शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

केवायसी केली तरच मिळणार शेतकऱ्यांना शेतकरी पेन्शन योजनेचे दोन हजार रुपये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 05:01 IST

केंद्र शासनाद्वारा देण्यात येणाऱ्या दोन हजार रुपयांच्या मदतीसाठी अनेक बोगस नावे असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे केवायसी केल्यानंतरच शेतकऱ्यांना ११वा हप्ता मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यावरच त्यांच्या बँक खात्यात आता दहावा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. जिल्ह्यात साधारणपणे एक लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झालेली असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती :  शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या पीएम शेतकरी सन्मान योजनेचा दहावा हप्ता शेतकऱ्यांना चार दिवसांपूर्वी प्राप्त झाला आहे. मात्र, शेकडो शेतकऱ्यांनी त्यांचे खाते या योजनेशी आधार लिंक, केवायसी न केल्यामुळे त्यांचा निधी अद्याप प्रलंबित आहे. आता याकरिता ३१ मार्च ही डेडलाईन देण्यात आल्याने शेतकऱ्यांची धावपळ सुरु झाली आहे.केंद्र शासनाद्वारा देण्यात येणाऱ्या दोन हजार रुपयांच्या मदतीसाठी अनेक बोगस नावे असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे केवायसी केल्यानंतरच शेतकऱ्यांना ११वा हप्ता मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यावरच त्यांच्या बँक खात्यात आता दहावा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. जिल्ह्यात साधारणपणे एक लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झालेली असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.यानंतर एप्रिल महिन्यात अकरावा हप्ता जमा होणार आहे. केंद्र शासनाने सन २०१९मध्ये ही योजना सुरू केली. यासाठी जिल्ह्यातील ३,३८,४४५ शेतकऱ्यांनी पोर्टलवर नोंदणी केलेली आहे. मात्र, अजून बऱ्याच शेतकऱ्यांनी केवायसी न केल्याने त्यांना आर्थिक मदत मिळण्यास अडचण होणार आहे.

१० हप्ते बँकेत जमापंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत आतापर्यंत १,११,२६८ शेतकऱ्यांना दोन हजाराचे प्रत्येकी १० हप्ते मिळाले. यात पहिला हप्ता ३,२२,८५८ शेतकऱ्यांना मिळाला. त्यानंतर खात्यांची पडताळणी झाल्याने अपात्र शेतकरी कमी होत गेले. या योजनेत ८,२१४ अपात्र शेतकऱ्यांना ५.५६ कोटींची मदत देण्यात आली आहे. ही रक्कम वसूलपात्र आहे. यामध्ये ७.७६ लाख आतापर्यंत वसूल करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

कसे कराल केवायसीमोबाईलवर पंतप्रधान किसान पोर्टल उघडून त्यावर फार्मर कॉर्नर पर्याय दिसेल, त्याखाली केवायसीवर क्लिक करा. ई-केवायसी डॅशबोर्ड दिसेल, तेथे आधार व त्याच्याशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाकून सेंड ओटीपीवर क्लिक करा व आलेला ओटीपी सबमिट करावा.

केवायसीसाठी ३१ मार्च डेडलाइनया योजनेत आतापर्यंत दहा हप्ते शेतकऱ्यांना प्राप्त आहेत. मात्र, अकराव्या हप्त्यापूर्वी केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी शेतकऱ्यांना ३१ मार्च ही डेडलाइन देण्यात आली आहे. शेतकरी आपल्या मोबाइलवरून किंवा सीएससी सेंटरवरून केवायसी करू शकतात.

 

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना