शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘ती’ आग लागली नाही; लावली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 05:00 IST

सहा अग्निशामक वाहने व शहरातील पाण्याचे टँकर यांच्या साहाय्याने शुक्रवारी तब्बल सहा तासांनंतर आग आटोक्यात आली. तहसील प्रशासनाने ३३ दुकानांचे स्वतंत्र पंचनामे केले. आगीत सर्वस्व गमावलेल्या ३३ दुकानदार व त्यांच्या कुटुंबीयांनी शनिवारी आपआपल्या दुकानात जाऊन काही वाचले का, याची चाचपणी केली. दुकानातील साहित्यासह अन्य सामग्री व महत्त्वाचे दस्तावेज जळाल्याने उभे राहायचे कसे, अशा विवंचनेत शनिवारी दुकानदारांनी जळालेले साहित्य उचलणे सुरू केले.

ठळक मुद्देदुकानदारांचा आरोप : पोलिसांत तक्रार, अग्नितांडवाला वेगळे वळण

  लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : शहरात शुक्रवारी पहाटे ३ च्या सुमारास लागलेल्या आगीत ३३ दुकाने जळून खाक झाली. दुकानदारांचे अंदाजे चार कोटी रुपयांचे नुकसान झाले. ती आग शॉर्ट सर्कीटने नव्हे, तर हेतुपुरस्सर लावल्याची तक्रार स्थानिक पोलिसांत शनिवारी करण्यात आली. तक्रार अर्जाच्या अनुषंगाने पोलिसांनी चौकशी आरंभली आहे. सहा अग्निशामक वाहने व शहरातील पाण्याचे टँकर यांच्या साहाय्याने शुक्रवारी तब्बल सहा तासांनंतर आग आटोक्यात आली. तहसील प्रशासनाने ३३ दुकानांचे स्वतंत्र पंचनामे केले. आगीत सर्वस्व गमावलेल्या ३३ दुकानदार व त्यांच्या कुटुंबीयांनी शनिवारी आपआपल्या दुकानात जाऊन काही वाचले का, याची चाचपणी केली. दुकानातील साहित्यासह अन्य सामग्री व महत्त्वाचे दस्तावेज जळाल्याने उभे राहायचे कसे, अशा विवंचनेत शनिवारी दुकानदारांनी जळालेले साहित्य उचलणे सुरू केले. तेथे त्यांना काही संशयास्पद परिस्थिती आढळून आली. परिणामी सर्व पीडित व्यापाऱ्यांनी धारणी पोलीस ठाणे गाठून आग लावणारा शोधून काढून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. कमाईची राखरांगोळीशुक्रवारी लागलेल्या आगीत ३३ दुकानदारांचे प्रचंड नुकसान झाले. या सर्वच व्यापाऱ्यांच्या डोळ्यांना अश्रूच्या धारा आहेत. शनिवारी दुकानातील जळालेले साहित्य ते उचलत होते. आता साधनसामग्रीही नाही, अन् दुकानही नाही, नवीन व्यवसाय कसा उभारावा, अशी व्यथा सांत्वनेसाठी येणाऱ्यांकडे मांडत होते. इतक्या वर्षांच्या कमाईची राखरांगोळी झाली असल्याने नवीन व्यवसाय उभारणे शक्यच नसल्याची भावना बहुतांश दुकानदारांनी व्यक्त केली. 

नगरपंचायतकडून मिळाल्या होत्या नोटीसयेथील सर्वे क्रमांक १२६ लगत ही सर्व दुकाने होती. त्यातील काही व्यापाऱ्यांना उपविभागीय अधिकाऱ्यांकडून जागेचे पट्टे मिळाले होते. ते पट्टे अनधिकृत असल्याची ओरड होती. काही दिवसांपूर्वी या दुकानधारकांना कागदपत्रे सादर करण्यासंदर्भात नगरपंचायतने नोटीससुद्धा बजावल्या होत्या. 

शुक्रवारची आग शॉर्ट सर्कीटने  लागली नसून, ती कोणी तरी लावली असल्याचा तक्रार अर्ज व्यापाऱ्यांनी दिला आहे. दोन दिवसांत चौकशी पूर्ण करण्यात येईल. तसे आढळल्यास संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात येईल. - निकेतन कदम, ठाणेदार, धारणी

टॅग्स :fireआग