शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
3
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
4
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
5
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
6
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
7
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
8
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
9
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
10
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
11
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
12
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
13
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
14
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
15
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
16
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
17
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
18
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
19
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान

कामगारांसाठी राज्यस्तरावर लढा उभारणार

By admin | Updated: October 11, 2016 00:22 IST

मागील तीन वर्षे आपण राज्यभरातील दिव्यांगांसाठी लढा उभारला. केंद्र शासनापर्यंत आवाज बुलंद करीत २१ पेक्षा अधिक शासन निर्णय तयार करण्याचा इतिहास झाला.

बच्चू कडू : महिनाभरात हमाल, मापारी कामगार कायदा लागू करा परतवाडा : मागील तीन वर्षे आपण राज्यभरातील दिव्यांगांसाठी लढा उभारला. केंद्र शासनापर्यंत आवाज बुलंद करीत २१ पेक्षा अधिक शासन निर्णय तयार करण्याचा इतिहास झाला. त्याच धर्तीवर आता राज्यभरातील विविध क्षेत्र, कंपन्या, बाजार समिती, गवंडी बांधकाम करणाऱ्या कामगारांसाठी सतत दोन वर्षे राज्यभर न्यायासह कायदा लागू करण्यासाठी आंदोलने उभारण्यात येणार असल्याची माहिती अचलपूरचे आ. बच्चू कडू यांनी खास ‘लोकमत’च्या विशेष मुलाखतीत दिली. अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत हमाल, मापारी, रोजंदारी कामगारांना एका महिन्यात माथाडी कामगार कायदा लागू करण्याचा इशारा देत राज्यभरातील पहिल्या कामगार न्याय आंदोलनाचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला. तीन वर्षांपूर्वी आपण अपंगांसाठी अनेक आंदोलने उभारलीत, राज्यभर ही आंदोलने गाजली, २१ पेक्षा अधिक कायदे राज्य आणि केंद्र शासनाने बनविले त्याचा फायदा राज्यभरातील ४५ लक्ष पेक्षा अधिक अपंगांना झाला. दीडशे कोटींची तरतूद झाली. अनुसूचित जाती, जमाती व आदिवासी समाजातील अंध, अपंगांना ग्रामपंचायत, नगरपालिका व महापालिकेमध्ये तीन टक्के घरकुलचा स्पेशल कोटा मंजूर करण्यात आले असल्याचे आ. बच्चू कडू यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (तालुका प्रतिनिधी)आवाज दडपण्याचा प्रयत्नराज्यभरातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कोट्यवधी कामगारांच्या समस्या सर्वाधिक प्रमाणात आहेत. वर्षानुवर्षे रात्रंदिवस काम करून सुद्धा वेठबिगारीचे वेतन देवून त्यांचे शोषण केल्या जात आहे. खासगी आणि सहकार क्षेत्र, विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगाराचा प्रश्न गंभीर आहे. तोच प्रश्न गवंडी काम करणाऱ्या मजुरांचा आहे. वर्षानुवर्षे त्यांचे शोषण केल्या जात आहे. त्यांचे आवाज दाबण्याचा सतत प्रयत्न केला जातो. शासनाचे ढीगभर कायदे पायदळी तुडवित त्यांना कवडीचा लाभ दिला जात नाही. मग या क्षेत्राचा अभ्यास करून राज्यभरातील कामगारांचा लढा उभारण्याचा निर्णय आपण घेतल्याचे आ. बच्चू कडू म्हणाले. गवंड्यांवर सुद्धा लक्षराज्यभरातील बाजार समित्यासह इतर क्षेत्रात माथाडी कामगार कायदा लागू करण्याचा शुभारंभ शुक्रवारी अचलपूर बाजार समितीमधून करण्यात आला. त्यामध्ये गवंडी बांधकाम करणाऱ्या मजुरांना सुद्धा कायद्यानुसार लाभ मिळवून देण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. कामाच्या वेळा निश्चित करणे, वेतन, सुटी, आरोग्याचा प्रश्न, भविष्य निर्वाह निधी आदी सर्व बारीक बाबींचा त्यामध्ये समावेश आहे. स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत घरेलू कामगारांना कुठेच न्याय मिळाला नाही. कायद्यात बदल करण्याची गरज वाटल्यास त्यासाठी सुद्धा मागेपुढे पाहणार नाही. शेतकरी, कष्टकऱ्यांच्या या राज्यात पुढीलदोन वर्षे कामगारांसाठी असल्याचे सांगून आ. बच्चू कडूने अचलपूर या आपल्याच मतदारसंघातून रणशिंग फुंकले.