शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर महसूल राज्यमंत्र्यांचा ‘तो’ आदेश रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 22:08 IST

शासन आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निकाल दिल्यानंतरही पाच माजी सैनिकांना जमिनीचा ताबा देण्यात आला नव्हता. सीलिंग जमिनीचा ताबा मिळण्यासाठी १५ आॅगस्टपासून जिल्हा कचेरी परिसरात माजी सैनिकांनी कुटुंबीयांसह बेमुदत उपोषणास प्रारंभ केला होता. अखेर महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी दिलेला आदेश खारीज केला. यामुळे लवकरच जमिनीचा उपोषणकर्त्यांना ताबा मिळणार आहे. आदेश रद्द झाल्याबाबतचे पत्र महसूल विभागाने त्यांना दिले.

ठळक मुद्दे२८ वर्षांनंतर माजी सैनिकांना मिळाला न्याय : १४ दिवसानंतर सुटले उपोषण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासन आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निकाल दिल्यानंतरही पाच माजी सैनिकांना जमिनीचा ताबा देण्यात आला नव्हता. सीलिंग जमिनीचा ताबा मिळण्यासाठी १५ आॅगस्टपासून जिल्हा कचेरी परिसरात माजी सैनिकांनी कुटुंबीयांसह बेमुदत उपोषणास प्रारंभ केला होता. अखेर महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी दिलेला आदेश खारीज केला. यामुळे लवकरच जमिनीचा उपोषणकर्त्यांना ताबा मिळणार आहे. आदेश रद्द झाल्याबाबतचे पत्र महसूल विभागाने त्यांना दिले.महसूल राज्यमंत्री यांचे न्यायालयात (प्रकरण क्रमांक अपील २०१८/प्रक्र. ५९/ल-७) अन्वये २८ आॅगस्ट २०१८ रोजी दिलेल्या निकालानुसार शेतमालक विरुद्ध प्रतिवादी अपर आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय या प्रकरणात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम २५७ अन्वये निकालपत्र जाहीर करताना यापूर्वीचे आदेश खारीज करण्याचा निर्णय घेतला आहे. महसूल राज्यमंत्र्यांनी कागदपत्रे व युक्तिवाद तपासून मंगळवारी काढलेल्या निष्कर्षानुसार याप्रकरणी वादी शेतमालकाच्या सीलिंग कायद्यान्वये अतिरिक्त घोषित करण्यात आलेल्या जमिनींसंदर्भात हरकत व दावे याबाबत अतिरिक्त भूनिर्धारण न्यायाधिकरण, महसूल न्यायाधिकरण (नागपूर), मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाने वेळोवेळी दिलेले आदेश पारित केले आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयाने सीलिंग कायद्यांतर्गत कार्यवाही आणि सुनावणी घेण्याचे अधिकार प्राप्त नसल्याने याबाबत शेतमालकाने न्यायालयात दाद मागणे उचित होईल. न्यायालयाने पारित केलेले ५ जून २०१८ रोजी अंतरिम आदेश रद्द करून प्रकरण दाखल करण्याच्या टप्प्यावरच फेटाळणे कायदेशीर ठरेल, असे आदेश महसूल राज्यमंत्र्यांनी काढले आहे. माजी सैनिकांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाकडे आ. रवि राणा यांच्यासह अन्य सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला.माजी सैनिकांचे तब्बल १४ दिवसानंतर बेमुदत उपोषण नवनीत राणा, कमलताई गवई यांच्या हस्ते लिंबू पाणी पाजून सोडविण्यात आले. यावेळी कैलास मोेरे, सुमती ढोके, जितू दुधाने, पंजाब मडावी, दिलीप खंडारे, हिंमत ढोले, सावन मसले, सविता भटकर, अनिता वानखडे, करण गायकवाड, जगदीश वाकोेडे, योगेश घुगरे यांच्यासह उपविभागीय अधिकारी विनोद शिरभाते, तहसीलदार अजित येडे, भूमिअभिलेखचे उपअधीक्षक सचिन पवार आदी उपस्थित होते.जिल्हाधिकाऱ्यांकडे न्यायासाठी साकडेजमिनीचा ताबा मिळण्यासाठी २४ जुुुलै २०१८ रोजी अन्यायग्रस्त माजी सैनिक व भूमिहीन यांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना निवेदन दिले होते. मात्र, प्रश्न सोडविण्यात प्रशासनाला यश आले नाही. त्यामुळे १५ आॅगस्टपासून माजी सैनिक गजानन मसले, रामेश्वर शेंद्रे, शंकर मोहोड, कुरण भटकर, माना फुल्या ढोके, पंजाबराव जवंजाळ, श्रीकृष्ण इंगळे आदींनी बेमुदत उपोषण केले होते. २८ वर्षांचा संघर्षाला बुधवारी विराम मिळाला.माजी सैनिकांना शेतजमीन ताबा देणेप्रकरणी अपिल खारीज झाल्याचे पत्र मिळाले आहे. त्यानुसार नियमानुसार कार्यवाही केली जाईल. मोजणीप्रमाणे सीलिंग जमीन वाटपातील पात्र लाभार्थींना ताबा देण्याची प्रक्रिया केली जाईल.- विनोद शिरभाते, उपविभागीय अधिकारी, भातकुली.