शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

पाण्यासाठी अग्निपरीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 22:29 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे पाणीपुरवठा बंदचा बुधवारी तिसरा दिवस होता. या कालावधीत अमरावतीकर पाण्यासाठी अग्निपरीक्षाच देत आहेत. पाण्यासाठी गरीब असो मध्यमवर्गीय, एवढेच नव्हेतर श्रीमंतांनाही रस्त्यावर उतरून पाण्याची सोय करावी लागली आहे. विहिरीत उतरून मशीन दुरुस्ती करताना अनेकांनी जीव धोक्यात टाकले.

ठळक मुद्देविहिरी, बोअरवेल हातपंपांवर मदार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे पाणीपुरवठा बंदचा बुधवारी तिसरा दिवस होता. या कालावधीत अमरावतीकर पाण्यासाठी अग्निपरीक्षाच देत आहेत. पाण्यासाठी गरीब असो मध्यमवर्गीय, एवढेच नव्हेतर श्रीमंतांनाही रस्त्यावर उतरून पाण्याची सोय करावी लागली आहे. विहिरीत उतरून मशीन दुरुस्ती करताना अनेकांनी जीव धोक्यात टाकले.तीन दिवसांत विहिरी, बोअरवेल व हापशींवर पाण्यासाठी अमरावतीकरांची मदार आहे. मात्र, हे स्रोत काही ठिकाणीच उपलब्ध आहेत. त्यामुळे मजीप्रा प्रशासनाच्या अनियोजित, बेताल कारभाराचा फटका बहुतांश अमरावतीकरांना सोसावा लागत आहे. टाकीतील पाणी नळ येईपर्यंत संपायला नको, याची धास्ती त्यांना लागली आहे. दरम्यान, बुधवारी सायंकाळपर्यंत पाइप लाइन दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने गुरुवारी काही भागातील पाणी पुरवठा सुरू होण्याचे संकेत मजीप्रा अधिकाऱ्यांनी दिले आहेत. अमरावतीकरांना दरदिवसाला १२५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा मजीप्राकडून केला जातो. मात्र, सिंभोरा धरणावरून पाणीपुरवठा करणारी मुख्य पाइप लाइन फुटल्यामुळे पाणीपुरवठा बंद झाला. तत्पूर्वी, रविवारी वादळी पावसाने वृक्ष कोसळून विद्युत तारे तुटल्याने सिंभोरा धरणावरील पंपाचा वीजपुरवठा खंडित झाला. मजीप्रा प्रशासनाकडे वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अन्य यंत्रणा नसल्याने अमरावतीकरांना पाण्यापासून वंचित राहावे लागले. वीजप्रवाह सुरू झाल्यानंतर अचानक मंगळवारी मुख्य जलवाहिनी फुटली आणि पुन्हा पाणीपुरवठा बंद होऊन अमरावतीकरांसमोर पाणी संकट उभे ठाकले. आधीच एक दिवसाआड पाणीपुरवठा, पाइप लाइन फुटणे, त्यातच विज पुरवठा खंडित होणे आदी कारणे मजीप्रा प्रशासनाला लक्ष्य ठरवीत आहेत. अमरावतीत शहरातील आठ लाखांवर लोकसंख्येपैकी बहुतांश मजीप्राच्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून आहेत. मात्र, पाणीपुरवठ्याबाबत मजीप्रा प्रशासनाने आजपर्यंत गंभीरतेने घेतले नाही. त्यामुळे त्याचा फटका अमरावतीकरांना वारंवार बसला आहे.मजीप्राच्या कारभाराला अमरावतीकर अक्षरश: वैतागले आहेत. तीन दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्यामुळे बहुतांश नागरिकांना पाण्यासाठी घराबाहेर पडावे लागले. बादल्या, गुंड व ड्रम घेऊन प्रत्येकाची पाण्यासाठी धाव असल्याचे चित्र शहरात दिसले. हापशी व बोअरवेलवर पाण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली होती. यादरम्यान पाण्यासाठी अनेक ठिकाणी नागरिकांची वाद सुद्धा झालेत. पाणीपुरवठ्याच्या स्थितीत कधी सुधारणा होईल, याचीच प्रतीक्षा आता अमरावतीकरांना आहे.सुदैवाने तो बचावलापाणीपुरवठा बंद झाल्यामुळे अनेकांनी विहिरीवरील मशीनचा वापर केला. मात्र, अनेकांच्या विहिरीवरील मशीन नादुरुस्त असल्यामुळे पाणी मिळविता आले नाही. नागरिकांनी मशीन दुरुस्तीची प्रयत्न सुरु केले होते. मशीनमधून पाणी येत नसल्यामुळे काही नागरिक विहिरीत उतरले. अजय अंबादास बोधनकर (३०, रा. व्यंकैय्यापुरा) यांनी पाणी मिळविण्यासाठी विहिरीवर मशीन लावत होते. दरम्यान, त्यांना विद्युत प्रवाहाचा जोरदार झटका बसल्याने ते जखमी झाले. त्यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने अजय बोधनकर यांचा जीव वाचला, अन्यथा पाण्यासाठी त्या व्यक्तीला जीव गमावावा लागला असता.जीपीएस यंत्रणेचा उपयोग काय?जीवन प्राधिकरणाच्या पाणी पुरवठा योजनेला राज्य शासनाने दोन वर्षापूर्वी उत्कृष्ट योजना म्हणून गौरविले आहे. मुख्य जलवाहिनीसह शहरातील जलवाहिन्या या जीपीएस यंत्रणेशी जोडल्या आहेत. तथापि, जलवाहिन्या सातत्याने फुटत असताना जीपीएस यंत्रणेचा उपयोग काय, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.कॅनच्या पाण्याची मागणी वाढलीपाणीटंचाईमुळे कॅनच्या पाण्याची मागणी प्रचंड वाढली आहे. मजीप्राचे शुद्ध पाणी मिळत नसल्याने अनेकांनी कॅनचे पाणी खरेदी केले. काही ठिकाणी तर या पाण्याचेही दर वधारल्याचे दिसून आले. कॅनमधील थंड व शुद्ध पाण्यावर अनेक जण तहान भागवत आहेत.जुनी पीएससीची पाइप लाइन कालबाह्य झाली आहे. तडा गेलेल्या पाइप लाइनला पाण्याच्या प्रेशरने मोठी गळती सुरू झाली. दुरुस्तीचे काम पूर्णत्वाकडे असून, चाचणी घेतली जात आहे. जलशुद्धीकरण केंद्रावर पोहोचल्यानंतर काही भागात पाण्याचा पुरवठा होऊ शकतो.- किशोर रघुवंशी, उपविभागीय अभियंता, मजीप्रा