शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

बळीराजाचा संयम सुटला, कपाशीची लागवड सुरू  

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: June 27, 2023 15:17 IST

पावसाचा खंड राहिल्यास संकट, १५ हजार हेक्टरवर कोरड्यातच पेरणी

अमरावती : पावसाचे दोन नक्षत्र अन् जून महिना संपत आल्याने काही शेतकऱ्यांनी मान्सून येणार असल्याच्या वार्तेने कोरड्यातच कपाशीची लागवड सुरू केल्याचे दिसून येते. सद्य:स्थितीत जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड झाल्याचा अंदाज आहे. पाऊस न आल्यास पेरण्या उलटण्याची भीती आहे.

पाऊस नसल्याने ६० दिवसांच्या कालावधीत येणारे मूग व उडदाचे पीक आता बाद झाले आहे. १५ जुलैपर्यंत सोयाबीन, तूर व कपाशीची नियमित पेरता येते व त्यानंतर मात्र २० टक्के बियाणे जास्त वापरून लवकर येणारे वाण पेरणे व आंतरपिकाला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण व हलक्या पावसाची काही ठिकाणी नोंद होत आहे. याशिवाय मान्सून सक्रिय झाल्याच्या भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) वार्तेनंतर काही भागांत कोरड्यातच पेरण्या सुरू झाल्या आहेत. पाऊस येणार आहे. त्यामुळे पुरेसी ओल झाल्याशिवाय, तसेच ८० ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय खरिपाची पेरणी करू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

कपाशीची १० हजार हेक्टरमध्ये लागवड

जिल्ह्यात सद्य:स्थितीत १५ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली आहे. यामध्ये सर्वाधिक ९,४४१ हेक्टरमध्ये कपाशी, १७०३ हेक्टरमध्ये सोयाबीन, २२९६ हेक्टरमध्ये तूर, २८ हेक्टर धान, २८ हेक्टर ज्वारी, ७५ हेक्टरमध्ये मक्याची पेरणी झालेली आहे. सर्वाधिक पाच हजार हेक्टरवर पेरणी वरूड तालुक्यात झालेली आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊसFarmerशेतकरीcottonकापूस