शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

कर्जमुक्तीसाठी वऱ्हाडात हवे पाच हजार कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 14:56 IST

पश्चिम विदर्भात कर्जमाफी योजनेंतर्गत दोन लाखांपर्यंत थकबाकीदार असलेले ७ लाख १३ हजार ६०९ शेतकरी निष्पन्न झालेत.

गजानन मोहोड

अमरावती -  पश्चिम विदर्भात कर्जमाफी योजनेंतर्गत दोन लाखांपर्यंत थकबाकीदार असलेले ७ लाख १३ हजार ६०९ शेतकरी निष्पन्न झालेत. त्यांच्याकडे ४९७० कोटी ९६ लाख ८२ हजार रुपयांची थकबाकी आहे. मात्र, यापैकी १४ हजार ८३३ शेतकऱ्यांनी अद्याप बँक खाते आधार लिंक केलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कर्जमुक्तीमध्ये बाधा येणार आहे.

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत ३० सप्टेंबर २०१९ रोजी थकीत असलेले आणि १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत घेतलेले अल्पमुदती पीककर्ज आणि पीक पुनर्गठित कर्ज माफ होणार आहे. कर्जमुक्तीची रक्कम राज्य शासनामार्फत शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत बँक अधिकाऱ्यांद्वारा १ ते २८ रकान्यांच्या प्रपत्रात शेतकऱ्यांची माहिती भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या महिन्याच्या अखेरीस यासाठी शासनाचे पोर्टल सुरू होणार आहे. यामध्ये एकदा पोर्टलवर माहिती 'अपलोड' झाल्यावर त्यात बँकास्तरावर बदल करता येणार नाही. त्यामुळे बँकांनी शेतकऱ्यांचा आधार क्रमांक व बँक खात्याचा तपशील आदी माहिती अचूक पोर्टलवर नोंदविण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी यापूर्वीच दिले आहे.

या कर्जमुक्ती योजनेसाठी ५ लाख ६२ हजार २९७ शेतकऱ्यांनी बँक खाते आधार संलग्न केले आहे. बुधवारी १ लाख ३५ हजार ८२५ शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया केली असली तरी अद्यापही १४ हजार ८३३ शेतकऱ्यांनी आधार बँक खात्याशी लिंक केलेले नाहीत. यासर्व शेतकऱ्यांची यादी सोसायटी, बँकास्तरावर लावल्याची माहिती सहकार विभागाने दिली.

 पश्चिम विदर्भाची सद्यस्थिती (लाखांत)

जिल्हा            खातेदार           थकबाकी        आधार बाकीअमरावती      १५११७५          ११७७३३.००        ४०९४अकोला         ११३८४९           ७७५८४.४३        १७८२यवतमाळ      १३७९१५          ८३३१२.६३         ५२४७बुलडाणा       २००९४०          १४०७४४.००       २६०४वाशीम          १०९७३०          ७७७२२.२६        ११०६एकूण            ७१३६०९         ४९७०९६.००       १४८३३

योजनेच्या लाभासाठी १ ते २८ कॉलममध्ये माहिती भरण्यात येत आहे. १ तारखेला पोर्टल सुरू झाल्यावर योजनेच्या निकषानुसार पात्र शेतकऱ्यांची माहिती त्यात भरली जाईल.

- संदीप जाधव, जिल्हा उपनिबंधक, अमरावती 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAmravatiअमरावती