शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
2
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
3
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
5
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
6
भारतात अनेकदा आले, पण पुतिन पाकमध्ये एकदाही का गेले नाहीत?; जाणकारांनी केला मोठा खुलासा
7
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
8
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
9
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
10
पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण
11
'वैभव'शाही वर्ष! १४ वर्षांच्या पोरानं MS धोनी-विराटला मागे टाकत सेट केला आपला ट्रेंड
12
"इम्रान खान 'वेडा', त्याची विधाने देशाविरोधी अन् चिथावणीखोर"; पाकिस्तान आर्मीचा मोठा दावा
13
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
14
IND vs SA वनडेआधी मोठी दुर्घटना टळली, फॅन्सच्या गर्दीमुळे होती चेंगराचेंगरीची भीती (VIDEO)
15
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
16
Indigo Crisis: भावाचा मृत्यू, मृतदेह कोलकात्यात; कुटुंबीय विमान रद्द झाल्याने मुंबईत अडकले...
17
“मशिदीला आक्षेप नाही, धार्मिक कारणांसाठी मंदिरे तोडली नाहीत”; शंकराचार्य नेमके काय म्हणाले?
18
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
19
Viral Video : 'क्या खूब लगती हो...'; गाण्यावर रील बनवताना घसरून धपकन पडली महिला, व्हिडीओ बघून लोक म्हणाले-
20
उर्मिला मातोंडकरसोबत जास्त सिनेमे, दोघांचं होतं अफेअर? राम गोपाल वर्मांनी सोडलं मौन; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

चार लाख नियमित शेतकरी कर्जमाफीपासून वंचित; थकबाकीदारांना न्याय, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 18:04 IST

पश्चिम विदर्भात तीन लाख ९६ हजार ६७५ नियमित कर्जदार शेतकरी आहेत.

- गजानन मोहोड

अमरावती : राज्य शासनाने दोन लाखांपर्यंत थकबाकीदार शेतक-यांची कर्जमाफी शनिवारी जाहीर केली. यामध्ये १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत उचल केलेल्या एकापेक्षा जास्त कर्जखात्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. यामुळे थकबाकीदार शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, पश्चिम विदर्भात तीन लाख ९६ हजार ६७५ नियमित कर्जदार शेतकरी आहेत. त्यांना कर्जमाफीऐवजी प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळणार असल्याने त्यांच्यात नाराजी आहे.

एकापेक्षा अधिक कर्जखात्यांत अल्पमुदती पीककर्ज व या कर्जाच्या पुनर्गठित खात्यांची ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत असलेली थकबाकी व परतफेड न केलेली रक्कम २ लाखांपेक्षा कमी असल्यास अशा सर्व खात्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. यापूर्वीच्या सरकारने ३० जून २०१६ पर्यंत दीड लाखांची थकबाकी असलेल्या शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ दिला होता.

या योजनत नियमित शेतकरी खातेदार प्रतीक्षेतच राहिले होते. या शेतक-यांना केवळ २५ हजारांपर्यंत प्रोत्साहन योजनेचा लाभ देण्यात आला. कर्जाचा एकरकमी भरणा करणा-यांनादेखील अशाच पद्धतीने लाभ देण्यात आलेला आहे. सध्याच्या शासनानेदेखील हीच भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे राज्यातील नव्या सरकारकडून नियमित शेतक-यांना कर्जमाफीची अपेक्षा होती. मात्र, याविषयी कोणतीही घोषणा न झाल्याने त्यांच्यात आता शासनाप्रती असंतोष आहे. 

तीनही कर्जमाफीत नियमित कर्जदार डावललेआतापर्यंत तीन वेळा म्हणजेच सन २००८, सन २०१७ व यंदा झालेल्या कर्जमाफीत केवळ थकबाकीदार शेतक-यांनाचा लाभ झालेला आहे. यंदा अवकाळी पावसाने सोयाबीन व कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे नियमित कर्जदार शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेले आहेत. कर्जाची परतफेड कशी करावी, ही विवंचना त्यांच्यासमोर आहे. या सर्व शेतक-यांनाही कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणी होत आहे.जिल्हानिहाय नियमित कर्जदार शेतकरीअमरावती जिल्ह्यात ४९ हजार ९०२, अकोला जिल्ह्यात ५३ हजार ४०, वाशीम जिल्ह्यात ३६ हजार १५२, बुलडाणा जिल्ह्यात ५२ हजार ६१९ व यवतमाळ जिल्ह्यात १ लाख ९६ हजार ६७५ असे एकूण ३ लाख ९६ हजार ५७५ नियमित कर्जदार आहेत. यामध्ये जिल्हा बँकेचे १ लाख ७६ हजार २९८, राष्ट्रीयीकृत बँकांचे २ लाख २ हजार ८७२ व ग्रामीण बँकांचे १७ हजार ४०५ शेतकरी नियमित कर्जदार आहेत. या खातेदारांना प्रोत्साहन योजनेचा लाभ देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीFarmerशेतकरी