शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

संत्र्याची झाडे तोडून मरणाचे रचणार सरण; मुख्यमंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2022 15:29 IST

महावितरणच्या कारभाराला कंटाळले शेतकरी

परतवाडा (अमरावती) : अचलपूर तालुक्यातील शेतकरी वीज वितरण कंपनीच्या कारभाराला कंटाळले आहेत. यातच सहायक अभियंत्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करीत खंडित वीजपुरवठ्याने त्रस्त जवळापूर येथील शेतकरी गणराज कडू यांनी शेतातील संत्रा झाडे तोडून त्यावर शेतातच मरणाचे सरण रचणार असल्याचा इशारा मुख्यमंत्र्यांसह अधिकाऱ्यांना दिला आहे.

महावितरण कंपनीची स्थानिक यंत्रणा शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे. दिलेल्या तक्रारींची दखल वेळेत ते घेत नाहीत. यात शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यादरम्यान वीज वितरण कंपनीच्या कारभाराने त्रस्त गणराज कडू हे ७ डिसेंबरला आपल्या शेतीतील ४०० संत्रा झाडे तोडणार आहेत. या अनुषंगाने गणराज कडू यांनी २८ नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांकडे सविस्तर लेखी निवेदन पाठविले. लाइन सुरू असतानाही दिलेल्या दिवसाला वीज मिळत नाही. २०१७ पासून वेळोवेळी विद्युत पुरवठा खंडित होत आहे. पिकाला पाणी वेळेवर मिळत नाही. यासंबंधी तक्रारीही दिल्यात, निवेदने दिलीत. सूचनावजा विनंतीही केली, पण त्याची दखल अधिकारी घेत नाहीत.

एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारी आणि निवेदन महावितरणच्या संबंधित स्थानिक कार्यालयातून गहाळ केल्या जातात. शेतकऱ्यांनी सुचविलेल्या उपाययोजना न करता, आवश्यक डीबी न देता मनात येईल त्याप्रमाणे स्थानिक यंत्रणा काम करीत आहेत. यात शेतकऱ्यांना विश्वासात घेतले जात नाही, असे मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात गणराज कडू यांनी नमूद केले आहे.

सहायक अभियंता राहतील जबाबदार

पथ्रोट येथील सहायक अभियंत्यावर शेतकऱ्यांचा रोष आहे. संत्रा झाडे तोडून मरणाचे सरण रचताना होणाऱ्या नुकसानास हे सहायक अभियंताच जबाबदार राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात गणराज कडू यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

गणराज कडू यांच्या निवेदनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे. अधीक्षक अभियंत्यांसह मुख्य अभियंत्यांना आवश्यक निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांचे पत्र वरिष्ठांना प्राप्त झाले असल्याची खात्रीशीर माहिती आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAmravatiअमरावती