शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
4
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
5
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
6
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
7
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
8
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
9
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
10
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
11
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
12
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
13
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
14
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
15
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
16
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
17
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
18
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
19
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
20
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?

आरोग्य विभागाला उष्माघात कक्षाचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 05:01 IST

मागील काही दिवसांपासून उन्ह - पावसाचा खेळ सुरू आहे. ग्रामीण भागात खरिपाच्या तयारीला वेग आला आहे. शेतकरी उन्हातान्हात शेतात राबताना उष्माघाताच्या घटना नेहमी घडतात. अशात उष्माघाताने मूत्यू झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दिवसेंदिवस उन्हाची काहीली वाढत आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : प्राथमिक आरोग्य केंद्राकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन व उष्माघाताने कुणाचाही मृत्यू होऊ नये, यासाठी दरवर्षी जिल्हा परिषदआरोग्य विभागाकडून प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष स्थापन केले जातात. मात्र, यंदा मे महिन्याचा पहिला आठवडा उलटूनही आरोग्य विभागाला उष्माघात कक्ष स्थापनेचा मुहूर्त मिळाला नसल्याने याचा विसर पडला की काय, असे दिसून येत आहे.मागील काही दिवसांपासून उन्ह - पावसाचा खेळ सुरू आहे. ग्रामीण भागात खरिपाच्या तयारीला वेग आला आहे. शेतकरी उन्हातान्हात शेतात राबताना उष्माघाताच्या घटना नेहमी घडतात. अशात उष्माघाताने मूत्यू झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दिवसेंदिवस उन्हाची काहीली वाढत आहे. या उन्हाचा फटका नागरिकांना बसू नये म्हणून दरर्षी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघाताच्या रुग्णांसाठी स्वतंत्र उष्माघात कक्ष स्थापन करण्यात येतो. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे. ग्रामीण भागात वरूड, अमरावती, अचलपूर तालुक्यातील काही गावात व शहरात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे हा अपवाद वगळला तर ग्रामीण भागात कोरोनाचा फै लाव सध्या तरी कमी असल्याचे यावरुन दिसून येते. तरीसुद्धा उष्माघात कक्षाची स्थापन न केल्याने आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. दरवर्षी उष्माघाताच्या रुग्णांसाठी स्वतंत्र दोन खाटांचा कक्ष व आवश्यक सोई सुविधा उपलब्ध केल्या जातात. शिवाय कूलरची व्यवस्था, औषधी व आपात्कालीन स्थितीत देण्यात येणारा औषधांचा साठा तयार ठेवावा लागतो. परंतु यंदा आरोग्य विभागाला सर्व माफ तर नाही ना!, असा प्रश्न ग्रामीण भागात उपस्थित केला जात आहे.केव्हा निघणार मुहूर्त?'सध्या कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. दुसरीकडे ग्रामीण भागात खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकरी खरिपाच्या तयारीला भर उन्हात शेतात राबराब राबत आहेत. अशातच वाढत्या तापमाणात उन्हात काम करणाऱ्या एखादा व्यक्तीला उष्माघात झाल्यास तातडीने उपचारासाठी प्राथमित आरोग्य केंद्रातील उष्माघात कक्ष आरोग्यासाठी फायदेशीर ठरत असतो. परंतु हे कक्षच कार्यान्वित नसल्याने याला मुहूर्त कधी निघणार, हा प्रश्न उभा ठाकला आहे.सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील आहे. अशातच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उष्माघात कक्ष तातडीने कार्यन्वित करण्यासाठी संबंधित तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना आदेश दिले जातील.- डॉ.दिलीप रणमले,जिल्हा आरोग्य अधिकारी, अमरावती

टॅग्स :zpजिल्हा परिषदHealthआरोग्य