शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

४५ लाख विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी गणवेश

By admin | Updated: May 23, 2014 23:32 IST

सन २०१४-१५ या शैक्षणिक सत्रात इयत्ता पहिली ते आठवीच्या ४५ लाख ६६ हजार ५०७ गरीब विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश वितरीत करण्याचे आदेश राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने दिले आहेत.

 सुरेश सवळे - चांदूरबाजार

सन २०१४-१५ या शैक्षणिक सत्रात इयत्ता पहिली ते आठवीच्या ४५ लाख ६६ हजार ५०७ गरीब विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश वितरीत करण्याचे आदेश राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थांना गणवेशाची प्रतीक्षा करावी लागणार नाही. यासाठी १६३ कोटी ८६ लाख ५३ हजार रुपयाची तरतुद करण्यात आली आहे. तर विदर्भाला गणवेशासाठी ४२ कोेटी ४३ लाख २७ हजार ४०० रुपये मिळणार आहे. या गणवेश वाटपाचे सर्वाधिकार स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीकडे देण्यात आले असून समितीच्या माध्यमातून दरपत्रक मागविण्याची प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. राज्य शिक्षण (प्राथमिक) परिषदेने ११ एप्रीलला या संबंधातील आदेश जिल्हा शिक्षण विभागाला निर्गमित केले आहे. दोन वर्षापूर्वी यंत्रमाग महामंडळाकडून गणवेशाचे अधिकार काढून ते शाळा व्यवस्थापन समितींना दिले. गेल्या काही काळात विद्यार्थ्यांना चक्क दिवाळीपर्यंत गणवेश मिळाला नाही. परिणामी विद्यार्थ्यांना गणवेशाशिवाय शाळेत जावे लागले होते. हा अनुभव लक्षात घेता शिक्षण विभागाने पूर्वतयारी म्हणून १४ फेब्रुवारी पासूनच गणवेशासाठी विद्यार्थ्यांचे मापे घेऊन तसा अहवाल शिक्षण विभागाला पाठविण्याच्या सूचना केला. प्रति विद्यार्थी दोन गणवेश मिळण्याची तरतूद असून यासाठी राज्य शासनाकडून ३६ लाख २६ हजार ७६० विद्यार्थ्यांसाठी चारशे रुपये तर केंद्राकडून ९ लाख ३९ हजार ७४७ विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोनशे रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. नव्याने प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी महिन्याभराच्या आत जूलै पर्यंत पूर्ण गणवेश तयार झाल्याचा अहवाल शासनाला पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गणवेश वाटपाला उशीर झाल्यास शाळा समिती, गटशिक्षणाधिकारी व जिल्हा शिक्षणाधिकार्‍यावर कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. विदर्भाला गणवेशासाठी ४२ कोेटी ४३ लाख २७ हजार ४०० रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यात अमरावती जिल्ह्यात ५ कोटी ८२ लाख १९ हजार रुपयांचा निधी आला आहे. लवकरच अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात येणार आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांना गणवेश मोफत देण्याची अभिनव योजना शासनाने आखली असून याचा लाभ हजारो विद्यार्थ्याना होत आहे. गणवेश वाटपाची जबाबदारी आता शाळा व्यवस्थापन समितीवर सोपविण्यात आली आहे.या समिति मार्फतच चालू शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन प्रमाणे गणवेशाचे वाटप करण्यात येणार आहे.