शहरं
Join us  
Trending Stories
1
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
2
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले
5
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
6
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
7
"लग्नानंतर ४ वर्षांनी घटस्फोट झाला आणि...", Divorce बद्दल पहिल्यांदाच बोलला स्वप्नील जोशी
8
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
9
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
10
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
11
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
13
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
14
घरातल्या कमोडमध्ये झाला मोठा धमाका, वेस्टर्न टॉयलेटचा स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी!
15
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
16
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
17
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
18
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
19
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
20
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ

‘पीएम किसान सन्मान’साठी शेतकरी प्रतीक्षेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 06:00 IST

योजनेसाठी खातेदार शेतकऱ्यांचा सात-बारा, गाव नमुना ८, आधार कार्ड, बँक खातेक्रमांक आदी माहिती केंद्र शासनाच्या संकेत स्थळावर अपलोड करण्यात आली. यापैकी पहिल्या टप्प्यात १ लाख ५२ हजार ९०१ शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजारांचा हप्ता पाठविण्यात आला. यापैकी १ लाख ४२ हजार ४७४ शेतकऱ्यांना हे मानधन मिळाले, तर उर्वरित ८ हजार ८६० शेतकऱ्यांना त्रुटीमुळे ही रक्कम मिळू शकलेली नाही.

ठळक मुद्देसंडे अँकर । बहुतेकांना पहिलाच हप्ता नाही; वर्षभरापासून प्रक्रिया, हेलपाट्यांना नाही पारावार

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षाला सहा हजार रुपये मानधन देण्याची योजना सुरू केली. या योजनेसाठी जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ३९ हजार ७०५ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविलेला आहे. हा डेटा केंद्र शासनालादेखील पाठविण्यात आला. यापैकी बहुतेकांना दोन हजारांचा पहिला हप्ताच मिळालेला नाही. शेतकरी अद्यापही प्रतीक्षेतच आहेत.केंद्र शासनाने गतवर्षीच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दरवर्षी दोन हजार रुपये प्रतिहप्ता याप्रमाणे तीन हप्त्यात प्रत्येकी सहा हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. या योजनेसाठी जिल्ह्यात २,३९,७०५ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. जिल्हा प्रशासनाने हा डेटा केंद्र शासनाला पाठविला. यामध्ये ८,१६५ शेतकºयांच्या माहितीत त्रुटी आढळून आल्यात. यापैकी ११९ शेतकऱ्यांनी मागील महिन्यापर्यंत त्रुटीची पूर्तता केली असली तरी अद्यापही ८,०४६ शेतकऱ्यांची माहिती अपूर्णच आहे. त्यामुळे त्यांना लाभ मिळालेला नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.योजनेसाठी खातेदार शेतकऱ्यांचा सात-बारा, गाव नमुना ८, आधार कार्ड, बँक खातेक्रमांक आदी माहिती केंद्र शासनाच्या संकेत स्थळावर अपलोड करण्यात आली. यापैकी पहिल्या टप्प्यात १ लाख ५२ हजार ९०१ शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजारांचा हप्ता पाठविण्यात आला. यापैकी १ लाख ४२ हजार ४७४ शेतकऱ्यांना हे मानधन मिळाले, तर उर्वरित ८ हजार ८६० शेतकऱ्यांना त्रुटीमुळे ही रक्कम मिळू शकलेली नाही.दुसऱ्या टप्प्यात १ लाख २७ हजार ६९८ शेतकऱ्यांना मानधन पाठविण्यात आले. यापैकी १ लाख १८ हजार ३९८ शेतकºया हे मानधन मिळाले. उर्वरित १०६ शेतकऱ्यांच्या खात्यात हे मानधन जमा झालेले नाही.तिसऱ्या टप्प्यात ६५ हजार ८८ शेतकऱ्यांना मानधन पाठविण्यात आले. यापैकी ४६ हजार १२ शेतकऱ्यांच्या खात्यात मानधन जमा झाले, तर ५४ शेतकऱ्यांना त्रुटीमुळे हे मानधन जमा झाले नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.पाच टक्के लाभार्थींची पडताळणीयोजनेचे अंमलबजावणी प्रमुख तथा राज्याचे कृषी आयुक्त यांच्या निर्देशानुसार प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळालेल्या पाच टक्के लाभार्थींची पडताळणी करण्याचे आदेश दिले होते. यामध्ये २.५ टक्के नावे केंद्र शासनस्तरावरून देण्यात आली, तर २.५ टक्के लाभार्थी निवड जिल्हाधिकाऱ्यांना करावयाची होती. त्यानुसार डिसेंबर महिन्यात या पाच टक्के लाभार्थींची पडताळणी करण्यात आलेली आहे. त्यानंतरही वंचित शेतकऱ्यांना मानधन मिळालेले नाही.योजनेत तालुकानिहाय शेतकरी सहभागयोजनेमध्ये अचलपूर तालुक्यातील १९ हजार ५५० शेतकरी, अमरावती १४ हजार २३२, अंजनगाव सुर्जी १८ हजार ४०३, भातकुली १३ हजार ९६२, चांदूर रेल्वे १२ हजार ८०७, चांदूर बाजार २१ हजार १०९, चिखलदरा १२ हजार ४१५, दर्यापूर १९ हजार ६५०, धामणगाव रेल्वे १७ हजार ६८७, धारणी १५ हजार ७८५, मोर्शी १८ हजार ७४१, नांदगाव खंडेश्वर १८ हजार २०८, तिवसा १५ हजार ९९४ आणि वरूड तालुक्यातील २१ हजार ९९४ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना