शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागाला उष्माघात कक्षाचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 05:01 IST

मागील काही दिवसांपासून उन्ह - पावसाचा खेळ सुरू आहे. ग्रामीण भागात खरिपाच्या तयारीला वेग आला आहे. शेतकरी उन्हातान्हात शेतात राबताना उष्माघाताच्या घटना नेहमी घडतात. अशात उष्माघाताने मूत्यू झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दिवसेंदिवस उन्हाची काहीली वाढत आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : प्राथमिक आरोग्य केंद्राकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन व उष्माघाताने कुणाचाही मृत्यू होऊ नये, यासाठी दरवर्षी जिल्हा परिषदआरोग्य विभागाकडून प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष स्थापन केले जातात. मात्र, यंदा मे महिन्याचा पहिला आठवडा उलटूनही आरोग्य विभागाला उष्माघात कक्ष स्थापनेचा मुहूर्त मिळाला नसल्याने याचा विसर पडला की काय, असे दिसून येत आहे.मागील काही दिवसांपासून उन्ह - पावसाचा खेळ सुरू आहे. ग्रामीण भागात खरिपाच्या तयारीला वेग आला आहे. शेतकरी उन्हातान्हात शेतात राबताना उष्माघाताच्या घटना नेहमी घडतात. अशात उष्माघाताने मूत्यू झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दिवसेंदिवस उन्हाची काहीली वाढत आहे. या उन्हाचा फटका नागरिकांना बसू नये म्हणून दरर्षी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघाताच्या रुग्णांसाठी स्वतंत्र उष्माघात कक्ष स्थापन करण्यात येतो. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे. ग्रामीण भागात वरूड, अमरावती, अचलपूर तालुक्यातील काही गावात व शहरात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे हा अपवाद वगळला तर ग्रामीण भागात कोरोनाचा फै लाव सध्या तरी कमी असल्याचे यावरुन दिसून येते. तरीसुद्धा उष्माघात कक्षाची स्थापन न केल्याने आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. दरवर्षी उष्माघाताच्या रुग्णांसाठी स्वतंत्र दोन खाटांचा कक्ष व आवश्यक सोई सुविधा उपलब्ध केल्या जातात. शिवाय कूलरची व्यवस्था, औषधी व आपात्कालीन स्थितीत देण्यात येणारा औषधांचा साठा तयार ठेवावा लागतो. परंतु यंदा आरोग्य विभागाला सर्व माफ तर नाही ना!, असा प्रश्न ग्रामीण भागात उपस्थित केला जात आहे.केव्हा निघणार मुहूर्त?'सध्या कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. दुसरीकडे ग्रामीण भागात खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकरी खरिपाच्या तयारीला भर उन्हात शेतात राबराब राबत आहेत. अशातच वाढत्या तापमाणात उन्हात काम करणाऱ्या एखादा व्यक्तीला उष्माघात झाल्यास तातडीने उपचारासाठी प्राथमित आरोग्य केंद्रातील उष्माघात कक्ष आरोग्यासाठी फायदेशीर ठरत असतो. परंतु हे कक्षच कार्यान्वित नसल्याने याला मुहूर्त कधी निघणार, हा प्रश्न उभा ठाकला आहे.सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील आहे. अशातच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उष्माघात कक्ष तातडीने कार्यन्वित करण्यासाठी संबंधित तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना आदेश दिले जातील.- डॉ.दिलीप रणमले,जिल्हा आरोग्य अधिकारी, अमरावती

टॅग्स :zpजिल्हा परिषदHealthआरोग्य