शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
4
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
5
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
6
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
7
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
8
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
9
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
10
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
11
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
12
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
13
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
14
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  
15
GST 2.0 Price List : स्कूटर ते होंडा ३५०... हॅचबॅकपासून लक्झरी SUV पर्यंत, GST कपातीमुळे कार-बाईक स्वस्त; पाहा संपूर्ण यादी
16
तुम्हाला फावल्या वेळेत नखं खाण्याची सवय असेल तर आताच सोडा; डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
17
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
18
Tata ची मोठी घोषणा; चार वर्षांपूर्वीच्या किमतीवर मिळणार कार, जाणून घ्या नवीन दर...
19
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
20
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला

मेळघाटात उसळला आगडोंब; पाचशे हेक्टरचे जंगल खाक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2022 18:02 IST

Amravati Newsमेळघाटातील घटांग, गाविलगड, रायपूर आणि जामली खोंगडा भागात आगडोंब उसळला असून यात सुमारे पाचशे हेक्टरचे जंगल खाक झाल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देजामली वन, हरिकेन खोऱ्यासह घटांग, रायपूर क्षेत्रात पाचशे हेक्टर जंगल खाक

नरेंद्र जावरे

अमरावती : मेळघाटातील घटांग, गाविलगड, रायपूर आणि जामली खोंगडा वनपरिक्षेत्रील जंगलात आगडोंब उसळला आहे. सोमवारी रात्री ९ वाजता अंधारातही हरिकेन पॉइंट खोऱ्यातील आगीची धग दुरूनच दिसून येत होती. वनअधिकारी, कर्मचारी, वनमजूर आग विझविण्यासाठी रात्रीपासूनच जंगलात असल्याची माहिती आहे. जवळपास पाचशे हेक्टर जंगल जळाल्याची माहिती आहे.

दरवर्षी उन्हाळ्यात अतिसंरक्षित व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलांसह वन विभागाच्या संरक्षित जंगलात आग लागल्याने हजारो हेक्टर जंगल जळून राख होते. संबंधित विभागातर्फे मोठ्या प्रमाणात जनजागृती आणि उपाययोजना केल्यानंतरही आगडोंब थांबलेला नाही. आता व्याघ्र प्रकल्पाच्या परिसराचा विस्तार झाला. अतिसंरक्षित परिक्षेत्रात येणाऱ्या गावांचे पुनर्वसनसुद्धा केले जात आहे. तरीदेखील मेळघाटातील जंगलात आगडोंब उसळत असल्याचे विदारक चित्र पर्यावरणप्रेमींमध्ये चिंतेचा विषय ठरला आहे.

जामली खोंगडा परिक्षेत्रांतर्गत महादेव घसरण परिसर व जामली वनपरिसरातील जंगलातील आग आटोक्यात आणण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी अभय चंदेल व दिनेश वाळके, वनपाल वनरक्षक व मजूर अंगारी यांच्यासह तळ ठोकून असल्याचे सांगण्यात आले. या आगी हेतुपुरस्सर लावण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. पूर्वी बांबूच्या घर्षणाने याआधी आगी लागत असल्याचे सांगितले जात होते; परंतु गेल्या काही वर्षांत मोहफुले वेचण्यासाठी, शिवाय तेंदूपाने जोमाने यावीत, गुरांचा चारा जास्त प्रमाणात उगवावा व बारसिंगाची शिंगे सापडावीत, यासाठी आगी लावण्यात येतात. अनेकदा स्थानिक आरोपी पकडण्यात आले आहेत.

ब्रीदाच्या कोसो दूर समित्या?

संयुक्त वन व्यवस्थापन आणि श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन योजना अशा दोन वेगवेगळ्या समित्या प्रत्येक आदिवासी गावात कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, आगीपासून जंगलाचे संरक्षण हेच या समित्यांचे ब्रीद आहे. यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च विविध उपक्रम आणि साहित्यासाठी वन आणि व्याघ्र प्रकल्प अंतर्गत केला जातो; परंतु मोबदल्यात आदिवासींची असहकार्याची भूमिका वनसंपदा नष्ट करणारी ठरली आहे. आग विझविण्यासाठी ते पुढे येत नसल्याच्या वास्तवामुळे वन आणि व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी, कर्मचारी हतबल झाले आहेत.

टॅग्स :fireआग