शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

सासुला छळणाऱ्या सुनेविरूध्द एफआयआर; घराबाहेर काढले, मुलीलाही भेटू देत नसल्याची तक्रार

By प्रदीप भाकरे | Updated: February 19, 2023 16:12 IST

या कायद्यानुसार वयस्कर आई-वडील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे या संदर्भात तक्रार करून त्यांच्या उदरनिर्वाहासाठी मासिक भत्ता मिळू शकतात.

अमरावती : घराबाहेर हाकलून देत अनन्वित मानसिक छळ करणाऱ्या सुनेविरूध्द सासुला नाईलाजाने पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागली. याप्रकरणी फिर्यादी वृध्देच्या तक्रारीवरून नांदगाव पेठ पोलिसांनी तिच्या सुनेविरूध्द जेष्ठ नागरिक कायदा २००७ मधील कलम २४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

या कायदयानुसार नोंदविलेला या वर्षातील हा पहिला गुन्हा ठरला आहे. १७ फेब्रुवारी रोजी रात्री नांदगाव पोलिसांनी संबंधित वृध्देचे बयान नोंदवून त्या गुन्ह्याची नोंद केली. तक्रारीनुसार, वृध्देच्या आर्मीमॅन मुलाचे सन २००९ मध्ये लग्न झाले. काही दिवसांनी तो त्याच्या सेवेत परतला. तर इकडे सुनेने सासुला जेवन देणेही बंद केले. मात्र वृध्देने दुर्लक्ष केले. दरम्यान एक दिवस सुनेने घराबाहेर काढल्याने तिने एक रात्र मंदिरात देखील काढली. दरम्यान २०१७ मध्ये वृध्देचा मुलगा स्वेच्छानिवृत्त होऊन घरी परतला. तो आईचा सांभाळ करू लागला. मात्र हिला घराबाहेर काढा अन्यथा मी तिचा जीव घेते, अशी धमकी सुनेने वृध्देच्या मुलाला दिली. त्यावर पर्याय म्हणून ते दाम्पत्य वेगळे राहू लागले. दरम्यानच्या कालावधीत वृध्देच्या पतीचे निधन झाले. यामुळे त्या मुलाला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेल्या असता सुनेने त्यांना मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले. 

सांभाळ करणारे कुणी नसल्याने वृद्धेची मुलगी आईच्या भेटीला यायची. ते माहित झाल्यानंतरही सुनेने आपल्याला मारहाण केली. तुर्तास सून तिच्या मुलासह स्वतंत्र राहत असून, मुलगाच आपला सांभाळ करत असल्याचे वृध्देने सुनेविरूध्दच्या फिर्यादेत म्हटले आहे.

असा आहे जेष्ठ नागरिक कायदा -हल्ली मोठ्या प्रमाणावर मुले आई- वडिलांची सेवा किंवा सांभाळ करत नसल्याचे प्रकार समोर येतात. परिणामी उतार वयात ज्येष्ठ नागरिकांना जीवनमान जगणे अवघड होते, या सर्व अडचणीचा विचार करून सरकारमार्फत ज्येष्ठ नागरिक कायदा २००७ लागू करण्यात आला असून, या कायद्यानुसार वयस्कर आई-वडील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे या संदर्भात तक्रार करून त्यांच्या उदरनिर्वाहासाठी मासिक भत्ता मिळू शकतात.

काय आहे कलम २४ -या कायद्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांचे पालन पोषणाची जबाबदारी असलेली मुले, पालक अशा व्यक्तिंनी ज्येष्ठ नागरिकांना, कायम स्वरूपी अथवा तात्पूरते सोडून देण्याच्या उद्देशाने कृती केली असल्यास या कायद्या अंतर्गत असे करणाऱ्या व्यक्तिस तीन महिने पर्यंत तुरुंगवास अथवा पाच हजार रुपयांपर्यंतचा दंड अथवा दोनही शिक्षांची तरतूद आहे. 

टॅग्स :AmravatiअमरावतीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी