शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
3
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
4
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
5
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
6
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
7
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
8
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
9
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
10
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
11
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
12
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
13
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
14
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
15
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
16
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
17
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
18
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
19
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
20
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अर्ज करुनही शेतकऱ्यांना वीज जोडणीची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 13:08 IST

Amravati : नवीन कनेक्शनकडे दुर्लक्ष, वाढोणा रामनाथ परिसरातील शेती ओलितापासून वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कवाढोणा रामनाथ : शेतात विहीर आहे. काहींकडे बोअरवेल आहे. त्याला मुबलक पाणी आहे. त्यामुळे शेतात दुबार पीक घेऊन उत्पन्न वाढविण्याची, त्यासाठी परिश्रम घेण्याची शेतकऱ्यांची तयारी असली तरी वीज जोडणीसाठी त्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाढोणा रामनाथ परिसरातील शेतकऱ्यांची ही व्यथा आहे.

काही शेतकऱ्यांकडे शेतामध्ये विहिरी आहेत. त्यामध्ये मुबलक पाणी आहे. परंतु, नवीन वीज जोडणी गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना देणे बंद करण्यात आल्याने पाणी असूनही ओलिताची पिके घेता येत नाहीत. गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांनी वीज कनेक्शनकरिता महावितरणकडे अर्ज केला. परंतु, त्यावर आजपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. वाढोणा येथील शेतकरी प्रफुल्ल वडवाले यांनी सन २०१६ मध्ये महावितरणकडे वीजपुरवठ्यासाठी ६२०० रुपयांचा भरणा केला होता. त्यांनी अनेक चकरा महावितरण कार्यालयाकडे मारल्या. परंतु त्याचा काही उपयोग झालेला नाही. बागायती शेती करण्यापासून महावितरणने वंचित ठेवल्याचा त्यांचा आक्षेप आहे.

सौरऊर्जेची सक्तीशेतकऱ्यांनी शेतामध्ये सौरऊर्जाचलित वीजपुरवठा घेऊन ओलिताची शेती करावी, असा अलिखित नियम महावितरणकडे आहे. परंतु, माकडे व इतर वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे सोलर पॅनलची तूटफूट होते आणि वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे हा पर्याय महागडा ठरत आहे. महावितरणकडे वीज जोडणीबाबत विचारणा केल्यास, सौरऊर्जा संयंत्रावर ९० टक्के अनुदान आहे, ते घ्या, असा धोशा लावला जात असल्याचे शेतकयांचे म्हणणे आहे.

३० ऑगस्ट २०२३ पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरलेले आहेत, त्यांनाच वीज कनेक्शन देण्यात येत आहे. त्यानंतर येणाऱ्या अर्जासाठी फंड नसल्यामुळे वीज पुरवठा करणे बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सौरऊर्जेचा वापर करावा.- सुनील शिंदे, अधीक्षक अभियंता, महावितरण 

टॅग्स :electricityवीजFarmerशेतकरीfarmingशेतीAmravatiअमरावती