शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
3
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
5
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
6
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
7
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
8
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
9
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
10
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
11
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
12
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
13
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
14
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
15
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
16
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
17
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
18
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
19
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
20
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल

चार लाख नियमित शेतकरी कर्जमाफीपासून वंचित; थकबाकीदारांना न्याय, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 18:04 IST

पश्चिम विदर्भात तीन लाख ९६ हजार ६७५ नियमित कर्जदार शेतकरी आहेत.

- गजानन मोहोड

अमरावती : राज्य शासनाने दोन लाखांपर्यंत थकबाकीदार शेतक-यांची कर्जमाफी शनिवारी जाहीर केली. यामध्ये १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत उचल केलेल्या एकापेक्षा जास्त कर्जखात्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. यामुळे थकबाकीदार शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, पश्चिम विदर्भात तीन लाख ९६ हजार ६७५ नियमित कर्जदार शेतकरी आहेत. त्यांना कर्जमाफीऐवजी प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळणार असल्याने त्यांच्यात नाराजी आहे.

एकापेक्षा अधिक कर्जखात्यांत अल्पमुदती पीककर्ज व या कर्जाच्या पुनर्गठित खात्यांची ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत असलेली थकबाकी व परतफेड न केलेली रक्कम २ लाखांपेक्षा कमी असल्यास अशा सर्व खात्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. यापूर्वीच्या सरकारने ३० जून २०१६ पर्यंत दीड लाखांची थकबाकी असलेल्या शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ दिला होता.

या योजनत नियमित शेतकरी खातेदार प्रतीक्षेतच राहिले होते. या शेतक-यांना केवळ २५ हजारांपर्यंत प्रोत्साहन योजनेचा लाभ देण्यात आला. कर्जाचा एकरकमी भरणा करणा-यांनादेखील अशाच पद्धतीने लाभ देण्यात आलेला आहे. सध्याच्या शासनानेदेखील हीच भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे राज्यातील नव्या सरकारकडून नियमित शेतक-यांना कर्जमाफीची अपेक्षा होती. मात्र, याविषयी कोणतीही घोषणा न झाल्याने त्यांच्यात आता शासनाप्रती असंतोष आहे. 

तीनही कर्जमाफीत नियमित कर्जदार डावललेआतापर्यंत तीन वेळा म्हणजेच सन २००८, सन २०१७ व यंदा झालेल्या कर्जमाफीत केवळ थकबाकीदार शेतक-यांनाचा लाभ झालेला आहे. यंदा अवकाळी पावसाने सोयाबीन व कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे नियमित कर्जदार शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेले आहेत. कर्जाची परतफेड कशी करावी, ही विवंचना त्यांच्यासमोर आहे. या सर्व शेतक-यांनाही कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणी होत आहे.जिल्हानिहाय नियमित कर्जदार शेतकरीअमरावती जिल्ह्यात ४९ हजार ९०२, अकोला जिल्ह्यात ५३ हजार ४०, वाशीम जिल्ह्यात ३६ हजार १५२, बुलडाणा जिल्ह्यात ५२ हजार ६१९ व यवतमाळ जिल्ह्यात १ लाख ९६ हजार ६७५ असे एकूण ३ लाख ९६ हजार ५७५ नियमित कर्जदार आहेत. यामध्ये जिल्हा बँकेचे १ लाख ७६ हजार २९८, राष्ट्रीयीकृत बँकांचे २ लाख २ हजार ८७२ व ग्रामीण बँकांचे १७ हजार ४०५ शेतकरी नियमित कर्जदार आहेत. या खातेदारांना प्रोत्साहन योजनेचा लाभ देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीFarmerशेतकरी