शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

एफडीए आयुक्त गंभीर

By admin | Updated: May 19, 2016 00:14 IST

अंबानगरीत कॅल्शियम कार्बाईडने आंबे पिकविले जात असलेल्या प्रकरणाची आपण माहिती घेऊन त्यासंदर्भातील अहवाल मागविण्यात येईल ..

कार्बाईडचा वापर : दोषी आढळल्यास अधिकाऱ्यांवर कारवाईसंदीप मानकर अमरावतीअंबानगरीत कॅल्शियम कार्बाईडने आंबे पिकविले जात असलेल्या प्रकरणाची आपण माहिती घेऊन त्यासंदर्भातील अहवाल मागविण्यात येईल व या प्रकरणाच्या चौकशीअंती जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, अशी गंभीर प्रतिक्रिया 'लोकमत'शी बोलताना एफडीए आयुक्त मुंबई डॉ.हर्षदीप कांबळे यांनी दिली. आंबे पिकविण्यासाठी अनेक आजारला आमंत्रण देणाऱ्या घातक अशा कॅल्शियम कार्बाईडचा वापर होत आहे. केळी, पपईसुध्दा कॅल्शियम कार्बाईडने पिकविली जात आहे. तसेच सफरचंदवर मेनाचे थर लावले जात आहे व कलिंगड लाल राहण्यासाठी रासायनिक पदार्थ इंजेकश्नव्दारे सोडले जात आहे. तसेच गुटख्यांची खुलेआम विक्री होत आहे. यासंदर्भात अन्न व औषधी प्रशासन आयुक्त हर्षदीप कांबळे यांना विचारणा केली असता, डॉ. कांबळे यांनी या प्रकरणाची दखल घेण्यात येईल व दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल. गेल्या १५ दिवसांपूर्वी 'लोकमत'ने स्टींग करुन आंबे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर होत असल्याचे सहचित्र उघड केले होते. एवढेच नाहीतर केळीे, पपई हे फळे पिकविण्यासाठी देखील कार्बाईडचा व प्रमाणापेक्षा जास्त ईथेलीन गॅसचा वापर राजोरसपणे करण्यात येत आहे. फळे विक्रेते नागरिकांना फळांसोबत कॅन्सर सारखे आजार मोफत विकत आहेत. यातून घराघरात हे गंभीर आजार फोफावत आहेत. तसेच राज्यात गुटखाबंदी असताना अमरावती जिल्हयात एफडीएचे अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे सर्वत्र खुलेआम गुटखा विक्री चालू आहे. एकही फळ असे नाही की नागरिकांनी आहारात घ्यावे, ज्यामध्ये रसायनिक पदार्थांचा वापर केल्या जात नाही. नागरिकांनी कुठल्या विश्वासाने फळे खावी, हा प्रश्न पडला आहे. सफरंचद जास्त काळ टिकावे व ते खराब होऊ नये यासाठी व्हॅक्स (मेनाचा थर) लावल्या जात आहे. चवदार कलिगंड लाल करण्यासाठी शरीराला हानीकारक असलेल्या इंजेकशनव्दारे रसायनिक द्रव्य सोडले जात आहे. हा प्रकार 'लोकमत'ने लोकदरबारात मांडून सहचित्र उघडकीस आणला. परंतु हा प्रकार रोखण्यासाठी एफडीएच्या अधिकाऱ्यांनी कुठलीही ठोस पावले उचलली नाही. आपल्या कर्तव्याचा विसर पडलेल्या अधिकाऱ्यांनी अंबानगरीतील लोकांचे आरोग्य धोक्यात असतांना अद्यापही ते कुंभकर्णी झोपेतच आहेत. त्यामुळे एफडीएचे आयुक्त हर्षदिप कांबळे यांनी दखल घेण्याचे आश्वासन दिल्यामुळे अमरावतीकरांसाठी ते एक आशेचे किरण ठरले आहे. कारण गेल्या दोन आठवडयापूर्वी अन्न व औषध पुरवठा मंत्री गिरीश बापट अमरावतीच्या दौऱ्यांवर आले असता त्यांना अमरावतीत सर्रास होत असलेला हा प्रकार पुराव्यानिशी निदर्शनास आणून दिला. यावरून ना.गिरीश बापट काही तरी ठोस कारवाई करतील, अशी अपेक्षा होती. परंतू अधिकाऱ्यांनी ना. बापटांचीही दिशाभूल करण्यात आली. बापट खाली हात परत गेले. परंतु एफडीएच्या आयुक्तांकडून कारवाईची अपेक्षा आहे.