शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

केवायसी केली तरच मिळणार शेतकऱ्यांना शेतकरी पेन्शन योजनेचे दोन हजार रुपये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 05:01 IST

केंद्र शासनाद्वारा देण्यात येणाऱ्या दोन हजार रुपयांच्या मदतीसाठी अनेक बोगस नावे असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे केवायसी केल्यानंतरच शेतकऱ्यांना ११वा हप्ता मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यावरच त्यांच्या बँक खात्यात आता दहावा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. जिल्ह्यात साधारणपणे एक लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झालेली असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती :  शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या पीएम शेतकरी सन्मान योजनेचा दहावा हप्ता शेतकऱ्यांना चार दिवसांपूर्वी प्राप्त झाला आहे. मात्र, शेकडो शेतकऱ्यांनी त्यांचे खाते या योजनेशी आधार लिंक, केवायसी न केल्यामुळे त्यांचा निधी अद्याप प्रलंबित आहे. आता याकरिता ३१ मार्च ही डेडलाईन देण्यात आल्याने शेतकऱ्यांची धावपळ सुरु झाली आहे.केंद्र शासनाद्वारा देण्यात येणाऱ्या दोन हजार रुपयांच्या मदतीसाठी अनेक बोगस नावे असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे केवायसी केल्यानंतरच शेतकऱ्यांना ११वा हप्ता मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यावरच त्यांच्या बँक खात्यात आता दहावा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. जिल्ह्यात साधारणपणे एक लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झालेली असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.यानंतर एप्रिल महिन्यात अकरावा हप्ता जमा होणार आहे. केंद्र शासनाने सन २०१९मध्ये ही योजना सुरू केली. यासाठी जिल्ह्यातील ३,३८,४४५ शेतकऱ्यांनी पोर्टलवर नोंदणी केलेली आहे. मात्र, अजून बऱ्याच शेतकऱ्यांनी केवायसी न केल्याने त्यांना आर्थिक मदत मिळण्यास अडचण होणार आहे.

१० हप्ते बँकेत जमापंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत आतापर्यंत १,११,२६८ शेतकऱ्यांना दोन हजाराचे प्रत्येकी १० हप्ते मिळाले. यात पहिला हप्ता ३,२२,८५८ शेतकऱ्यांना मिळाला. त्यानंतर खात्यांची पडताळणी झाल्याने अपात्र शेतकरी कमी होत गेले. या योजनेत ८,२१४ अपात्र शेतकऱ्यांना ५.५६ कोटींची मदत देण्यात आली आहे. ही रक्कम वसूलपात्र आहे. यामध्ये ७.७६ लाख आतापर्यंत वसूल करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

कसे कराल केवायसीमोबाईलवर पंतप्रधान किसान पोर्टल उघडून त्यावर फार्मर कॉर्नर पर्याय दिसेल, त्याखाली केवायसीवर क्लिक करा. ई-केवायसी डॅशबोर्ड दिसेल, तेथे आधार व त्याच्याशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाकून सेंड ओटीपीवर क्लिक करा व आलेला ओटीपी सबमिट करावा.

केवायसीसाठी ३१ मार्च डेडलाइनया योजनेत आतापर्यंत दहा हप्ते शेतकऱ्यांना प्राप्त आहेत. मात्र, अकराव्या हप्त्यापूर्वी केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी शेतकऱ्यांना ३१ मार्च ही डेडलाइन देण्यात आली आहे. शेतकरी आपल्या मोबाइलवरून किंवा सीएससी सेंटरवरून केवायसी करू शकतात.

 

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना