शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रमौळी झोपडीत अन्न सुरक्षेचा लाभ!

By admin | Updated: January 19, 2016 00:09 IST

मागिल २५ वर्षांपासून अतिक्रमित जागेवर उभारलेल्या चंद्रमौळी झोेपडीत भाकरीचा चंद्र शोधणाऱ्या पालघर कुटुंबांना ...

प्रतीक्षा २५ वर्षांची : बच्चू कडूंचे प्रयत्न, पुनर्वसन करणारनरेंद्र जावरे  परतवाडामागिल २५ वर्षांपासून अतिक्रमित जागेवर उभारलेल्या चंद्रमौळी झोेपडीत भाकरीचा चंद्र शोधणाऱ्या पालघर कुटुंबांना शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेचा लाभ व रेशन कार्ड सारखे महत्त्वपूर्ण दस्तऐवज आ. बच्चू कडू यांच्या हस्ते देण्यात आलेत.परतवाडा शहरातील अंजनगाव स्टॉपवर शासकीय जागेवर मागील २५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून मदारी, मोघ्या या विमुक्त भटक्या जमातीच्या नागरिकांनी बस्तान मांडले आहे. मध्य प्रदेशसह इतर राज्यातील ते मूळ रहिवासी असले तरी त्यांना शासकीय सुविधांचा कुठलाच लाभ देण्यात आला नाही. परिणामी जवळपास ६२ कुटुंबातील २०० वर सदस्य शासन योजनेपासून वंचित असल्याचे अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्या लक्षात आले. त्यांनी या चंद्रमौळी झोपडीत उघड्यावर जीवन कंठणाऱ्या कुटुंबांची संपूर्ण माहिती मागवली. अन्न सुरक्षेतून धान्य वाटपशासन रेशनकार्ड धारकांना कमी दरात गहू, तांदूळ, साखर आदी धान्य पुरविते. मात्र, मागील २५ वर्षांपासून उघड्यावर बस्तान मांडलेल्या या कुटुंबांची शासन दप्तरी नोंदच नव्हती. त्यामुळेच ते अन्न सुरक्षा योजनेपासून वंचित होते. अचलपूरचे तहसीलदार मनोज लोणारकर यांनी या संपूर्ण कुटुंबांची माहिती मागवून यादी तयार केली. त्यांना सर्वप्रथम अन्नसुरक्षा योजनेचा लाभ देण्याचे आ. कडू यांनी सांगितले. त्यानुसार त्यांचे रेशनकार्ड बनविण्यात आले. त्यानंतर २ रूपये प्रतिकिलो दराने गहू, तीन रूपये प्रतीकिलो तांदूळप्रमाणे धान्याचा ६२ पैकी १४ कुटुंबांना लाभ देण्यात आला. मतदानाचा अधिकारही बजावणार!२५ वर्षांपासून यातील अनेक कुटूंब मतदानापासून वंचित असल्याची बाब उघडकीस येताच त्यांचे रेशनकार्ड, आधार कार्ड, शून्य रकमेवर बँक खाते काढण्यात आले. त्यांना मतदान कार्डचे वितरणही करण्यात आले. आता हे वंचित मतदानाचा हक्कही बजावतील. मुलांचा शाळेत दाखलाभटक्या समाजातील हे नागरिक गावोगावी पोटाची खळगी भरण्यासाठी सतत भटकंती करीत असात. पाठीवर बिऱ्हाड असल्याने यांची मुले शिक्षणापासून वंचित असल्याची बाब पुढे आली. ही शाळाबाह्य मुले असली तरी त्यांची नावे वेगवेगळ्या शाळांमध्ये दाखल असून मुले शाळेत न जाता भंगार, प्लास्टिक गोळा करताना आढळतात. या मुलांना आता दररोज शाळेत पाठविण्याची अट घालण्यात आली आहे. अनेकांची नावे नव्याने शाळेत दाखल करण्यात आलीत.सार्वजनिक नळ, पुनर्वसनाच्या हालचाली२५ वर्षांपासून मध्यवस्तीतील अंजनगाव स्टॉप परिसरात भटक्यांची वस्ती आहे. त्यांच्या झोेपडीपर्यंत आजवर कुणाचीच नजर गेली नाही. परिणामी वीज, पाणी, रस्ता, आरोग्य, शिक्षण या मूलभूत सुविधाही त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत. आ.कडुंच्या प्रयत्नातून त्यांना आता या सुविधा मिळणार आहेत. तुर्तास पालिकेला तहसील प्रशासनाने सार्वजनिक नळ देण्याचे पत्र दिले आहे. शासनाच्या सहकार्याने त्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे.