शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

केवायसी केली तरच मिळणार शेतकऱ्यांना शेतकरी पेन्शन योजनेचे दोन हजार रुपये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 05:01 IST

केंद्र शासनाद्वारा देण्यात येणाऱ्या दोन हजार रुपयांच्या मदतीसाठी अनेक बोगस नावे असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे केवायसी केल्यानंतरच शेतकऱ्यांना ११वा हप्ता मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यावरच त्यांच्या बँक खात्यात आता दहावा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. जिल्ह्यात साधारणपणे एक लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झालेली असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती :  शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या पीएम शेतकरी सन्मान योजनेचा दहावा हप्ता शेतकऱ्यांना चार दिवसांपूर्वी प्राप्त झाला आहे. मात्र, शेकडो शेतकऱ्यांनी त्यांचे खाते या योजनेशी आधार लिंक, केवायसी न केल्यामुळे त्यांचा निधी अद्याप प्रलंबित आहे. आता याकरिता ३१ मार्च ही डेडलाईन देण्यात आल्याने शेतकऱ्यांची धावपळ सुरु झाली आहे.केंद्र शासनाद्वारा देण्यात येणाऱ्या दोन हजार रुपयांच्या मदतीसाठी अनेक बोगस नावे असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे केवायसी केल्यानंतरच शेतकऱ्यांना ११वा हप्ता मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यावरच त्यांच्या बँक खात्यात आता दहावा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. जिल्ह्यात साधारणपणे एक लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झालेली असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.यानंतर एप्रिल महिन्यात अकरावा हप्ता जमा होणार आहे. केंद्र शासनाने सन २०१९मध्ये ही योजना सुरू केली. यासाठी जिल्ह्यातील ३,३८,४४५ शेतकऱ्यांनी पोर्टलवर नोंदणी केलेली आहे. मात्र, अजून बऱ्याच शेतकऱ्यांनी केवायसी न केल्याने त्यांना आर्थिक मदत मिळण्यास अडचण होणार आहे.

१० हप्ते बँकेत जमापंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत आतापर्यंत १,११,२६८ शेतकऱ्यांना दोन हजाराचे प्रत्येकी १० हप्ते मिळाले. यात पहिला हप्ता ३,२२,८५८ शेतकऱ्यांना मिळाला. त्यानंतर खात्यांची पडताळणी झाल्याने अपात्र शेतकरी कमी होत गेले. या योजनेत ८,२१४ अपात्र शेतकऱ्यांना ५.५६ कोटींची मदत देण्यात आली आहे. ही रक्कम वसूलपात्र आहे. यामध्ये ७.७६ लाख आतापर्यंत वसूल करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

कसे कराल केवायसीमोबाईलवर पंतप्रधान किसान पोर्टल उघडून त्यावर फार्मर कॉर्नर पर्याय दिसेल, त्याखाली केवायसीवर क्लिक करा. ई-केवायसी डॅशबोर्ड दिसेल, तेथे आधार व त्याच्याशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाकून सेंड ओटीपीवर क्लिक करा व आलेला ओटीपी सबमिट करावा.

केवायसीसाठी ३१ मार्च डेडलाइनया योजनेत आतापर्यंत दहा हप्ते शेतकऱ्यांना प्राप्त आहेत. मात्र, अकराव्या हप्त्यापूर्वी केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी शेतकऱ्यांना ३१ मार्च ही डेडलाइन देण्यात आली आहे. शेतकरी आपल्या मोबाइलवरून किंवा सीएससी सेंटरवरून केवायसी करू शकतात.

 

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना