शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

जिल्हाधिकाऱ्यांऐवजी नगराध्यक्ष बोलविणार पहिली सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2016 00:09 IST

थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांच्या विशेषाधिकाराविषयीचा संभ्रम बुधवारी नगरविकास विभागाने दूर केला.

अमरावती : थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांच्या विशेषाधिकाराविषयीचा संभ्रम बुधवारी नगरविकास विभागाने दूर केला. त्यानुसार जुन्या नगराध्यक्षांचा कार्यकाळ संपताच दुसऱ्याच दिवशी नवीन नगराध्यक्ष पदभार सांभाळतील व नगर पालिकेची पहिली सर्वसाधारण सभा बोलावतील. ही सभा बोलविण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांऐवजी आता नगराध्यक्षांना देण्यात आला आहे. राज्यपालांच्या आदेशाने नगरविकासचे सहसचिव जयसिंराव पाटील यांनी बुधवारी हा अध्यादेश जारी केला आहे. आॅक्टोबरच्या अखेरीस जिल्ह्यातील मोर्शी, शेंदूरजनाघाट, वरूड, चांदूरबाजार, अचलपूर, अंजनगांव सुर्जी, दर्यापूर, धामणगांव व चांदूररेल्वे नगर पालिकांची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. नगराध्यक्ष व सदस्यांची नावे ५ डिसेंबरला राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहेत. या दिनांकाच्या २५ दिवसांच्या म्हणजेच ३० डिसेंबरच्या आत उपाध्यक्ष व नामनिर्देशित सदस्यांची निवड बैठकीद्वारे केली जाणार आहे. ही पहिली सर्वसाधारण सभा बोलविण्याचा अधिकार आता नगराध्यक्षांना देण्यात आला आहे. त्यामुळे या नऊ नगर पालिकांमध्ये आजच्या तारखेत बैठक बोलविण्याचे मुख्याधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले आहे. यासर्वसाधारण बैठकीमध्ये उपाध्यक्ष व नामनिर्देशित सदस्य निवडले जाणार आहेत बैठकीचे पीठासीन अध्यक्ष नगराध्यक्ष राहणार आहे. गट, पक्ष किंवा आघाडीच्या गटनेत्यांनी अनुज्ञेय संख्येपेक्षा अधिक व्यक्तिंचे शिफारसपत्र नगराध्यक्षाकडे दिल्यास अनुज्ञेय संख्येएवढीच अनुक्रमिक शिफारसपत्रे नगराध्यक्ष स्वीकारणार आहेत.एकाच पृष्ठावर अनुज्ञेय संख्येपेक्षा अधिक नावे नगराध्यक्षाकडे दिल्यास अशा पत्रावरील अनुज्ञेय संख्या असलेली अनुक्रमिक नावेच नगराध्यक्ष स्वीकृत सदस्यपदासाठी जाहीर करणार आहेत.