शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

चार लाख नियमित शेतकरी कर्जमाफीपासून वंचित; थकबाकीदारांना न्याय, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 18:04 IST

पश्चिम विदर्भात तीन लाख ९६ हजार ६७५ नियमित कर्जदार शेतकरी आहेत.

- गजानन मोहोड

अमरावती : राज्य शासनाने दोन लाखांपर्यंत थकबाकीदार शेतक-यांची कर्जमाफी शनिवारी जाहीर केली. यामध्ये १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत उचल केलेल्या एकापेक्षा जास्त कर्जखात्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. यामुळे थकबाकीदार शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, पश्चिम विदर्भात तीन लाख ९६ हजार ६७५ नियमित कर्जदार शेतकरी आहेत. त्यांना कर्जमाफीऐवजी प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळणार असल्याने त्यांच्यात नाराजी आहे.

एकापेक्षा अधिक कर्जखात्यांत अल्पमुदती पीककर्ज व या कर्जाच्या पुनर्गठित खात्यांची ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत असलेली थकबाकी व परतफेड न केलेली रक्कम २ लाखांपेक्षा कमी असल्यास अशा सर्व खात्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. यापूर्वीच्या सरकारने ३० जून २०१६ पर्यंत दीड लाखांची थकबाकी असलेल्या शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ दिला होता.

या योजनत नियमित शेतकरी खातेदार प्रतीक्षेतच राहिले होते. या शेतक-यांना केवळ २५ हजारांपर्यंत प्रोत्साहन योजनेचा लाभ देण्यात आला. कर्जाचा एकरकमी भरणा करणा-यांनादेखील अशाच पद्धतीने लाभ देण्यात आलेला आहे. सध्याच्या शासनानेदेखील हीच भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे राज्यातील नव्या सरकारकडून नियमित शेतक-यांना कर्जमाफीची अपेक्षा होती. मात्र, याविषयी कोणतीही घोषणा न झाल्याने त्यांच्यात आता शासनाप्रती असंतोष आहे. 

तीनही कर्जमाफीत नियमित कर्जदार डावललेआतापर्यंत तीन वेळा म्हणजेच सन २००८, सन २०१७ व यंदा झालेल्या कर्जमाफीत केवळ थकबाकीदार शेतक-यांनाचा लाभ झालेला आहे. यंदा अवकाळी पावसाने सोयाबीन व कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे नियमित कर्जदार शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेले आहेत. कर्जाची परतफेड कशी करावी, ही विवंचना त्यांच्यासमोर आहे. या सर्व शेतक-यांनाही कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणी होत आहे.जिल्हानिहाय नियमित कर्जदार शेतकरीअमरावती जिल्ह्यात ४९ हजार ९०२, अकोला जिल्ह्यात ५३ हजार ४०, वाशीम जिल्ह्यात ३६ हजार १५२, बुलडाणा जिल्ह्यात ५२ हजार ६१९ व यवतमाळ जिल्ह्यात १ लाख ९६ हजार ६७५ असे एकूण ३ लाख ९६ हजार ५७५ नियमित कर्जदार आहेत. यामध्ये जिल्हा बँकेचे १ लाख ७६ हजार २९८, राष्ट्रीयीकृत बँकांचे २ लाख २ हजार ८७२ व ग्रामीण बँकांचे १७ हजार ४०५ शेतकरी नियमित कर्जदार आहेत. या खातेदारांना प्रोत्साहन योजनेचा लाभ देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीFarmerशेतकरी