शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

वने अन् वन्यजीव वाऱ्यावर; वनाधिकारी निवडणूक कर्तव्यावर, महसूल यंत्रणेकडून अत्यावश्यक सेवेला छेद

By गणेश वासनिक | Updated: April 6, 2024 18:58 IST

निवडणूक आयोगाने ७ जून २०२३ रोजी देशभरातील मुख्य सचिवांना आदेशाद्वारे अत्यावश्यक सेवेतील लोकसेवकांना निवडणुकीच्या कामी लावण्याबाबत सूट दिलेली आहे. यामध्ये २३ विभागांच्या समावेश आहे.

अमरावती : भारत निवडणूक आयोगाने अत्यावश्यक सेवेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना निवडणूक कार्यात कर्तव्य बजावण्यापासून दूर ठेवावे, असे आदेश आहेत. तरीही राज्यात अत्यावश्यक सेवेतील वनविभागातील सुमारे २०० वनाधिकाऱ्यांना निवडणूक कार्यात जुंपल्यामुळे वने आणि वन्यजीव संरक्षणावर मोठा परिणाम होत असल्याचे चित्र आहे.

निवडणूक आयोगाने ७ जून २०२३ रोजी देशभरातील मुख्य सचिवांना आदेशाद्वारे अत्यावश्यक सेवेतील लोकसेवकांना निवडणुकीच्या कामी लावण्याबाबत सूट दिलेली आहे. यामध्ये २३ विभागांच्या समावेश आहे. वनविभाग, वैद्यकीय विभाग, आयुर्वेदिक, आकाशवाणी, दूरदर्शन, अन्न व औषधी प्रशासन, व्यावसायिक बँका, लोकसेवा आयोग, दूरसंचार, एलआयसी, पोलिस, अग्निशमन अशा विभागांना वगळण्यात आले आहे. राज्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी सप्टेंबर २०१९ मध्ये क्षेत्रीय वनाधिकारी, वनपरिक्षेत्राधिकारी, वनपाल, वनरक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूकविषयक कामातून वगळण्यात आले आहे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. तरीही वनविभागातील वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना यंदा लोकसभा निवडणुकीच्या कर्तव्यावर नेमण्यात आले आहे.

आगीचा हंगाम, वन्यजीवांची तस्करीची शक्यतावनविभाग अत्यावश्यक सेवेत मोडले जात असताना निवडणूक विभागाने प्रादेशिक आणि वन्यजीव विभागांतील वनाधिकाऱ्यांना लोकसभा निवडणुकीच्या कर्तव्यावर नेमले आहे. हल्ली आगीचा हंगाम सुरू असून, जंगल वाऱ्यावर असल्यामुळे वनसंपदा, वन्यजीवांची मोठ्या प्रमाणात तस्करी होण्याची दाट शक्यता आहे. वनाधिकाऱ्यांची निवडणूक कर्तव्यावर नेमणूक झाल्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना होत आहे. आरएफओ, वनपाल, वनरक्षकांची नेमणूक करण्यात आल्यामुळे जंगलाचे संरक्षण करणार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे.

विभागीय वनाधिकाऱ्यांना बनवले केंद्राध्यक्षअमरावती सामाजिक वनीकरणाचे विभागीय वनाधिकारी शरद करे यांची केंद्राध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. निवडणूक कर्तव्यावर पदानुसार अधिकाऱ्यांच्या नेमणूक करणे क्रमप्राप्त आहे. विभागीय वनाधिकारी हे पद जिल्हास्तरीय असून, ते अपर जिल्हाधिकारी या पदाचे समकक्ष आहे. असे असताना सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विभागीय वनाधिकाऱ्यांची केंद्राध्यक्षपदी नेमणूक करून अफलातून कारभाराची प्रचिती दिली आहे. केंद्राध्यक्षपदी वर्ग ३च्या कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाते. परंतु, पदानुसार निवडणूक कर्तव्यावर नेमणूक न झाल्याबाबत अनेक उदाहरण समोर येत आहे. विभागीय वनाधिकारी शरद करे यांनी केंद्राध्यक्षपदी झालेली नेमणूक रद्द करावी, यासाठी निवडणूक विभागाला पत्र दिले आहे. परंतु, याकडे अद्यापही दुर्लक्ष आहे. 

टॅग्स :forest departmentवनविभागElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग