शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

४५ लाख विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी गणवेश

By admin | Updated: May 23, 2014 23:32 IST

सन २०१४-१५ या शैक्षणिक सत्रात इयत्ता पहिली ते आठवीच्या ४५ लाख ६६ हजार ५०७ गरीब विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश वितरीत करण्याचे आदेश राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने दिले आहेत.

 सुरेश सवळे - चांदूरबाजार

सन २०१४-१५ या शैक्षणिक सत्रात इयत्ता पहिली ते आठवीच्या ४५ लाख ६६ हजार ५०७ गरीब विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश वितरीत करण्याचे आदेश राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थांना गणवेशाची प्रतीक्षा करावी लागणार नाही. यासाठी १६३ कोटी ८६ लाख ५३ हजार रुपयाची तरतुद करण्यात आली आहे. तर विदर्भाला गणवेशासाठी ४२ कोेटी ४३ लाख २७ हजार ४०० रुपये मिळणार आहे. या गणवेश वाटपाचे सर्वाधिकार स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीकडे देण्यात आले असून समितीच्या माध्यमातून दरपत्रक मागविण्याची प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. राज्य शिक्षण (प्राथमिक) परिषदेने ११ एप्रीलला या संबंधातील आदेश जिल्हा शिक्षण विभागाला निर्गमित केले आहे. दोन वर्षापूर्वी यंत्रमाग महामंडळाकडून गणवेशाचे अधिकार काढून ते शाळा व्यवस्थापन समितींना दिले. गेल्या काही काळात विद्यार्थ्यांना चक्क दिवाळीपर्यंत गणवेश मिळाला नाही. परिणामी विद्यार्थ्यांना गणवेशाशिवाय शाळेत जावे लागले होते. हा अनुभव लक्षात घेता शिक्षण विभागाने पूर्वतयारी म्हणून १४ फेब्रुवारी पासूनच गणवेशासाठी विद्यार्थ्यांचे मापे घेऊन तसा अहवाल शिक्षण विभागाला पाठविण्याच्या सूचना केला. प्रति विद्यार्थी दोन गणवेश मिळण्याची तरतूद असून यासाठी राज्य शासनाकडून ३६ लाख २६ हजार ७६० विद्यार्थ्यांसाठी चारशे रुपये तर केंद्राकडून ९ लाख ३९ हजार ७४७ विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोनशे रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. नव्याने प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी महिन्याभराच्या आत जूलै पर्यंत पूर्ण गणवेश तयार झाल्याचा अहवाल शासनाला पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गणवेश वाटपाला उशीर झाल्यास शाळा समिती, गटशिक्षणाधिकारी व जिल्हा शिक्षणाधिकार्‍यावर कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. विदर्भाला गणवेशासाठी ४२ कोेटी ४३ लाख २७ हजार ४०० रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यात अमरावती जिल्ह्यात ५ कोटी ८२ लाख १९ हजार रुपयांचा निधी आला आहे. लवकरच अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात येणार आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांना गणवेश मोफत देण्याची अभिनव योजना शासनाने आखली असून याचा लाभ हजारो विद्यार्थ्याना होत आहे. गणवेश वाटपाची जबाबदारी आता शाळा व्यवस्थापन समितीवर सोपविण्यात आली आहे.या समिति मार्फतच चालू शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन प्रमाणे गणवेशाचे वाटप करण्यात येणार आहे.