शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पीक विमा कंपनीच्या सर्व्हेअरद्वारा ५२ शेतकऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: May 22, 2024 21:36 IST

चिंचपूर येथील प्रकार उघड : ‘त्या’ शेतकऱ्यांना परतावा देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

अमरावती : बाधित शेतकऱ्यांना पीक विम्याचा परतावा न मिळाल्याने ओरड सुरू असतानाच शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा नवा प्रकार समोर आला आहे. धामणगाव तालुक्यातील चिंचपूर येथील बाधित ५२ शेतकऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या सर्व्हेअरनेच केल्या आहेत. हा प्रकार १७ मे रोजीच्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत उघड झाला व कंपनीच्या प्रतिनिधीने जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष मान्य केला.

पीक विमा कंपनीचे काही सर्व्हेअर बाधित पिकांचे पंचनामे करताना शेतकऱ्यांना पैशांची मागणी करीत असल्याचे प्रकार यापूर्वी उघडकीस आले. ज्या शेतकऱ्यांनी पैसे दिले नाहीत, त्या शेतकऱ्यांचे नुकसान कमी दाखविण्याचा प्रतापही काही सर्व्हेअरद्वारा करण्यात आलेला आहे. पीक विम्याच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बहुतांश सर्व्हेअरची पात्रता निकष पूर्ण नसल्याचे यापूर्वीच्या बैठकांमध्ये स्पष्ट झालेले आहे.

धामणगाव रेल्वे तालुक्यातील मौजा चिंचपूर येथील बाधित ५२ शेतकऱ्यांच्या पिकांचा सर्व्हे करताना सर्व्हेअरने पीक नुकसानीचे पंचनाम्यावर शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी घेतल्याच नाही. याऐवजी त्याने स्व:तीच स्वाक्षरी मारली व यामध्ये ० ये ५ टक्केच नुकसान दाखविल्याने शेतकरी भरपाईपासून वंचित राहिले आहेत. याबाबत जिल्हा समितीचे सचिव व एसएओ राहुल सातपुते यांनी ही बाब समिती अध्यक्ष जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या निदर्शनात आणली. त्यामुळे १५ दिवसांत परतावा देण्याचे आदेश त्यांनी कंपनीला दिले आहेत.----------------जिल्हाधिकाऱ्यांनी दिले परताव्याचे आदेशधामणगाव तालुक्यातील या सर्व्हेअरने ज्या महसूल मंडळात सर्व्हेक्षणाचे काम केले आहे. अशा मंडळातील सर्व शेतकऱ्यांच्या पूर्वसूचनांची पुन्हा तपासणी करून दोन आठवड्यांच्या आत नुकसान भरपाई देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. शिवाय तालुक्यात प्राप्त पूर्वसूचना झालेला सर्व्हे, पात्र, अपात्र पूर्वसूचना आदी माहिती तालुका कार्यालयाच्या बोर्डवर लावण्याचे आदेश दिले----------------नांदगाव तालुक्यातही उघड झाला प्रकारनांदगाव तालुक्यात कंपनीद्वारा ‘पेरील नॉट कव्हर, पोस्ट सर्व्हे इनर्लिजिबल, पेरील नॉट अकुअर्ड’ आदी कारणे दर्शवित सूचना नाकारल्या. प्रत्यक्षात पाऊस पडल्यावर शेतकऱ्यांनी टोल फ्री क्रमांकावरून सूचना दिली असता ‘नुकसानीपूर्वी सूचना नोंदविली’ या सदराखाली नाकारली. या पूर्वसूचनांची फेरतपासणी करून १५ दिवसांत परतावा देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.-----------------चांदूरबाजार तालुक्यात फळ पीक विम्याचा ट्रिगर बदललाचांदूरबाजार तालुक्यात २४ ते २६ जानेवारीदरम्यान थंडीची लाट होती, मात्र हवामान केंद्राभोवती शेकोटी पेटविल्याने व केंद्राच्या कम्पाउंडला २०० वॅटचा बल्ब लावल्याने तापमान आकडेवारीत फरक पडला व फळ पीक विम्याचा ट्रिगर लागला नाही. त्यामुळे लगतच्या शिरजगाव कसबा केंद्राची आकडेवारी ग्राह्य धरण्याबाबत शासनाला प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.------------------जिल्हास्तरीय पीक विमा समितीच्या बैठकीत समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी पीक विमा कंपनीला विविध निर्देश दिले आहेत. ते सर्व कंपनीला पाठविण्यात आलेले आहेत.- राहुल सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी