शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल फ्रॉड, हे भाजपाला ८००,९०० जागाही देतील"; संजय राऊतांचा आरोप
2
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
3
खळबळजनक! नांदेडमध्ये मशीन गनचे ३९१ राऊंड कालव्यात सापडले
4
साप्ताहिक राशीभविष्य : ७ राशींना धनलाभ होणार, शुभवार्ता समजणार; सुख-समृद्धीचा काळ!
5
"गौतम गंभीरनं टीम इंडियाच्या कोचपदासाठी अर्ज केला असेल तर...", गांगुलींचं रोखठोक मत
6
धक्कादायक! मद्यधुंद अवस्थेत रवीना टंडनने केली वृद्ध महिलेला मारहाण? मध्यरात्री नेमकं काय घडलं?
7
Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
8
अमेरिकेकडून कॅनडाचा धुव्वा! ६ तारखेला USA vs PAK लढत; नेटकऱ्यांनी शेजाऱ्यांची उडवली खिल्ली
9
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
10
'सुशांत नाही तर...', 'पवित्र रिश्ता'ला 15 वर्षे पुर्ण होताच अंकिता लोखंडे झाली भावूक
11
T20 WC, USA vs CAN: यजमानांचा दबदबा! १० सिक्स आणि ४ फोर; एकट्या 'जोन्स'ने कॅनडाला घाम फोडला
12
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
13
सातवा टप्पाही पूर्ण; निकालाची प्रतीक्षा; ८,३६० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
14
'मी केदारनाथला गेल्यावर..'; सुशांतच्या बहिणीची भावूक पोस्ट, फोटो शेअर करत सांगितलं खास कनेक्शन
15
किती खरे आणि किती खोटे ठरले यापूर्वीचे ‘एक्झिट पाेल’?, मतदानानंतर सर्वांचे असते याकडे लक्ष
16
T20 WC 2024: ऑस्ट्रेलिया नाही! पण भारत फायनल खेळणार; 'युवी'ने सांगितला खेळ भावनांचा
17
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
18
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
19
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
20
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार

पाच घरे जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 10:06 PM

अंजनगाव सुर्जीपासून सात किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कापूसतळणीत शनिवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. यात पाच घरे जळून खाक झाली. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

ठळक मुद्देकापूसतळणी येथे अग्निप्रकोप : संसार उघड्यावर, चुलीतील राखडीने लागली आग

लोकमत न्यूज नेटवर्कवनोजाबाग : अंजनगाव सुर्जीपासून सात किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कापूसतळणीत शनिवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. यात पाच घरे जळून खाक झाली. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या आगीत पाच कुटुंबातील सदस्य बेघर झालेत.कापूसतळणीतील एका घराला आग लागली, त्यामुळे त्या घरातील कुटुबीयांनी घराबाहेर धाव घेतली. मात्र, काही वेळातच आगीचे चार ते पाच घरांना विळख्यात घेतले. या आगीची माहिती अग्निशमनला देण्यात आली. अग्निशमन पथक पोहोचेपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले होते. प्रत्येक जण आग विझविण्याचा प्रयत्न करीत होते. काही वेळात अग्निशमन पथक पोहोचले. दोन तास पाण्याचा मारा केल्यानंतर आग नियंत्रणात आली. या आगीत भाऊराव तायडे, मधुकर नंदनवार, विजय नंदनवार, बापू नंदनवार, सुनील शामराव सरदार यांची घरे जळून खाक झाले. या आगीत त्यांच्या घरातील टीव्ही, कपडे, फर्निचर, कपडे व दस्तावेजांची राखरांगोळी झाली. आग विझविताना सुनील सरदार किरकोळ जखमी झाले. गोठ्यातील एक गाय सुध्दा किरकोळ भाजली. चुलीतील राखीमुळे ही आग लागल्याची चर्चा गावात सुरु होती. तहसीलदार पुरुषोत्तम भुयारी व आरोग्य अधिकारी सुधीर डोंगरे यांनी घटनास्थळी धाव घेतली.बाधित नागरिकांना सोमवारी शासकीय मदतमाहिती मिळताच तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, मंडळ अधिकारी, अविनाश पोटदुखे, तलाठी दिनेश वानखडे, सरपंच, पोलीस पाटील घटनास्थळी दाखल झाले. आगबाधितांना सोमवारी मदत देण्याचे आश्वासन तहसिलदारांकडून देण्यात आले. सानुग्रह मदत म्हणून प्रत्येकी १ हजारांची मदत देण्यात आली. गावातील रेशनदुकानदाराला धान्य देण्याच्या सूचना करण्यात आली. बाधितांच्या राहण्याची व्यवस्था ग्रामपंचायतीत करण्यात आली.

टॅग्स :fireआग