शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
4
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
5
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
6
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
7
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
8
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
9
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
10
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
11
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
12
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
13
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
14
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
15
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
16
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
17
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
18
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
19
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
20
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!

गावालगतच्या खळ्यांना आग

By admin | Updated: April 19, 2017 00:17 IST

तिवसा शहरातील पेठपुरा नेर पांदण परिसरात कडबा कुटाराच्या गंजीला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.

तिवसा येथील घटना : अग्निशमन बंब पोहोचले उशिरा तिवसा : तिवसा शहरातील पेठपुरा नेर पांदण परिसरात कडबा कुटाराच्या गंजीला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. सुमारे ३ तास नागरिकांनी प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आली. गावालगतच आगीची घटना घडल्याने ती वस्तीत पसरू शकते, अशी भीती निर्माण झाली होती. दरम्यान आगीचे रौद्ररुप पाहून स्थानिकांनी अग्निशमन दलास पचारण केले. मात्र, महानगरपालिका अग्निशमन दलाच े वाहन आल्याने तिन तासानंतर आग नियंत्रणात आल्याने पुढील अनर्थ टळला.कडबा कुटाराच्या गंजीला आग लावल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. आगीची माहिती गावात पसरताच नागरिकांची धावपळ सुरू झाली. अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. तीन तासांच्या आटोकाट प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आली. आ. यशोमती ठाकूर यांनी तत्काळ प्रशासनाला सूचना दिल्या. अग्निशमन दलाच्या चमुने आग नियंत्रणात आणल्याने नगरपंचायत उपाध्यक्ष वैभव वानखडे, नगरसेवक नरेंद्र विघ्ने, सचिन गोरे, योगेश वानखडे, वैभव काकडेसह आदींनी अग्निशमन दलाचे फायरमन नरेंद्र मिठे, नशीब खान, राजेश गजबे, अमित ददगाळ, शहबाज खान, नवेद इकबाल यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)क्षणार्धात स्वयंपाकघर खाकनांदगावातील घटना : तीन दिवसांत तीन ठिकाणी आगनांदगाव खंडेश्वर : स्थानिक वॉर्ड क्रमांक ९ मधील टेकडीपुऱ्यातील मुस्लिमबहुल भागात लागलेल्या आगीने अब्दुल सलाम यांच्या घरातील स्वयंपाकघर जळून खाक झाले. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. अब्दुल सलाम यांचे स्वयंपाकघर आगीच्या भक्षस्थानी सापडल्याने कुटुंबीयांच्या उपजिविकेसाठी जमा केलेली साधन सामग्री क्षणात नष्ट झाल्याने हे गरीब कुटुंब हवालदिल झाले आहे. यात टिनपत्रे, लाकूड फाटा व अन्नधान्याची हानी झाली. आगीत हजारो रुपयांचे नुकसान झाले. दोन दिवसांपूर्वी तहसील परिसरातसुद्धा आग लागली. तालुक्यातील पापळ येथेही आग लागून वित्तहानी झाली. परंतु, सततच्या घटना घडूनही शासन अग्निशमन वाहन देण्यास असमर्थ ठरत असल्याने नागरिकांमध्ये शासनाप्रती प्रचंड रोष व्यक्त होत आहे. आग विझविण्यासाठी श्रीशान बॉम्बे, मो. बत्सी, इद्रीस, सलाम जिबीक, मो.सुफीयान, तौफिकसेठ यांनी प्रयत्न केले. घटनास्थळी एपीआय रीता उईके, तहसीलदार बी.व्ही. वाहुरवाघ, नगराध्यक्ष अक्षय पारस्कर, फिरोज खान, सतीश पटेल यांनी भेट दिली. (शहर प्रतिनिधी)आर्थिक मदतीची मागणीहलाखीचे जीवन जगत असलेल्या आगग्रस्त कुटुंबाला शासनाने त्वरित आर्थिक मदत द्यावी, जेणेकरून या गरीब कुटुंबाला आधार होईल, अशी मागणी पाणीपुरवठा सभापती फिरोज खान यांनी तहसीलदारांकडे केली आहे. न.पं.साठी अग्निशमन वाहन देण्यासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. परंतु, अद्यापपर्यंत शासनाने याबाबत कुठलीच दखल घेतली नाही. - अक्षय पारस्कर, नगराध्यक्ष