शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

गावालगतच्या खळ्यांना आग

By admin | Updated: April 19, 2017 00:17 IST

तिवसा शहरातील पेठपुरा नेर पांदण परिसरात कडबा कुटाराच्या गंजीला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.

तिवसा येथील घटना : अग्निशमन बंब पोहोचले उशिरा तिवसा : तिवसा शहरातील पेठपुरा नेर पांदण परिसरात कडबा कुटाराच्या गंजीला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. सुमारे ३ तास नागरिकांनी प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आली. गावालगतच आगीची घटना घडल्याने ती वस्तीत पसरू शकते, अशी भीती निर्माण झाली होती. दरम्यान आगीचे रौद्ररुप पाहून स्थानिकांनी अग्निशमन दलास पचारण केले. मात्र, महानगरपालिका अग्निशमन दलाच े वाहन आल्याने तिन तासानंतर आग नियंत्रणात आल्याने पुढील अनर्थ टळला.कडबा कुटाराच्या गंजीला आग लावल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. आगीची माहिती गावात पसरताच नागरिकांची धावपळ सुरू झाली. अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. तीन तासांच्या आटोकाट प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आली. आ. यशोमती ठाकूर यांनी तत्काळ प्रशासनाला सूचना दिल्या. अग्निशमन दलाच्या चमुने आग नियंत्रणात आणल्याने नगरपंचायत उपाध्यक्ष वैभव वानखडे, नगरसेवक नरेंद्र विघ्ने, सचिन गोरे, योगेश वानखडे, वैभव काकडेसह आदींनी अग्निशमन दलाचे फायरमन नरेंद्र मिठे, नशीब खान, राजेश गजबे, अमित ददगाळ, शहबाज खान, नवेद इकबाल यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)क्षणार्धात स्वयंपाकघर खाकनांदगावातील घटना : तीन दिवसांत तीन ठिकाणी आगनांदगाव खंडेश्वर : स्थानिक वॉर्ड क्रमांक ९ मधील टेकडीपुऱ्यातील मुस्लिमबहुल भागात लागलेल्या आगीने अब्दुल सलाम यांच्या घरातील स्वयंपाकघर जळून खाक झाले. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. अब्दुल सलाम यांचे स्वयंपाकघर आगीच्या भक्षस्थानी सापडल्याने कुटुंबीयांच्या उपजिविकेसाठी जमा केलेली साधन सामग्री क्षणात नष्ट झाल्याने हे गरीब कुटुंब हवालदिल झाले आहे. यात टिनपत्रे, लाकूड फाटा व अन्नधान्याची हानी झाली. आगीत हजारो रुपयांचे नुकसान झाले. दोन दिवसांपूर्वी तहसील परिसरातसुद्धा आग लागली. तालुक्यातील पापळ येथेही आग लागून वित्तहानी झाली. परंतु, सततच्या घटना घडूनही शासन अग्निशमन वाहन देण्यास असमर्थ ठरत असल्याने नागरिकांमध्ये शासनाप्रती प्रचंड रोष व्यक्त होत आहे. आग विझविण्यासाठी श्रीशान बॉम्बे, मो. बत्सी, इद्रीस, सलाम जिबीक, मो.सुफीयान, तौफिकसेठ यांनी प्रयत्न केले. घटनास्थळी एपीआय रीता उईके, तहसीलदार बी.व्ही. वाहुरवाघ, नगराध्यक्ष अक्षय पारस्कर, फिरोज खान, सतीश पटेल यांनी भेट दिली. (शहर प्रतिनिधी)आर्थिक मदतीची मागणीहलाखीचे जीवन जगत असलेल्या आगग्रस्त कुटुंबाला शासनाने त्वरित आर्थिक मदत द्यावी, जेणेकरून या गरीब कुटुंबाला आधार होईल, अशी मागणी पाणीपुरवठा सभापती फिरोज खान यांनी तहसीलदारांकडे केली आहे. न.पं.साठी अग्निशमन वाहन देण्यासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. परंतु, अद्यापपर्यंत शासनाने याबाबत कुठलीच दखल घेतली नाही. - अक्षय पारस्कर, नगराध्यक्ष