शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

मासेमारांचे जाळे ठरताहेत सर्पांसाठी मृत्यूचे सापळे

By admin | Updated: December 14, 2015 00:17 IST

जिल्ह्यातील बहुतांश तलावावर मासेमारी चालत असून मासेमाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे सापांचा मृत्यू होत असल्याचा संशय वन्यप्रेमींनी वर्तविला आहे.

तीन पानदिवड सापांचा मृत्यू : निसर्गाच्या अन्नसाखळीवर प्रभाव पडण्याची शक्यताअमरावती : जिल्ह्यातील बहुतांश तलावावर मासेमारी चालत असून मासेमाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे सापांचा मृत्यू होत असल्याचा संशय वन्यप्रेमींनी वर्तविला आहे. वन्यजीव अभ्यासक छत्री तलावातील प्लास्टिक स्वच्छ करण्याकरिता गेले असता हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. अमरावती शहरानजीकच्या परिसरात २४ तलाव असून जिल्ह्यात ५७ तलाव आहेत. यापैकी बहुतांश तलावावर मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. मासेमारी अनेक गरीब कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. मात्र, या तलावात नुसते मासेच नसून संपूर्ण जल परिसंस्था तिथे अस्तित्वात आहे. मासे हा जल परिसंस्थेचा घटक आहे. जलीय परिसंस्थेत अन्नजाळे कार्यरत असते. त्यामुळे निसर्ग चक्रात प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे. शेवाळ व इतर पाणवनस्पती, लहान व मोठे कीटक, शिंपले, बेडूक, मासे त्यावर जगणारे पक्षी व साप अशी एकूण अन्नसाखळी आहे. मासेमारी करणारे जल घटकांशी कोणताही आत्मीयता न दाखविता मासेमारीसोबत अन्य पाण्यातील जीवजंतूवरही प्रहार करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. वन्यजीव अभ्यासक यादव तरटे व त्यांचे सहकारी धनंजय भांबूरकर, सुरेश खांडेकर हे छत्री तलाव परिसरातील प्लास्टिक कचरा स्वच्छ करीत होते. तेव्हा मासेमाऱ्यांनी काठावर ठेवलेल्या जाळ्यात तीन मोठे साप मृतावस्थेत आढळले. त्यामध्ये पानदिवड प्रजातीचे साप होते. त्यामुळे मासेमारीसोबत जलामधील सरपटणाऱ्या प्राण्यावरही घात होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वन्यजीव अभ्यासक यांनी स्थानिक मासेमाऱ्यांना भेटून या गोष्टीची कल्पना दिली व त्यांना समजावून सांगितले. मृत सापांच काय, असा सवाल उपस्थित होत आहे.मासेमाऱ्यांनी मासेमारी करताना तलावाच्या काठावर बेवारस जाळे ठेऊन नयेत. आपले पोट भरताना इतर प्राण्यांचा जीव जाणार नाही याची काळजी घ्यावी व अप्रत्यक्ष पक्षी व सर्प संवर्धन करण्यात सहकार्य करावे.- यादव तरटे,वन्यजीव अभ्यासकपानदिवड सापाचे महत्त्वपानदिवड साप पाणथळ ठिकाणी आढळतो. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या अनुसूची २ मध्ये या सापाचा सहभाग आहे. नाले, ओहाळ, नद्या व तलाव हा याचा अधिवास आहे. बेंडकुळ्या (लहान बेडके) व बेडूक हे यांचे मुख्य खाद्य आहे. हा साप बिनविषारी साप असून मानवाला यांच्यापासून कोणताही धोका नाही. सापाचे अस्तित्व धोक्यातसर्पमित्र सर्पसंवर्धनाचा उद्देश ठेवून सापांचा जीव वाचवून त्यांना जंगलात सोडतात. पण जंगलजवळच असणाऱ्या पानथळीच्या ठिकाणी असलेल्या बेवारस पडलेले जाळे त्यांच्या जीवावर बेतत आहे. छत्री तलाव येथे सन २०१३ मध्ये दोन पक्षी, सन २०१५ मध्ये २ साप व एक पक्षी जाळ्यात अडकून दगावले. पोहरा तलाव येथे सन २०१४ मध्ये दोन कासवांचा मृत्यू झाला. त्यामुळे जंगलात सोडलेल्या सापांचेही अस्तित्व धोक्यात असल्याचे दिसून येत आहे.