शहरं
Join us  
Trending Stories
1
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
2
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
3
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
4
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
5
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
6
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
7
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
8
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
9
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
10
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
11
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
12
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
13
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
14
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
15
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
16
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
17
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
18
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
19
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
20
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण

आरोग्य विभागाला उष्माघात कक्षाचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 05:01 IST

मागील काही दिवसांपासून उन्ह - पावसाचा खेळ सुरू आहे. ग्रामीण भागात खरिपाच्या तयारीला वेग आला आहे. शेतकरी उन्हातान्हात शेतात राबताना उष्माघाताच्या घटना नेहमी घडतात. अशात उष्माघाताने मूत्यू झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दिवसेंदिवस उन्हाची काहीली वाढत आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : प्राथमिक आरोग्य केंद्राकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन व उष्माघाताने कुणाचाही मृत्यू होऊ नये, यासाठी दरवर्षी जिल्हा परिषदआरोग्य विभागाकडून प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष स्थापन केले जातात. मात्र, यंदा मे महिन्याचा पहिला आठवडा उलटूनही आरोग्य विभागाला उष्माघात कक्ष स्थापनेचा मुहूर्त मिळाला नसल्याने याचा विसर पडला की काय, असे दिसून येत आहे.मागील काही दिवसांपासून उन्ह - पावसाचा खेळ सुरू आहे. ग्रामीण भागात खरिपाच्या तयारीला वेग आला आहे. शेतकरी उन्हातान्हात शेतात राबताना उष्माघाताच्या घटना नेहमी घडतात. अशात उष्माघाताने मूत्यू झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दिवसेंदिवस उन्हाची काहीली वाढत आहे. या उन्हाचा फटका नागरिकांना बसू नये म्हणून दरर्षी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघाताच्या रुग्णांसाठी स्वतंत्र उष्माघात कक्ष स्थापन करण्यात येतो. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे. ग्रामीण भागात वरूड, अमरावती, अचलपूर तालुक्यातील काही गावात व शहरात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे हा अपवाद वगळला तर ग्रामीण भागात कोरोनाचा फै लाव सध्या तरी कमी असल्याचे यावरुन दिसून येते. तरीसुद्धा उष्माघात कक्षाची स्थापन न केल्याने आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. दरवर्षी उष्माघाताच्या रुग्णांसाठी स्वतंत्र दोन खाटांचा कक्ष व आवश्यक सोई सुविधा उपलब्ध केल्या जातात. शिवाय कूलरची व्यवस्था, औषधी व आपात्कालीन स्थितीत देण्यात येणारा औषधांचा साठा तयार ठेवावा लागतो. परंतु यंदा आरोग्य विभागाला सर्व माफ तर नाही ना!, असा प्रश्न ग्रामीण भागात उपस्थित केला जात आहे.केव्हा निघणार मुहूर्त?'सध्या कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. दुसरीकडे ग्रामीण भागात खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकरी खरिपाच्या तयारीला भर उन्हात शेतात राबराब राबत आहेत. अशातच वाढत्या तापमाणात उन्हात काम करणाऱ्या एखादा व्यक्तीला उष्माघात झाल्यास तातडीने उपचारासाठी प्राथमित आरोग्य केंद्रातील उष्माघात कक्ष आरोग्यासाठी फायदेशीर ठरत असतो. परंतु हे कक्षच कार्यान्वित नसल्याने याला मुहूर्त कधी निघणार, हा प्रश्न उभा ठाकला आहे.सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील आहे. अशातच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उष्माघात कक्ष तातडीने कार्यन्वित करण्यासाठी संबंधित तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना आदेश दिले जातील.- डॉ.दिलीप रणमले,जिल्हा आरोग्य अधिकारी, अमरावती

टॅग्स :zpजिल्हा परिषदHealthआरोग्य