शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

मेळघाटात पहिला वनशहीद स्तंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 06:00 IST

स्वातंत्र्यपूर्व काळात मेळघाटच्या जंगलाचे वनव्यवस्थापन, वनप्रशासन ब्रिटिश राजवटीतील अधिकाऱ्यांकडे होते. वन आणि वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनार्थ राबणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर वनांची भिस्त होती. तत्कालीन मेळघाट फॉरेस्ट डिव्हिजन अंतर्गत कार्यरत फॉरेस्ट रेंजर नाझीर मोहम्मद हे १६ फेब्रुवारी १९३५ रोजी मेळघाटच्या जंगलाला लागलेल्या आगीत भाजले गेले होते.

ठळक मुद्देइंग्रजांनी घेतली दखल : स्वातंत्र्यपूर्व काळातील नाझीर मोहम्मद यांचे नाव अग्रक्रमावर

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : वन आणि वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या वनअधिकाऱ्यांची परंपरा स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आली आहे. तेव्हाचा हरिसाल येथे स्थापित वनशहीद स्तंभ आजही मेळघाटात आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनीही अत्युच्च कार्याची दखल घेतली असून, तो पहिला वनशहीद स्तंभ ठरला आहे.स्वातंत्र्यपूर्व काळात मेळघाटच्या जंगलाचे वनव्यवस्थापन, वनप्रशासन ब्रिटिश राजवटीतील अधिकाऱ्यांकडे होते. वन आणि वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनार्थ राबणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर वनांची भिस्त होती. तत्कालीन मेळघाट फॉरेस्ट डिव्हिजन अंतर्गत कार्यरत फॉरेस्ट रेंजर नाझीर मोहम्मद हे १६ फेब्रुवारी १९३५ रोजी मेळघाटच्या जंगलाला लागलेल्या आगीत भाजले गेले होते. त्यांची अमरावती येथील रुग्णालयात २३ फेब्रुवारी १९३५ रोजी उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. त्यांनी तब्बल २१ वर्षे मेळघाट फॉरेस्ट डिव्हिजनमध्ये आपली सेवा दिली होती. तत्कालीन इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ एक मार्बल स्टोन हरिसाल परिसरात लावला. केंद्र शासनाच्या ७ मे २०१३ च्या अधिसूचनेनुसार ११ सप्टेंबर हा राष्ट्रीय वनहुतात्मा दिन म्हणून घोषित करण्यात आला आणि नाझीर मोहम्मद यांच्या स्मृतीस उजाळा मिळाला.राष्ट्रीय वन हुतात्मा दिनाच्या औचित्यावर मेळघाटातील दुसरा वनशहीद स्तंभ स्वातंत्र्यानंतर तब्बल ७२ वर्षांनी चिखलदरा येथील वनउद्यानात (फॉरेस्ट गार्डन) उभारण्यात आला आहे. मेळघाट प्रादेशिक वनविभागाकडे स्तंभाच्या देखभालीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या वनशहीद स्तंभावर अग्रक्रमाने नाझीर मोहम्मद यांचे नाव अंकित असून, ते मेळघाटातील पहिले वनशहीद ठरले आहेत. त्यांच्यासह अकोट-वडगाव क्षेत्रात १५ मे २००१ ला वनशहीद झालेले वनक्षेत्रपाल त्र्यंबकराव भारती यांचे नाव आहे. स्वातंत्र्यानंतर मेळघाटात वनशहीद ठरलेले हे पहिले वनक्षेत्रपाल. यानंतर ४ ऑगस्ट २०१० ला जारिदा क्षेत्रात अस्वलीच्या हल्ल्यात ठार झालेले वनरक्षक अभिष वाकोडे आणि १४ नोव्हेंबर २०१३ ला शहीद झालेले वनमजूर सुधाकरराव ढेमरे यांची नावे या नव्या शहीद स्तंभावर आहेत.