शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल पंपावर ‘फायर आॅडिट’चा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 22:37 IST

सूर्य आग ओकू लागला आहे. पारा ४२ ते ४४ अंश सेल्सिअस गाठत आहे. ही स्थिती ज्वलनशील पदार्थांसाठी अतिशय धोकादायक असतानाही शहरातील पेट्रोल पंपांवर ‘फायर आॅडिट’चा धुव्वा उडाल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देअग्निशामक यंत्रे कालबाह्य : बादल्यांमध्ये वाळूची झाली माती

गणेश वासनिक ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सूर्य आग ओकू लागला आहे. पारा ४२ ते ४४ अंश सेल्सिअस गाठत आहे. ही स्थिती ज्वलनशील पदार्थांसाठी अतिशय धोकादायक असतानाही शहरातील पेट्रोल पंपांवर ‘फायर आॅडिट’चा धुव्वा उडाल्याचे वास्तव आहे. बहुतांश पंपांवरील अग्निशामक यंत्रे कालबाह्य, पर्यायाने निकामी असून, आग लागल्यास प्रसंगी ती नियंत्रणात आणणे अशक्य होईल, असे भयावह चित्र आहे.पेट्रोल पंपांवर ग्राहकांना आवश्यक सुविधा पडताळणीची जबाबदारी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातच नव्हे, शहरातसुद्धा मोजक्याच पेट्रोल पंपावर या सुविधा आहेत. पेट्रोल पंप हे नियमानुसार सुरू आहेत अथवा नाही, ही खबरदारी घेण्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांनी नागपूर येथे विभागीय प्रबंधकांची नियुक्ती केली आहे. त्यांनी महिन्यातून एकदा पंपावर आकस्मिक भेट देऊन ग्राहक संरक्षण कायद्यानुसार सुविधांची तपासणी करणे गरजेचे आहे.स्वतंत्र पाणी सुविधेचा अभावउन्हाळा सुरू झाल्यानंतरही अग्निशामक यंत्रांची दुरुस्ती वा बदलविण्याची तसदी पेट्रोल पंपमालकांनी घेतली नसल्याचे दिसून येते. आग लागल्यास ती रोखणे किंवा विझविण्यासाठी पेट्रोल पंपावर असलेले फायर एक्स्टिंग्यूशर हे कालबाह्य आहेत. या अग्निशामक यंत्रातील गॅस अथवा ड्राय केमिकल मुदतीत बदलविण्यात आलेलेच नाही, असे त्यावरील नोंदीनुसार दिसून येते.पेट्रोल पंपावर स्वतंत्र पाच ते दहा हजार लिटर क्षमतेचे पाण्याचे टाके निर्माण करणे आवश्यक आहे. मात्र, शहरात एकाही पेट्रोल पंपावर पाण्याचे टाके नाही.वाळूची झाली मातीपेट्रोल पंपाच्या ठिकाणी आग विझविण्यासाठी लोखंडी बादल्यांमध्ये वाळू भरून ठेवली जाते. मात्र, बहुतांश पंपावर असलेल्या बादल्यांमध्ये वाळूची माती झाली आहे. पेट्रोल पंपमालक हे केवळ व्यावसायिक हित जपत असून, त्यांनी ग्राहकांच्या सुरक्षिततेचे धिंडवडे काढले आहे. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष असून, पेट्रोल पंपावर अप्रिय घटना घडल्यास कोण जबाबदारी स्वीकारणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.महापालिका अग्निशमनने बजावल्या नोटीसमहापालिका अग्निशमन विभागाने पेट्रोल पंप, आरागिरणी, हॉटेल, बीअर बार, ज्वलनशील पदार्थांची विक्री करणाऱ्या प्रतिष्ठानच्या संचालकांना फायर आॅडिटबाबत मार्च महिन्यात नोटीस बजावल्या. मात्र, एकाही पेट्रोल पंप संचालकाने स्वत:हून फायर आॅडिट करून घेतले नसल्याची माहिती आहे. जिल्हा कचेरीची परवानगी अंतिम असल्याच्या अविर्भावात पेट्रोल पंपमालक वागत असून, त्यांना नागरिकांच्या जीविताशी काहीही घेणे-देणे नसल्याचे दिसून येते.इंधनाची भेसळ, काळाबाजार रोखणे, पिण्याचे पाणी, टॉयलेट, हवा या सुविधांचे उत्तरदायित्व आमचे आहे. पंपावर संरक्षणाची जबाबदारी पेट्रोलियम कंपन्यांची आहे.- अनिल ताकसांडेजिल्हा पुरवठा अधिकारीपेट्रोल पंप संचालकांना फायर आॅडिटसंदर्भात गत महिन्यातच नोटीस बजावली. आतापर्यंत एकाही पंपावर फायर आॅडिट झालेले नाही. उल्लंघनासंदर्भातपुन्हा नोटीस बजावली जाईल.- भारतसिंह चौहानप्रमुख, अग्निशमन विभाग