शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

४० कोटींचे धरण फुटते रे... आदिवासींमध्ये दहशत; तहसीलदारांना निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 18:16 IST

गावकरी म्हणतात, भ्रष्टाचार झाला रे...

नरेंद्र जावरे

चिखलदरा (अमरावती) : तालुक्यातील गांगरखेडा येथे दोन वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या आमपाटी प्रकल्पाच्या मुख्य विमोचकामधून गढूळ पाणी येत असल्यामुळे परिसरातील आदिवासी पाड्यांमध्ये दहशत पसरली आहे. धरण फुटण्याची भीती त्यांनी तहसीलदारांना दिलेल्या एका निवेदनातून व्यक्त केली आहे.

चिखलदरा तालुक्यात गांगरखेडा येथे जलसंपदा विभागाच्या वतीने दोन वर्षांपूर्वी आमपाटी साठवण प्रकल्प ४० कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आला. या प्रकल्पातून भविष्यात परिसरातील आदिवासी पाड्यांना पिण्याच्या पाण्यासह शेतजमिनीकरिता ओलिताची व्यवस्था होणार आहे. मात्र दोन वर्षांतच प्रकल्पाच्या जलवाहिनीतून गढूळ व मातीमिश्रित पाणी निघत असल्याने परिसरातील आदिवासींमध्ये दहशत पसरली आहे. तशा आशयाचे पत्र चिखलदरा येथील तहसीलदारांना धनराज आठोले, दुर्गेश गाठे, नरेंद्र गाठे, अतुल बिलवे, हेमंत नागले, मारुती आठोले, निंबा आठोले, मनीष नागले, संजय बेठेकर, सदानंद आठोले, गुलाब ब्राह्मणे, सुखदेव आठोले, स्नेहल नागले आदींनी दिले आहे.

पंधरा दिवसांपासून प्रयोगावर प्रयोग

प्रकल्पाच्या बाजूला असलेल्या मुख्य विमोचकामधून (एच आर) पंधरा दिवसांपासून गढूळ पाणी जात असताना जलसंपदा विभागामार्फत पानडुबीसह इतर प्रयोग करण्यात आल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. परंतु, तेथील विहिरीत आग्यामोहळ असल्यामुळे येत्या एक-दोन दिवसात मुख्य विमोचकाचे गेट उघडून पुन्हा स्वच्छ पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

निकृष्ट काम, कंत्राटदार-अधिकाऱ्यांची मर्जी?

जलसंपदा विभागाचे अधिकारी व संबंधित कंत्राटदाराच्या मर्जीप्रमाणे काळी माती न वापरता मोठ्या प्रमाणात दगड-धोंडे टाकण्यात आल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये होती. तसाच आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. धरणाच्या विहिरीच्या आउटलेटला मातीमिश्रित पाणी जात असल्याने गावकऱ्यांनी प्रकल्पाच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

प्रकल्पाच्या एचआरमधून मातीमिश्रित पाणी जात असल्याची माहिती आहे. त्याचे दार उघडून पूर्वीप्रमाणे स्वच्छ पाणी सोडण्यात येईल. धरण फुटण्याची अफवा आहे. तसे असल्यास ग्रामपंचायत व संबंधितांना त्याची माहिती देण्यात येईल.

- आकाश मानकर, कनिष्ठ अभियंता, जलसंपदा

प्रकल्पासंदर्भात गावकऱ्यांचे पत्र अप्राप्त आहे. संपूर्ण माहिती घेऊन तत्काळ संबंधित विभागाशी संपर्क साधून वरिष्ठांना तसे कळविण्यात येईल.

- माया माने, तहसीलदार, चिखलदरा

टॅग्स :agricultureशेतीAmravatiअमरावती