शहरं
Join us  
Trending Stories
1
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
2
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
3
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
4
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
5
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
6
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
7
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
8
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
9
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
10
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
11
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
12
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
13
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
14
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
15
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या यशानंतर लक्ष्यला लागली मोठी लॉटरी, धर्मा प्रॉडक्शनचा चौथा सिनेमा केला साइन
16
Nashik Crime: 'कोणी लागत नाही नादी', पोलिसांना आव्हान माजी नगरसेवक पवन पवारविरोधात गुन्हा
17
ट्रम्प यांच्या भाषणावेळी इस्रायली संसदेत घोषणाबाजी, 'नरसंहार'चे पोस्टर फडकावले, गाझा समर्थक दोन खासदारांना बाहेर काढले
18
"अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"; RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस थेटच बोलले...
19
अजित पवारांच्या तंबीनंतरही आमदार संग्राम जगताप यांचे पुन्हा वादग्रस्त विधान, आता काय म्हणाले?
20
IND vs WI 2nd Test Day 4 Stumps : मॅच टीम इंडियाचीच! पण चौथ्या दिवशी वेस्ट इंडिज टीम जिंकली

चंद्रमौळी झोपडीत अन्न सुरक्षेचा लाभ!

By admin | Updated: January 19, 2016 00:09 IST

मागिल २५ वर्षांपासून अतिक्रमित जागेवर उभारलेल्या चंद्रमौळी झोेपडीत भाकरीचा चंद्र शोधणाऱ्या पालघर कुटुंबांना ...

प्रतीक्षा २५ वर्षांची : बच्चू कडूंचे प्रयत्न, पुनर्वसन करणारनरेंद्र जावरे  परतवाडामागिल २५ वर्षांपासून अतिक्रमित जागेवर उभारलेल्या चंद्रमौळी झोेपडीत भाकरीचा चंद्र शोधणाऱ्या पालघर कुटुंबांना शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेचा लाभ व रेशन कार्ड सारखे महत्त्वपूर्ण दस्तऐवज आ. बच्चू कडू यांच्या हस्ते देण्यात आलेत.परतवाडा शहरातील अंजनगाव स्टॉपवर शासकीय जागेवर मागील २५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून मदारी, मोघ्या या विमुक्त भटक्या जमातीच्या नागरिकांनी बस्तान मांडले आहे. मध्य प्रदेशसह इतर राज्यातील ते मूळ रहिवासी असले तरी त्यांना शासकीय सुविधांचा कुठलाच लाभ देण्यात आला नाही. परिणामी जवळपास ६२ कुटुंबातील २०० वर सदस्य शासन योजनेपासून वंचित असल्याचे अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्या लक्षात आले. त्यांनी या चंद्रमौळी झोपडीत उघड्यावर जीवन कंठणाऱ्या कुटुंबांची संपूर्ण माहिती मागवली. अन्न सुरक्षेतून धान्य वाटपशासन रेशनकार्ड धारकांना कमी दरात गहू, तांदूळ, साखर आदी धान्य पुरविते. मात्र, मागील २५ वर्षांपासून उघड्यावर बस्तान मांडलेल्या या कुटुंबांची शासन दप्तरी नोंदच नव्हती. त्यामुळेच ते अन्न सुरक्षा योजनेपासून वंचित होते. अचलपूरचे तहसीलदार मनोज लोणारकर यांनी या संपूर्ण कुटुंबांची माहिती मागवून यादी तयार केली. त्यांना सर्वप्रथम अन्नसुरक्षा योजनेचा लाभ देण्याचे आ. कडू यांनी सांगितले. त्यानुसार त्यांचे रेशनकार्ड बनविण्यात आले. त्यानंतर २ रूपये प्रतिकिलो दराने गहू, तीन रूपये प्रतीकिलो तांदूळप्रमाणे धान्याचा ६२ पैकी १४ कुटुंबांना लाभ देण्यात आला. मतदानाचा अधिकारही बजावणार!२५ वर्षांपासून यातील अनेक कुटूंब मतदानापासून वंचित असल्याची बाब उघडकीस येताच त्यांचे रेशनकार्ड, आधार कार्ड, शून्य रकमेवर बँक खाते काढण्यात आले. त्यांना मतदान कार्डचे वितरणही करण्यात आले. आता हे वंचित मतदानाचा हक्कही बजावतील. मुलांचा शाळेत दाखलाभटक्या समाजातील हे नागरिक गावोगावी पोटाची खळगी भरण्यासाठी सतत भटकंती करीत असात. पाठीवर बिऱ्हाड असल्याने यांची मुले शिक्षणापासून वंचित असल्याची बाब पुढे आली. ही शाळाबाह्य मुले असली तरी त्यांची नावे वेगवेगळ्या शाळांमध्ये दाखल असून मुले शाळेत न जाता भंगार, प्लास्टिक गोळा करताना आढळतात. या मुलांना आता दररोज शाळेत पाठविण्याची अट घालण्यात आली आहे. अनेकांची नावे नव्याने शाळेत दाखल करण्यात आलीत.सार्वजनिक नळ, पुनर्वसनाच्या हालचाली२५ वर्षांपासून मध्यवस्तीतील अंजनगाव स्टॉप परिसरात भटक्यांची वस्ती आहे. त्यांच्या झोेपडीपर्यंत आजवर कुणाचीच नजर गेली नाही. परिणामी वीज, पाणी, रस्ता, आरोग्य, शिक्षण या मूलभूत सुविधाही त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत. आ.कडुंच्या प्रयत्नातून त्यांना आता या सुविधा मिळणार आहेत. तुर्तास पालिकेला तहसील प्रशासनाने सार्वजनिक नळ देण्याचे पत्र दिले आहे. शासनाच्या सहकार्याने त्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे.