शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

‘पीएम किसान सन्मान’साठी शेतकरी प्रतीक्षेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 06:00 IST

योजनेसाठी खातेदार शेतकऱ्यांचा सात-बारा, गाव नमुना ८, आधार कार्ड, बँक खातेक्रमांक आदी माहिती केंद्र शासनाच्या संकेत स्थळावर अपलोड करण्यात आली. यापैकी पहिल्या टप्प्यात १ लाख ५२ हजार ९०१ शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजारांचा हप्ता पाठविण्यात आला. यापैकी १ लाख ४२ हजार ४७४ शेतकऱ्यांना हे मानधन मिळाले, तर उर्वरित ८ हजार ८६० शेतकऱ्यांना त्रुटीमुळे ही रक्कम मिळू शकलेली नाही.

ठळक मुद्देसंडे अँकर । बहुतेकांना पहिलाच हप्ता नाही; वर्षभरापासून प्रक्रिया, हेलपाट्यांना नाही पारावार

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षाला सहा हजार रुपये मानधन देण्याची योजना सुरू केली. या योजनेसाठी जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ३९ हजार ७०५ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविलेला आहे. हा डेटा केंद्र शासनालादेखील पाठविण्यात आला. यापैकी बहुतेकांना दोन हजारांचा पहिला हप्ताच मिळालेला नाही. शेतकरी अद्यापही प्रतीक्षेतच आहेत.केंद्र शासनाने गतवर्षीच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दरवर्षी दोन हजार रुपये प्रतिहप्ता याप्रमाणे तीन हप्त्यात प्रत्येकी सहा हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. या योजनेसाठी जिल्ह्यात २,३९,७०५ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. जिल्हा प्रशासनाने हा डेटा केंद्र शासनाला पाठविला. यामध्ये ८,१६५ शेतकºयांच्या माहितीत त्रुटी आढळून आल्यात. यापैकी ११९ शेतकऱ्यांनी मागील महिन्यापर्यंत त्रुटीची पूर्तता केली असली तरी अद्यापही ८,०४६ शेतकऱ्यांची माहिती अपूर्णच आहे. त्यामुळे त्यांना लाभ मिळालेला नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.योजनेसाठी खातेदार शेतकऱ्यांचा सात-बारा, गाव नमुना ८, आधार कार्ड, बँक खातेक्रमांक आदी माहिती केंद्र शासनाच्या संकेत स्थळावर अपलोड करण्यात आली. यापैकी पहिल्या टप्प्यात १ लाख ५२ हजार ९०१ शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजारांचा हप्ता पाठविण्यात आला. यापैकी १ लाख ४२ हजार ४७४ शेतकऱ्यांना हे मानधन मिळाले, तर उर्वरित ८ हजार ८६० शेतकऱ्यांना त्रुटीमुळे ही रक्कम मिळू शकलेली नाही.दुसऱ्या टप्प्यात १ लाख २७ हजार ६९८ शेतकऱ्यांना मानधन पाठविण्यात आले. यापैकी १ लाख १८ हजार ३९८ शेतकºया हे मानधन मिळाले. उर्वरित १०६ शेतकऱ्यांच्या खात्यात हे मानधन जमा झालेले नाही.तिसऱ्या टप्प्यात ६५ हजार ८८ शेतकऱ्यांना मानधन पाठविण्यात आले. यापैकी ४६ हजार १२ शेतकऱ्यांच्या खात्यात मानधन जमा झाले, तर ५४ शेतकऱ्यांना त्रुटीमुळे हे मानधन जमा झाले नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.पाच टक्के लाभार्थींची पडताळणीयोजनेचे अंमलबजावणी प्रमुख तथा राज्याचे कृषी आयुक्त यांच्या निर्देशानुसार प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळालेल्या पाच टक्के लाभार्थींची पडताळणी करण्याचे आदेश दिले होते. यामध्ये २.५ टक्के नावे केंद्र शासनस्तरावरून देण्यात आली, तर २.५ टक्के लाभार्थी निवड जिल्हाधिकाऱ्यांना करावयाची होती. त्यानुसार डिसेंबर महिन्यात या पाच टक्के लाभार्थींची पडताळणी करण्यात आलेली आहे. त्यानंतरही वंचित शेतकऱ्यांना मानधन मिळालेले नाही.योजनेत तालुकानिहाय शेतकरी सहभागयोजनेमध्ये अचलपूर तालुक्यातील १९ हजार ५५० शेतकरी, अमरावती १४ हजार २३२, अंजनगाव सुर्जी १८ हजार ४०३, भातकुली १३ हजार ९६२, चांदूर रेल्वे १२ हजार ८०७, चांदूर बाजार २१ हजार १०९, चिखलदरा १२ हजार ४१५, दर्यापूर १९ हजार ६५०, धामणगाव रेल्वे १७ हजार ६८७, धारणी १५ हजार ७८५, मोर्शी १८ हजार ७४१, नांदगाव खंडेश्वर १८ हजार २०८, तिवसा १५ हजार ९९४ आणि वरूड तालुक्यातील २१ हजार ९९४ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना