शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
3
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
4
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
5
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
6
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
7
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
8
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
9
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
10
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
11
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
12
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
13
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
14
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
15
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
16
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
17
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
18
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
19
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
20
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू

अखेर बडनेऱ्यात रेल्वे पार्सल सुविधा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 05:01 IST

आर्थिक उत्पन्नात माघारल्याच्या कारणास्तव बडनेरा रेल्वे स्थानकावरील बंद केलेले पार्सल कार्यालय शनिवारपासून पुन्हा सुरू झाले आहे. पार्सलमधून मिळणारे उत्पन्न तीन महिन्यांपर्यंत प्रायोगिक तत्त्वावर तपासले जातील. त्यानंतर रेल्वे प्रशासन हे पार्सल सुविधा सुरू ठेवावी अथवा नाही? यावर निर्णय घेणार आहे. त्याअनुषंगाने मुंबई मध्य रेल्वे विभागाच्या महाप्रबंधकांनी ८ नोव्हेंबर रोजी अधिसूचना काढली.

ठळक मुद्देरेल्वेच्या अधिसूचना : प्रायोगिक तत्त्वावर तीन महिन्यांचे आर्थिक उत्पन्न तपासणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आर्थिक उत्पन्नात माघारल्याच्या कारणास्तव बडनेरा रेल्वे स्थानकावरील बंद केलेले पार्सल कार्यालय शनिवारपासून पुन्हा सुरू झाले आहे. पार्सलमधून मिळणारे उत्पन्न तीन महिन्यांपर्यंत प्रायोगिक तत्त्वावर तपासले जातील. त्यानंतर रेल्वे प्रशासन हे पार्सल सुविधा सुरू ठेवावी अथवा नाही? यावर निर्णय घेणार आहे. त्याअनुषंगाने मुंबई मध्य रेल्वे विभागाच्या महाप्रबंधकांनी ८ नोव्हेंबर रोजी अधिसूचना काढली.बडनेरा रेल्वे स्थानक अस्तित्वात आले तेव्हापासून येथे पार्सल कार्यालय होते. मात्र, उत्पन्न घटल्यामुळे बडनेºयातील रेल्वे पार्सल बंद करण्यात आले. त्यामुळे व्यापारी, उद्योजक, लघु व्यावसायिकांना मालाची ने-आण करण कठीण झाले. मध्यंतरी व्यावसायिकांनी खासदार नवनीत राणा यांची भेट घेत बडनेऱ्यातील पार्सल कार्यालय सुरू करण्याबाबत साकडे घातले होते. त्यानंतर नवनीत राणा यांनी मुंबईत रेल्वेच्या महाप्रबधकांना पत्र पाठवून पुन्हा पार्सल कार्यालय सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार नुकतेच मुंबई मुख्यालयाचे मुख्य वाणिज्य निरीक्षक आलोक मिश्रा यांनी बडनेरा व अमरावती रेल्वे स्थानकावरील पार्सल उत्पन्नाचा आढावा घेतला. मिश्रा यांनी काही व्यापारी, उद्योजक, नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. दरम्यान व्यावसायिकांनी बडनेरा परिसरातून शेतीमाल मुंबई, पुणेकडे पाठविताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याची बाब त्यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर आलोक मिश्रा यांनी या भेटीचा वस्तुनिष्ठ अहवाल वरिष्ठांकडे सादर केला. त्यानुसार मुंबई मध्य रेल्वे विभागाचे मुख्य वाणिज्य प्रबंधक (मालभाडे सेवा) व्ही.पी. दाहाट यांनी बडनेरा रेल्वे स्थानकावरील बंद करण्यात आलेले पार्सल कार्यालय सुरू करण्याबाबत अधिसूचना काढली आहे.बडनेरा रेल्वे स्थानकावरील बंद झालेले पार्सल कार्यालय सुरु केल्यास शेतकरी, व्यापाऱ्यांना माल बाहेरगावी पाठविणे सुकर होईल. त्याअनुषंगानेच मुंबई मध्य रेल्वे विभागाच्या महाप्रबंधकांना पत्र पाठविले. आता याचा लाभ घेत रेल्वेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा.- नवनीत रवि राणाखासदार, अमरावती

टॅग्स :railwayरेल्वे