शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

पश्चिम विदर्भातील चार मोठे प्रकल्प शंभर टक्क्यांच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 12:28 IST

पश्चिम विदर्भातील नऊ मोठ्या प्रकल्पांपैकी चार सिंचन प्रकल्प शंभर टक्क्यांच्या वाटेवर आहेत, तसेच नऊ मोठ्या प्रकल्पांत सरासरी ८२.८४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

ठळक मुद्देनऊ मोठ्या प्रकल्पांना ८२.८४ टक्के पाणीसाठा पश्चिम विदर्भात दमदार पाऊस

संदीप मानकरलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गत तीन ते चार दिवसांपासून पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये दमदार पावसामुळे पश्चिम विदर्भातील नऊ मोठ्या प्रकल्पांपैकी चार सिंचन प्रकल्प शंभर टक्क्यांच्या वाटेवर आहेत, तसेच नऊ मोठ्या प्रकल्पांत सरासरी ८२.८४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

अमरावती जिल्ह्यातील एकमेव मोठा प्रकल्प असलेला ऊर्ध्व वर्धा प्रकल्पांत ९३.९० टक्के पाणीसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्पात सर्वाधिक ९६.६६ टक्के पाणीसाठा आहे. बेंबळा प्रकल्पात ९१.७२ टक्के, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात ८९.९० टक्के पाणीसाठा आहे. सदर चार प्रकल्प लवकरच शंभरी गाठतील, असा विश्वास जलसंपदा विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे या भागातील पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची सुविधेचा प्रश्न मिटला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अरुणावती प्रकल्पात ५५.३३ टक्के पाणीसाठा आहे. अकोेला जिल्ह्यातील वान सिंचन प्रकल्पात ४६.३७ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात ५९.८८ टक्के, पेनटाकळी ८२.६९ टक्के, खडकपूर्णा प्रकल्पात ७७.५७ टक्के पाणीसाठा आहे.

चार धरणातून नदीपात्रात विसर्गयंदा परतीचा दमदार पाऊस कोसळत असल्याने चार धरणांतून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहेत. यामध्ये ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाचे पाच दरवाजे १५ सेंमीने उघडण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा प्रकल्पाचे दोन दरवाजे २० सेंमीने उघडण्यात आले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पाचे दोन दरवाजे १० सेंमीटरने, तर खडकपूर्णा प्रकल्पातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे धरण परिसरात काही हौशी पर्यटकांनीसुद्धा गर्दी केली आहे.आठ मध्यम प्रकल्पांनी गाठली शंभरीपश्चिम विदर्भातील २५ मध्यम प्रकल्पांत सरासरी ७६.०८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये आठ मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. यामुळे त्या त्या जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील सायखेडा, बोरगाव, नवरगाव, वाशिम जिल्ह्यातील सोनल, एकबुर्जी, बुलडाणा जिल्ह्यातील मस, उतावळी, अकोला जिल्ह्यातील मोर्णा आदी मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. चार प्रकल्पांचे दरवाजे उघडण्यात आले असून, पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

टॅग्स :WaterपाणीDamधरण