शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी अग्निपरीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 22:29 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे पाणीपुरवठा बंदचा बुधवारी तिसरा दिवस होता. या कालावधीत अमरावतीकर पाण्यासाठी अग्निपरीक्षाच देत आहेत. पाण्यासाठी गरीब असो मध्यमवर्गीय, एवढेच नव्हेतर श्रीमंतांनाही रस्त्यावर उतरून पाण्याची सोय करावी लागली आहे. विहिरीत उतरून मशीन दुरुस्ती करताना अनेकांनी जीव धोक्यात टाकले.

ठळक मुद्देविहिरी, बोअरवेल हातपंपांवर मदार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे पाणीपुरवठा बंदचा बुधवारी तिसरा दिवस होता. या कालावधीत अमरावतीकर पाण्यासाठी अग्निपरीक्षाच देत आहेत. पाण्यासाठी गरीब असो मध्यमवर्गीय, एवढेच नव्हेतर श्रीमंतांनाही रस्त्यावर उतरून पाण्याची सोय करावी लागली आहे. विहिरीत उतरून मशीन दुरुस्ती करताना अनेकांनी जीव धोक्यात टाकले.तीन दिवसांत विहिरी, बोअरवेल व हापशींवर पाण्यासाठी अमरावतीकरांची मदार आहे. मात्र, हे स्रोत काही ठिकाणीच उपलब्ध आहेत. त्यामुळे मजीप्रा प्रशासनाच्या अनियोजित, बेताल कारभाराचा फटका बहुतांश अमरावतीकरांना सोसावा लागत आहे. टाकीतील पाणी नळ येईपर्यंत संपायला नको, याची धास्ती त्यांना लागली आहे. दरम्यान, बुधवारी सायंकाळपर्यंत पाइप लाइन दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने गुरुवारी काही भागातील पाणी पुरवठा सुरू होण्याचे संकेत मजीप्रा अधिकाऱ्यांनी दिले आहेत. अमरावतीकरांना दरदिवसाला १२५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा मजीप्राकडून केला जातो. मात्र, सिंभोरा धरणावरून पाणीपुरवठा करणारी मुख्य पाइप लाइन फुटल्यामुळे पाणीपुरवठा बंद झाला. तत्पूर्वी, रविवारी वादळी पावसाने वृक्ष कोसळून विद्युत तारे तुटल्याने सिंभोरा धरणावरील पंपाचा वीजपुरवठा खंडित झाला. मजीप्रा प्रशासनाकडे वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अन्य यंत्रणा नसल्याने अमरावतीकरांना पाण्यापासून वंचित राहावे लागले. वीजप्रवाह सुरू झाल्यानंतर अचानक मंगळवारी मुख्य जलवाहिनी फुटली आणि पुन्हा पाणीपुरवठा बंद होऊन अमरावतीकरांसमोर पाणी संकट उभे ठाकले. आधीच एक दिवसाआड पाणीपुरवठा, पाइप लाइन फुटणे, त्यातच विज पुरवठा खंडित होणे आदी कारणे मजीप्रा प्रशासनाला लक्ष्य ठरवीत आहेत. अमरावतीत शहरातील आठ लाखांवर लोकसंख्येपैकी बहुतांश मजीप्राच्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून आहेत. मात्र, पाणीपुरवठ्याबाबत मजीप्रा प्रशासनाने आजपर्यंत गंभीरतेने घेतले नाही. त्यामुळे त्याचा फटका अमरावतीकरांना वारंवार बसला आहे.मजीप्राच्या कारभाराला अमरावतीकर अक्षरश: वैतागले आहेत. तीन दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्यामुळे बहुतांश नागरिकांना पाण्यासाठी घराबाहेर पडावे लागले. बादल्या, गुंड व ड्रम घेऊन प्रत्येकाची पाण्यासाठी धाव असल्याचे चित्र शहरात दिसले. हापशी व बोअरवेलवर पाण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली होती. यादरम्यान पाण्यासाठी अनेक ठिकाणी नागरिकांची वाद सुद्धा झालेत. पाणीपुरवठ्याच्या स्थितीत कधी सुधारणा होईल, याचीच प्रतीक्षा आता अमरावतीकरांना आहे.सुदैवाने तो बचावलापाणीपुरवठा बंद झाल्यामुळे अनेकांनी विहिरीवरील मशीनचा वापर केला. मात्र, अनेकांच्या विहिरीवरील मशीन नादुरुस्त असल्यामुळे पाणी मिळविता आले नाही. नागरिकांनी मशीन दुरुस्तीची प्रयत्न सुरु केले होते. मशीनमधून पाणी येत नसल्यामुळे काही नागरिक विहिरीत उतरले. अजय अंबादास बोधनकर (३०, रा. व्यंकैय्यापुरा) यांनी पाणी मिळविण्यासाठी विहिरीवर मशीन लावत होते. दरम्यान, त्यांना विद्युत प्रवाहाचा जोरदार झटका बसल्याने ते जखमी झाले. त्यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने अजय बोधनकर यांचा जीव वाचला, अन्यथा पाण्यासाठी त्या व्यक्तीला जीव गमावावा लागला असता.जीपीएस यंत्रणेचा उपयोग काय?जीवन प्राधिकरणाच्या पाणी पुरवठा योजनेला राज्य शासनाने दोन वर्षापूर्वी उत्कृष्ट योजना म्हणून गौरविले आहे. मुख्य जलवाहिनीसह शहरातील जलवाहिन्या या जीपीएस यंत्रणेशी जोडल्या आहेत. तथापि, जलवाहिन्या सातत्याने फुटत असताना जीपीएस यंत्रणेचा उपयोग काय, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.कॅनच्या पाण्याची मागणी वाढलीपाणीटंचाईमुळे कॅनच्या पाण्याची मागणी प्रचंड वाढली आहे. मजीप्राचे शुद्ध पाणी मिळत नसल्याने अनेकांनी कॅनचे पाणी खरेदी केले. काही ठिकाणी तर या पाण्याचेही दर वधारल्याचे दिसून आले. कॅनमधील थंड व शुद्ध पाण्यावर अनेक जण तहान भागवत आहेत.जुनी पीएससीची पाइप लाइन कालबाह्य झाली आहे. तडा गेलेल्या पाइप लाइनला पाण्याच्या प्रेशरने मोठी गळती सुरू झाली. दुरुस्तीचे काम पूर्णत्वाकडे असून, चाचणी घेतली जात आहे. जलशुद्धीकरण केंद्रावर पोहोचल्यानंतर काही भागात पाण्याचा पुरवठा होऊ शकतो.- किशोर रघुवंशी, उपविभागीय अभियंता, मजीप्रा