शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

रतनपूर ग्रामपंचायतीचे पाच सदस्य अपात्र

By admin | Updated: January 9, 2016 00:33 IST

विहित मुदतीत निवडणूक खर्च सादर न करणे व खर्चा संदर्भात खोट्या पोचपावत्या सादर केल्याचे सिद्ध झाल्याने चांदूर बाजार तालुक्यामधील

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : खोट्या पावत्या लावणे भोवलेअमरावती : विहित मुदतीत निवडणूक खर्च सादर न करणे व खर्चा संदर्भात खोट्या पोचपावत्या सादर केल्याचे सिद्ध झाल्याने चांदूर बाजार तालुक्यामधील रतनपूर (सायखेड) ग्रापंच्या पाच सदस्यांना जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी गुरुवारी अपात्र घोषित केले. पाच वर्षाच्या कालावधीसाठी त्यांना निवडणूक लढविता येणार नाही. रतनपूर ग्राम पंचायतीचे मंगला प्रमोद धाकडे, प्रमोद उत्तमराव धाकडे, शकुंतला धामदास ढोवळे, किरण वैकुंठराव ढोबळे, शीला अनिल जवंजाळ यांच्यावर अपात्रतेची कारवाई जिल्हाधिकाऱ्यांनी केली. याच गावातील प्रफुल्ल वामनराव ढोबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात मुंबई ग्राम पंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ ब अंतर्गत विवाद अर्ज दाखल केला होता.पोचपावत्या खोट्याअमरावती : या प्रकरणात अर्जदार व गैरअर्जदाराचे अभियोक्ता यांनी युक्तिवाद केला. तसेच चांदूरबाजार तहसीलदार यांनी अहवाल सादर केला. यामध्ये रतनपूर ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक सन २०१२ मध्ये घेण्यात आली व ग्राम पंचायत खर्च सादर केल्याविषयी गैरअर्जदारांच्या निवडणूक खर्चाचे हिशोबाची दप्तरी तपासणी केली असता कोणतेही दस्तावेज आढळले नाही. मात्र अर्जदारांनी निवडणूक खर्चाचे पोचपावत्या लावल्यात व १६ डिसेंबरचे युक्तीवादात निवडणूक खर्चा सादर केला. परंतु पोचपावत्या घेतल्या नसल्याचे नमूद केले. यावरुन निष्कर्ष असे निघतात की गैर अर्जदारांनी प्रकरणात लावलेल्या पोचपावत्या ह्या खोट्या असल्याचे सिद्ध होते व विहित मुदतीत निवडणूक खर्चाचे हिशोब सादर केले नाही, असे निर्विवादपणे स्पष्ट होते, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात स्पष्ट केले आहे. इंदला ग्रा.पं.चे उपसरपंच अपात्र तीन अपत्य असल्याचे कारणावरुन अमरावती तालुक्यामधील इंदला ग्रामपंचायतीचे उपसरपंच अय्यास खान मीर मोहम्मद खान यांना अप्पर जिल्हाधिकारी के. आर. परदेशी यांनी अपात्र घोषित केले