शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

चंद्रमौळी झोपडीत अन्न सुरक्षेचा लाभ!

By admin | Updated: January 19, 2016 00:09 IST

मागिल २५ वर्षांपासून अतिक्रमित जागेवर उभारलेल्या चंद्रमौळी झोेपडीत भाकरीचा चंद्र शोधणाऱ्या पालघर कुटुंबांना ...

प्रतीक्षा २५ वर्षांची : बच्चू कडूंचे प्रयत्न, पुनर्वसन करणारनरेंद्र जावरे  परतवाडामागिल २५ वर्षांपासून अतिक्रमित जागेवर उभारलेल्या चंद्रमौळी झोेपडीत भाकरीचा चंद्र शोधणाऱ्या पालघर कुटुंबांना शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेचा लाभ व रेशन कार्ड सारखे महत्त्वपूर्ण दस्तऐवज आ. बच्चू कडू यांच्या हस्ते देण्यात आलेत.परतवाडा शहरातील अंजनगाव स्टॉपवर शासकीय जागेवर मागील २५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून मदारी, मोघ्या या विमुक्त भटक्या जमातीच्या नागरिकांनी बस्तान मांडले आहे. मध्य प्रदेशसह इतर राज्यातील ते मूळ रहिवासी असले तरी त्यांना शासकीय सुविधांचा कुठलाच लाभ देण्यात आला नाही. परिणामी जवळपास ६२ कुटुंबातील २०० वर सदस्य शासन योजनेपासून वंचित असल्याचे अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्या लक्षात आले. त्यांनी या चंद्रमौळी झोपडीत उघड्यावर जीवन कंठणाऱ्या कुटुंबांची संपूर्ण माहिती मागवली. अन्न सुरक्षेतून धान्य वाटपशासन रेशनकार्ड धारकांना कमी दरात गहू, तांदूळ, साखर आदी धान्य पुरविते. मात्र, मागील २५ वर्षांपासून उघड्यावर बस्तान मांडलेल्या या कुटुंबांची शासन दप्तरी नोंदच नव्हती. त्यामुळेच ते अन्न सुरक्षा योजनेपासून वंचित होते. अचलपूरचे तहसीलदार मनोज लोणारकर यांनी या संपूर्ण कुटुंबांची माहिती मागवून यादी तयार केली. त्यांना सर्वप्रथम अन्नसुरक्षा योजनेचा लाभ देण्याचे आ. कडू यांनी सांगितले. त्यानुसार त्यांचे रेशनकार्ड बनविण्यात आले. त्यानंतर २ रूपये प्रतिकिलो दराने गहू, तीन रूपये प्रतीकिलो तांदूळप्रमाणे धान्याचा ६२ पैकी १४ कुटुंबांना लाभ देण्यात आला. मतदानाचा अधिकारही बजावणार!२५ वर्षांपासून यातील अनेक कुटूंब मतदानापासून वंचित असल्याची बाब उघडकीस येताच त्यांचे रेशनकार्ड, आधार कार्ड, शून्य रकमेवर बँक खाते काढण्यात आले. त्यांना मतदान कार्डचे वितरणही करण्यात आले. आता हे वंचित मतदानाचा हक्कही बजावतील. मुलांचा शाळेत दाखलाभटक्या समाजातील हे नागरिक गावोगावी पोटाची खळगी भरण्यासाठी सतत भटकंती करीत असात. पाठीवर बिऱ्हाड असल्याने यांची मुले शिक्षणापासून वंचित असल्याची बाब पुढे आली. ही शाळाबाह्य मुले असली तरी त्यांची नावे वेगवेगळ्या शाळांमध्ये दाखल असून मुले शाळेत न जाता भंगार, प्लास्टिक गोळा करताना आढळतात. या मुलांना आता दररोज शाळेत पाठविण्याची अट घालण्यात आली आहे. अनेकांची नावे नव्याने शाळेत दाखल करण्यात आलीत.सार्वजनिक नळ, पुनर्वसनाच्या हालचाली२५ वर्षांपासून मध्यवस्तीतील अंजनगाव स्टॉप परिसरात भटक्यांची वस्ती आहे. त्यांच्या झोेपडीपर्यंत आजवर कुणाचीच नजर गेली नाही. परिणामी वीज, पाणी, रस्ता, आरोग्य, शिक्षण या मूलभूत सुविधाही त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत. आ.कडुंच्या प्रयत्नातून त्यांना आता या सुविधा मिळणार आहेत. तुर्तास पालिकेला तहसील प्रशासनाने सार्वजनिक नळ देण्याचे पत्र दिले आहे. शासनाच्या सहकार्याने त्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे.