शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
3
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
4
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
5
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
6
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
7
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
8
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
9
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
10
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
11
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
12
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
13
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
14
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
15
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
16
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
17
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
18
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
19
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
20
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
Daily Top 2Weekly Top 5

संत्र्याची झाडे तोडून मरणाचे रचणार सरण; मुख्यमंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2022 15:29 IST

महावितरणच्या कारभाराला कंटाळले शेतकरी

परतवाडा (अमरावती) : अचलपूर तालुक्यातील शेतकरी वीज वितरण कंपनीच्या कारभाराला कंटाळले आहेत. यातच सहायक अभियंत्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करीत खंडित वीजपुरवठ्याने त्रस्त जवळापूर येथील शेतकरी गणराज कडू यांनी शेतातील संत्रा झाडे तोडून त्यावर शेतातच मरणाचे सरण रचणार असल्याचा इशारा मुख्यमंत्र्यांसह अधिकाऱ्यांना दिला आहे.

महावितरण कंपनीची स्थानिक यंत्रणा शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे. दिलेल्या तक्रारींची दखल वेळेत ते घेत नाहीत. यात शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यादरम्यान वीज वितरण कंपनीच्या कारभाराने त्रस्त गणराज कडू हे ७ डिसेंबरला आपल्या शेतीतील ४०० संत्रा झाडे तोडणार आहेत. या अनुषंगाने गणराज कडू यांनी २८ नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांकडे सविस्तर लेखी निवेदन पाठविले. लाइन सुरू असतानाही दिलेल्या दिवसाला वीज मिळत नाही. २०१७ पासून वेळोवेळी विद्युत पुरवठा खंडित होत आहे. पिकाला पाणी वेळेवर मिळत नाही. यासंबंधी तक्रारीही दिल्यात, निवेदने दिलीत. सूचनावजा विनंतीही केली, पण त्याची दखल अधिकारी घेत नाहीत.

एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारी आणि निवेदन महावितरणच्या संबंधित स्थानिक कार्यालयातून गहाळ केल्या जातात. शेतकऱ्यांनी सुचविलेल्या उपाययोजना न करता, आवश्यक डीबी न देता मनात येईल त्याप्रमाणे स्थानिक यंत्रणा काम करीत आहेत. यात शेतकऱ्यांना विश्वासात घेतले जात नाही, असे मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात गणराज कडू यांनी नमूद केले आहे.

सहायक अभियंता राहतील जबाबदार

पथ्रोट येथील सहायक अभियंत्यावर शेतकऱ्यांचा रोष आहे. संत्रा झाडे तोडून मरणाचे सरण रचताना होणाऱ्या नुकसानास हे सहायक अभियंताच जबाबदार राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात गणराज कडू यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

गणराज कडू यांच्या निवेदनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे. अधीक्षक अभियंत्यांसह मुख्य अभियंत्यांना आवश्यक निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांचे पत्र वरिष्ठांना प्राप्त झाले असल्याची खात्रीशीर माहिती आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAmravatiअमरावती