शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
4
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
5
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
6
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
7
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
8
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
9
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
10
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
11
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
12
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
13
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
14
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
15
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
16
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
17
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
18
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
19
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
20
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!

खरिपाच्या तोंडावर खतांचा दरवाढीचा शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 05:01 IST

वास्तविकता मागच्या हंगामापासून सुरू असलेला कोरोना संकट काळ सध्याही सुरूच  आहे. त्यात लॉकडाऊन यासोबतच बियाणे, रासायनिक खतांच्या किमती वाढल्या. डिझेल दरवाढीने टॅक्टरद्वारे मशागतीचा खर्च वाढला. या सर्व विपरीत परिस्थितीत उदरनिर्वाह, मुला-मुलींचे लग्न, शिक्षण व शेतीचे नियोजन करताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. 

ठळक मुद्देउत्पादन खर्चात वाढ, शेतकऱ्यांचे मोडले कंबरडे, कसे करणार नियोजन?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दोन आठवड्यांवर आलेल्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर रासायनिक खतांच्या दरवाढीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली. चार वर्षांपासून सलग नापिकी, नैसर्गिक आपत्ती यामुळे उत्पादन खर्चही पदरी पडलेला नाही. आता पुन्हा उत्पादन खर्चात वाढ होणार असल्याने हमीभावात वाढ केव्हा, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.वास्तविकता मागच्या हंगामापासून सुरू असलेला कोरोना संकट काळ सध्याही सुरूच  आहे. त्यात लॉकडाऊन यासोबतच बियाणे, रासायनिक खतांच्या किमती वाढल्या. डिझेल दरवाढीने टॅक्टरद्वारे मशागतीचा खर्च वाढला. या सर्व विपरीत परिस्थितीत उदरनिर्वाह, मुला-मुलींचे लग्न, शिक्षण व शेतीचे नियोजन करताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे.  यंदाच्या खरीप हंगामापासून रासायनिक खतांची ५०० ते ७०० रुपयांपर्यंत दरवाढ करण्यात आलेली आहे. युरिया वगळता अन्य कुठल्याही खतांच्या किमतीवर केंद्र शासनाचे नियंत्रण नाही. खरिपात मोठी मागणी असलेल्या डीएपीच्या किमती कमी करण्यासाठी राज्य शासनाद्वारा केंद्राला विनंती केल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी अमरावती जिल्हा दौऱ्यात सांगितले. मात्र, अद्याप किमती कमी करण्यात आलेल्या नाहीत. खत निर्मितीसाठी आवश्यक सल्त्युरिक, फॉस्परिक ॲसिडच्या किमतीत वाढ झालेली आहे. चीनसह अन्य देशातून होणारी कच्च्या मालाची निर्यात सध्या बंद असल्याने रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झाल्याचे खते मंत्रालयाच्या हवाल्याने कृषी विभागाने सांगितले. दरम्यान जिल्ह्यांध्येही खतांच्या दरवाढीवरून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. याशिवाय महाआघाडीच्या पदाधिकाऱ्यांद्वारे शासनाला निवेदन पाठविण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील संचारबंदी उठताच या दरवाढीविरोधात चांगलेच रान पेटण्याचे संकेत आहेत.

जुन्या खतांच्या विक्रीवर भरारी पथकांचा वॉच विक्रेत्यांकडील जुन्या खतांची विक्री जुन्याच दराने  करण्याचे विक्रेत्यांना अनिवार्य केले आहे. ही विक्री पॉस मशीनद्वारे करावी लागणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले. वाढीव भावाने विक्री करण्याचा प्रयत्न केल्यास त्या विक्रेत्याचा परवाना रद्द करण्यात येणार आहे. या विक्रीकर जिल्ह्यातील १६ भरारी पथकांची नजर राहणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चव्हाळे यांनी सांगितले.

१८८९० मे.टन खतांची मागणीयंदाच्या खरीप हंगामासाठी १,०८,८९० मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी नोंदविण्यात आलेली आहे. यामध्ये २९,४४० मेट्रिक टन  युरिया, डीएपी २४,३९० मेट्रिक टन, एमओपी ७,२६० मेट्रिक टन, संयुक्त खते २४,३०० मेट्रिक टन, एसएसपी २३,५०० मेट्रिक टन खतांचा समावेश आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ७,६३५ मेट्रिक टन खतांची विक्री झालेली असल्याने सद्यस्थितीत जिल्ह्यात ३०,५९७ मेट्रिक टन रासायनिक खतांचा साठा उपलब्ध आहे.

२३,६९० मे.टन खतांची जुन्याच भावाने विक्री अनिवार्य जिल्ह्यात सद्यस्थितीत मागिल वर्षीचा २३,८९० मेट्रिक टन खतांचा साठा शिल्लक आहे. हा साठा जुन्याच भावाने विकावा लागणार आहे.  यामध्ये युरिया ४,८७२, डिएपी ४,०३३, संयुक्त खत ७,३६९, एसएएसपी ५,४७७, अमोनियम सल्फेट ३१४, एमओपी १,१२८ व मिश्रखते ४९७ मेट्रिक टन असा खतांचा साठा शिल्लक असल्याची माहिती कृषी विकास अधिकारी यू.आर. आगरकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :agricultureशेती