शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

४० कोटींचे धरण फुटते रे... आदिवासींमध्ये दहशत; तहसीलदारांना निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 18:16 IST

गावकरी म्हणतात, भ्रष्टाचार झाला रे...

नरेंद्र जावरे

चिखलदरा (अमरावती) : तालुक्यातील गांगरखेडा येथे दोन वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या आमपाटी प्रकल्पाच्या मुख्य विमोचकामधून गढूळ पाणी येत असल्यामुळे परिसरातील आदिवासी पाड्यांमध्ये दहशत पसरली आहे. धरण फुटण्याची भीती त्यांनी तहसीलदारांना दिलेल्या एका निवेदनातून व्यक्त केली आहे.

चिखलदरा तालुक्यात गांगरखेडा येथे जलसंपदा विभागाच्या वतीने दोन वर्षांपूर्वी आमपाटी साठवण प्रकल्प ४० कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आला. या प्रकल्पातून भविष्यात परिसरातील आदिवासी पाड्यांना पिण्याच्या पाण्यासह शेतजमिनीकरिता ओलिताची व्यवस्था होणार आहे. मात्र दोन वर्षांतच प्रकल्पाच्या जलवाहिनीतून गढूळ व मातीमिश्रित पाणी निघत असल्याने परिसरातील आदिवासींमध्ये दहशत पसरली आहे. तशा आशयाचे पत्र चिखलदरा येथील तहसीलदारांना धनराज आठोले, दुर्गेश गाठे, नरेंद्र गाठे, अतुल बिलवे, हेमंत नागले, मारुती आठोले, निंबा आठोले, मनीष नागले, संजय बेठेकर, सदानंद आठोले, गुलाब ब्राह्मणे, सुखदेव आठोले, स्नेहल नागले आदींनी दिले आहे.

पंधरा दिवसांपासून प्रयोगावर प्रयोग

प्रकल्पाच्या बाजूला असलेल्या मुख्य विमोचकामधून (एच आर) पंधरा दिवसांपासून गढूळ पाणी जात असताना जलसंपदा विभागामार्फत पानडुबीसह इतर प्रयोग करण्यात आल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. परंतु, तेथील विहिरीत आग्यामोहळ असल्यामुळे येत्या एक-दोन दिवसात मुख्य विमोचकाचे गेट उघडून पुन्हा स्वच्छ पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

निकृष्ट काम, कंत्राटदार-अधिकाऱ्यांची मर्जी?

जलसंपदा विभागाचे अधिकारी व संबंधित कंत्राटदाराच्या मर्जीप्रमाणे काळी माती न वापरता मोठ्या प्रमाणात दगड-धोंडे टाकण्यात आल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये होती. तसाच आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. धरणाच्या विहिरीच्या आउटलेटला मातीमिश्रित पाणी जात असल्याने गावकऱ्यांनी प्रकल्पाच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

प्रकल्पाच्या एचआरमधून मातीमिश्रित पाणी जात असल्याची माहिती आहे. त्याचे दार उघडून पूर्वीप्रमाणे स्वच्छ पाणी सोडण्यात येईल. धरण फुटण्याची अफवा आहे. तसे असल्यास ग्रामपंचायत व संबंधितांना त्याची माहिती देण्यात येईल.

- आकाश मानकर, कनिष्ठ अभियंता, जलसंपदा

प्रकल्पासंदर्भात गावकऱ्यांचे पत्र अप्राप्त आहे. संपूर्ण माहिती घेऊन तत्काळ संबंधित विभागाशी संपर्क साधून वरिष्ठांना तसे कळविण्यात येईल.

- माया माने, तहसीलदार, चिखलदरा

टॅग्स :agricultureशेतीAmravatiअमरावती