शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजाचा संयम सुटला, कपाशीची लागवड सुरू  

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: June 27, 2023 15:17 IST

पावसाचा खंड राहिल्यास संकट, १५ हजार हेक्टरवर कोरड्यातच पेरणी

अमरावती : पावसाचे दोन नक्षत्र अन् जून महिना संपत आल्याने काही शेतकऱ्यांनी मान्सून येणार असल्याच्या वार्तेने कोरड्यातच कपाशीची लागवड सुरू केल्याचे दिसून येते. सद्य:स्थितीत जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड झाल्याचा अंदाज आहे. पाऊस न आल्यास पेरण्या उलटण्याची भीती आहे.

पाऊस नसल्याने ६० दिवसांच्या कालावधीत येणारे मूग व उडदाचे पीक आता बाद झाले आहे. १५ जुलैपर्यंत सोयाबीन, तूर व कपाशीची नियमित पेरता येते व त्यानंतर मात्र २० टक्के बियाणे जास्त वापरून लवकर येणारे वाण पेरणे व आंतरपिकाला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण व हलक्या पावसाची काही ठिकाणी नोंद होत आहे. याशिवाय मान्सून सक्रिय झाल्याच्या भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) वार्तेनंतर काही भागांत कोरड्यातच पेरण्या सुरू झाल्या आहेत. पाऊस येणार आहे. त्यामुळे पुरेसी ओल झाल्याशिवाय, तसेच ८० ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय खरिपाची पेरणी करू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

कपाशीची १० हजार हेक्टरमध्ये लागवड

जिल्ह्यात सद्य:स्थितीत १५ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली आहे. यामध्ये सर्वाधिक ९,४४१ हेक्टरमध्ये कपाशी, १७०३ हेक्टरमध्ये सोयाबीन, २२९६ हेक्टरमध्ये तूर, २८ हेक्टर धान, २८ हेक्टर ज्वारी, ७५ हेक्टरमध्ये मक्याची पेरणी झालेली आहे. सर्वाधिक पाच हजार हेक्टरवर पेरणी वरूड तालुक्यात झालेली आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊसFarmerशेतकरीcottonकापूस