातून नदीपात्रात विसर्ग

यंदा परतीचा दमदार पाऊस कोसळत असल्याने चार धरणांतून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहेत. यामध्ये ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाचे पाच दरवाजे १५ सेंमीने उघडण्यात आले. यवतमाळ  जिल्ह्यातील बेंबळा प्रकल्पाचे दोन दरवाजे २० सेंमीने उघडण्यात आले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पाचे दोन दरवाजे १० सेंमीटरने, तर खडकपूर्णा प्रकल्पातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे धरण परिसरात काही हौशी पर्यटकांनीसुद्धा गर्दी केली आहे. 

आठ मध्यम प्रकल्पांनी गाठली शंभरी

पश्चिम विदर्भातील २५ मध्यम प्रकल्पांत सरासरी ७६.०८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये आठ मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. यामुळे त्या त्या जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील सायखेडा, बोरगाव, नवरगाव, वाशिम जिल्ह्यातील सोनल, एकबुर्जी, बुलडाणा जिल्ह्यातील मस, उतावळी, अकोला जिल्ह्यातील मोर्णा  आदी मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. चार प्रकल्पांचे दरवाजे उघडण्यात आले असून, पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

टॅग्स :WaterपाणीRainपाऊसAmravatiअमरावती