शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
5
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
6
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
7
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
8
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
9
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
10
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
11
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
12
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
13
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
14
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
15
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
16
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
17
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
18
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
19
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
20
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण

केवायसी केली तरच मिळणार शेतकऱ्यांना शेतकरी पेन्शन योजनेचे दोन हजार रुपये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 05:01 IST

केंद्र शासनाद्वारा देण्यात येणाऱ्या दोन हजार रुपयांच्या मदतीसाठी अनेक बोगस नावे असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे केवायसी केल्यानंतरच शेतकऱ्यांना ११वा हप्ता मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यावरच त्यांच्या बँक खात्यात आता दहावा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. जिल्ह्यात साधारणपणे एक लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झालेली असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती :  शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या पीएम शेतकरी सन्मान योजनेचा दहावा हप्ता शेतकऱ्यांना चार दिवसांपूर्वी प्राप्त झाला आहे. मात्र, शेकडो शेतकऱ्यांनी त्यांचे खाते या योजनेशी आधार लिंक, केवायसी न केल्यामुळे त्यांचा निधी अद्याप प्रलंबित आहे. आता याकरिता ३१ मार्च ही डेडलाईन देण्यात आल्याने शेतकऱ्यांची धावपळ सुरु झाली आहे.केंद्र शासनाद्वारा देण्यात येणाऱ्या दोन हजार रुपयांच्या मदतीसाठी अनेक बोगस नावे असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे केवायसी केल्यानंतरच शेतकऱ्यांना ११वा हप्ता मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यावरच त्यांच्या बँक खात्यात आता दहावा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. जिल्ह्यात साधारणपणे एक लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झालेली असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.यानंतर एप्रिल महिन्यात अकरावा हप्ता जमा होणार आहे. केंद्र शासनाने सन २०१९मध्ये ही योजना सुरू केली. यासाठी जिल्ह्यातील ३,३८,४४५ शेतकऱ्यांनी पोर्टलवर नोंदणी केलेली आहे. मात्र, अजून बऱ्याच शेतकऱ्यांनी केवायसी न केल्याने त्यांना आर्थिक मदत मिळण्यास अडचण होणार आहे.

१० हप्ते बँकेत जमापंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत आतापर्यंत १,११,२६८ शेतकऱ्यांना दोन हजाराचे प्रत्येकी १० हप्ते मिळाले. यात पहिला हप्ता ३,२२,८५८ शेतकऱ्यांना मिळाला. त्यानंतर खात्यांची पडताळणी झाल्याने अपात्र शेतकरी कमी होत गेले. या योजनेत ८,२१४ अपात्र शेतकऱ्यांना ५.५६ कोटींची मदत देण्यात आली आहे. ही रक्कम वसूलपात्र आहे. यामध्ये ७.७६ लाख आतापर्यंत वसूल करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

कसे कराल केवायसीमोबाईलवर पंतप्रधान किसान पोर्टल उघडून त्यावर फार्मर कॉर्नर पर्याय दिसेल, त्याखाली केवायसीवर क्लिक करा. ई-केवायसी डॅशबोर्ड दिसेल, तेथे आधार व त्याच्याशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाकून सेंड ओटीपीवर क्लिक करा व आलेला ओटीपी सबमिट करावा.

केवायसीसाठी ३१ मार्च डेडलाइनया योजनेत आतापर्यंत दहा हप्ते शेतकऱ्यांना प्राप्त आहेत. मात्र, अकराव्या हप्त्यापूर्वी केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी शेतकऱ्यांना ३१ मार्च ही डेडलाइन देण्यात आली आहे. शेतकरी आपल्या मोबाइलवरून किंवा सीएससी सेंटरवरून केवायसी करू शकतात.

 

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना