शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

अर्ज करुनही शेतकऱ्यांना वीज जोडणीची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 13:08 IST

Amravati : नवीन कनेक्शनकडे दुर्लक्ष, वाढोणा रामनाथ परिसरातील शेती ओलितापासून वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कवाढोणा रामनाथ : शेतात विहीर आहे. काहींकडे बोअरवेल आहे. त्याला मुबलक पाणी आहे. त्यामुळे शेतात दुबार पीक घेऊन उत्पन्न वाढविण्याची, त्यासाठी परिश्रम घेण्याची शेतकऱ्यांची तयारी असली तरी वीज जोडणीसाठी त्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाढोणा रामनाथ परिसरातील शेतकऱ्यांची ही व्यथा आहे.

काही शेतकऱ्यांकडे शेतामध्ये विहिरी आहेत. त्यामध्ये मुबलक पाणी आहे. परंतु, नवीन वीज जोडणी गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना देणे बंद करण्यात आल्याने पाणी असूनही ओलिताची पिके घेता येत नाहीत. गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांनी वीज कनेक्शनकरिता महावितरणकडे अर्ज केला. परंतु, त्यावर आजपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. वाढोणा येथील शेतकरी प्रफुल्ल वडवाले यांनी सन २०१६ मध्ये महावितरणकडे वीजपुरवठ्यासाठी ६२०० रुपयांचा भरणा केला होता. त्यांनी अनेक चकरा महावितरण कार्यालयाकडे मारल्या. परंतु त्याचा काही उपयोग झालेला नाही. बागायती शेती करण्यापासून महावितरणने वंचित ठेवल्याचा त्यांचा आक्षेप आहे.

सौरऊर्जेची सक्तीशेतकऱ्यांनी शेतामध्ये सौरऊर्जाचलित वीजपुरवठा घेऊन ओलिताची शेती करावी, असा अलिखित नियम महावितरणकडे आहे. परंतु, माकडे व इतर वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे सोलर पॅनलची तूटफूट होते आणि वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे हा पर्याय महागडा ठरत आहे. महावितरणकडे वीज जोडणीबाबत विचारणा केल्यास, सौरऊर्जा संयंत्रावर ९० टक्के अनुदान आहे, ते घ्या, असा धोशा लावला जात असल्याचे शेतकयांचे म्हणणे आहे.

३० ऑगस्ट २०२३ पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरलेले आहेत, त्यांनाच वीज कनेक्शन देण्यात येत आहे. त्यानंतर येणाऱ्या अर्जासाठी फंड नसल्यामुळे वीज पुरवठा करणे बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सौरऊर्जेचा वापर करावा.- सुनील शिंदे, अधीक्षक अभियंता, महावितरण 

टॅग्स :electricityवीजFarmerशेतकरीfarmingशेतीAmravatiअमरावती