शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
6
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
7
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
8
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
9
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
10
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
11
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
12
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
13
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
14
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
15
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
16
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
17
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
18
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
19
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
20
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

एफडीए आयुक्त गंभीर

By admin | Updated: May 19, 2016 00:14 IST

अंबानगरीत कॅल्शियम कार्बाईडने आंबे पिकविले जात असलेल्या प्रकरणाची आपण माहिती घेऊन त्यासंदर्भातील अहवाल मागविण्यात येईल ..

कार्बाईडचा वापर : दोषी आढळल्यास अधिकाऱ्यांवर कारवाईसंदीप मानकर अमरावतीअंबानगरीत कॅल्शियम कार्बाईडने आंबे पिकविले जात असलेल्या प्रकरणाची आपण माहिती घेऊन त्यासंदर्भातील अहवाल मागविण्यात येईल व या प्रकरणाच्या चौकशीअंती जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, अशी गंभीर प्रतिक्रिया 'लोकमत'शी बोलताना एफडीए आयुक्त मुंबई डॉ.हर्षदीप कांबळे यांनी दिली. आंबे पिकविण्यासाठी अनेक आजारला आमंत्रण देणाऱ्या घातक अशा कॅल्शियम कार्बाईडचा वापर होत आहे. केळी, पपईसुध्दा कॅल्शियम कार्बाईडने पिकविली जात आहे. तसेच सफरचंदवर मेनाचे थर लावले जात आहे व कलिंगड लाल राहण्यासाठी रासायनिक पदार्थ इंजेकश्नव्दारे सोडले जात आहे. तसेच गुटख्यांची खुलेआम विक्री होत आहे. यासंदर्भात अन्न व औषधी प्रशासन आयुक्त हर्षदीप कांबळे यांना विचारणा केली असता, डॉ. कांबळे यांनी या प्रकरणाची दखल घेण्यात येईल व दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल. गेल्या १५ दिवसांपूर्वी 'लोकमत'ने स्टींग करुन आंबे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर होत असल्याचे सहचित्र उघड केले होते. एवढेच नाहीतर केळीे, पपई हे फळे पिकविण्यासाठी देखील कार्बाईडचा व प्रमाणापेक्षा जास्त ईथेलीन गॅसचा वापर राजोरसपणे करण्यात येत आहे. फळे विक्रेते नागरिकांना फळांसोबत कॅन्सर सारखे आजार मोफत विकत आहेत. यातून घराघरात हे गंभीर आजार फोफावत आहेत. तसेच राज्यात गुटखाबंदी असताना अमरावती जिल्हयात एफडीएचे अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे सर्वत्र खुलेआम गुटखा विक्री चालू आहे. एकही फळ असे नाही की नागरिकांनी आहारात घ्यावे, ज्यामध्ये रसायनिक पदार्थांचा वापर केल्या जात नाही. नागरिकांनी कुठल्या विश्वासाने फळे खावी, हा प्रश्न पडला आहे. सफरंचद जास्त काळ टिकावे व ते खराब होऊ नये यासाठी व्हॅक्स (मेनाचा थर) लावल्या जात आहे. चवदार कलिगंड लाल करण्यासाठी शरीराला हानीकारक असलेल्या इंजेकशनव्दारे रसायनिक द्रव्य सोडले जात आहे. हा प्रकार 'लोकमत'ने लोकदरबारात मांडून सहचित्र उघडकीस आणला. परंतु हा प्रकार रोखण्यासाठी एफडीएच्या अधिकाऱ्यांनी कुठलीही ठोस पावले उचलली नाही. आपल्या कर्तव्याचा विसर पडलेल्या अधिकाऱ्यांनी अंबानगरीतील लोकांचे आरोग्य धोक्यात असतांना अद्यापही ते कुंभकर्णी झोपेतच आहेत. त्यामुळे एफडीएचे आयुक्त हर्षदिप कांबळे यांनी दखल घेण्याचे आश्वासन दिल्यामुळे अमरावतीकरांसाठी ते एक आशेचे किरण ठरले आहे. कारण गेल्या दोन आठवडयापूर्वी अन्न व औषध पुरवठा मंत्री गिरीश बापट अमरावतीच्या दौऱ्यांवर आले असता त्यांना अमरावतीत सर्रास होत असलेला हा प्रकार पुराव्यानिशी निदर्शनास आणून दिला. यावरून ना.गिरीश बापट काही तरी ठोस कारवाई करतील, अशी अपेक्षा होती. परंतू अधिकाऱ्यांनी ना. बापटांचीही दिशाभूल करण्यात आली. बापट खाली हात परत गेले. परंतु एफडीएच्या आयुक्तांकडून कारवाईची अपेक्षा आहे.