शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
2
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
3
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
4
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
5
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
6
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
7
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
8
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
9
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
10
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
11
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
12
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
13
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
14
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
15
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
16
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
17
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
18
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
19
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
20
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल

शेतकरीपूरक योजनेला हरताळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 23:45 IST

राज्यातील प्रत्येक महापालिका, नगरपालिका, जिल्हा मुख्यालये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी आठवडी बाजाराच्या जागेसाठी आरक्षणाची तरतूद करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.

ठळक मुद्देप्रशासनाची अनास्थामैदाने खुली नाहीतचजनजागृतीची वानवा

प्रदीप भाकरे।आॅनलाईन लोकमतअमरावती : राज्यातील प्रत्येक महापालिका, नगरपालिका, जिल्हा मुख्यालये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी आठवडी बाजाराच्या जागेसाठी आरक्षणाची तरतूद करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.महापालिका क्षेत्रात तीन ते चार मैदाने दर शनिवारी किंवा रविवारी उपलब्ध करून द्यावीत, असे निर्देश २४ आॅगस्ट २०१६ रोजी देण्यात आले होते. प्रत्यक्षात एकही मैदान उपलब्ध करण्याचे सौजन्य महापालिका प्रशासनाने दाखविले नाही. यातून जिल्हास्तर व नगर परिषद प्रशासनाचीही शेतकºयांप्रति अनास्था प्रकर्षाने अधोरेखित झाली आहे.शेतकरी बाजारामध्ये शेतकºयांनी पिकविलेल्या मालाला चांगला भाव, ग्राहकांना ताजी फळे व भाज्या वाजवी दरात उपलब्ध व्हाव्यात, यासाठी राज्यात संतशिरोमणी सावता माळी शेतकरी आठवडी बाजार अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी ज्या ठिकाणी आठवडी बाजाराच्या जागेसाठी आरक्षणाची आवश्यकता असेल, त्या ठिकाणी आरक्षणाची तरतूद करण्यात यावी , असे निर्देश नगरविकास विभागाने दिले होते. प्रत्यक्षात तशी कुठलीही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.महापालिकेकडे कुणी फिरकेनाशेतकºयांना त्यांच्याकडील भाज्या, फळे, अन्नधान्य आणि इतर कृषी उत्पादने थेट विक्रीसाठी महापालिका-नगरपालिका यांनी त्यांच्या कार्यालयाच्या आवारात, त्यांच्या भाजी मंडईत तसेच नगरपालिका क्षेत्रात किमान एक मैदान व महापालिका क्षेत्रात तीन ते चार मैदाने, दर शनिवारी किंवा रविवारी उपलब्ध करून द्यावीत, असे निर्देश होते. या शेतकरी बाजाराकरिता शेड उभारावेत, अशा सूचना होत्या. त्यानुसार काही नागरी स्थानिक संस्थांनी अंमलबजावणी सुरू केली आहे. मात्र, अनेक महापालिका आणि नगरपालिकेत जनजागृतीअभावी हे शेतकरी बाजार सुरू न झाल्याची वस्तुस्थिती आहे. शहरातील सध्या अस्तिवात असलेल्या भाजी मंडीमध्ये १० ते १५ टक्के गाळे वा मोकळी जागा शेतकरी उत्पादक गट वा उत्पादक कंपनींना उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश आहेत. तथापि, ज्या ठिकाणी आठवडे बाजाराच्या जागेसाठी आरक्षणाची आवश्यकता असेल, त्या ठिकाणी आरक्षणाची तरतूद करण्यात यावी. या सूचना कागदोपत्री राहिल्या आहेत. शहरातील कुठल्याही मैदानावर शनिवारी आणि रविवारी असा बाजार भरण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.नाइलाजाने पदपथावर पथारीशहरालगतच्या सुकळी, वनारसी व अन्य भागांतून अनेक शेतकरी त्यांच्या शेतातील ताजा माल शहरात विक्रीसाठी आणतात. मात्र, इतवारा बाजारात त्यांना बसू दिले जात नाही. त्यामुळे चित्रा चौकासह श्याम चौक, सरोज चौक, गाडगेनगर भागात या शेतकºयांना पदपथावर बसावे लागते. प्रसंगी त्यांचा मालावर अतिक्रमण निर्मूलन पथकाची वक्र नजर पडते. वास्तविक, जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या सायन्स कोअर मैदानासह दसरा मैदान, गाडगेबाबा समाधी मंदिरासमोरील मैदान, नैहरू मैदान असे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, प्रशासनाला शेतकºयांचे सोयरसुतक नसल्याने योजनेचा बट्ट्याबोळ झाला आहे.अमरावती तहसील परिसरात अनधिकृत बाजारअमरावती तहसील परिसरासह अनधिकृत बाजार भरतो. या भागात अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या अधिक आहे. तो नियमबाह्य प्रकार टाळण्यासाठी हे अभियान प्रभावी असताना केवळ लालफीतशाहीमुळे चांगल्या योजनेला ग्रहण लागले आहे. या योजनेची अंमलबजावणी वा त्याबाबत जनजागृती करण्यात न आल्याने शेतकरी महापालिका वा अन्य स्थानिक संस्थांकडे फिरकले नाहीत आणि प्रशासनानेही त्यासाठी फारसे प्रयत्न केले नाहीत.