शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

दिवाळीच्या दिवशी शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन; नुकसानभरपाई न मिळाल्याने सरकारचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2022 18:34 IST

आठ ते दहा दिवसांमध्ये ही समस्या निकाली न निघाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वपक्षीय ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. 

वनोजा बाग (अमरावती) : शासनाने दिलेली आश्वासाने फसवी आहेत. दिवाळीपूर्वी शेतकरी, गोरगरीब, कष्टकरी यांची दिवाळी अंधारात ठेवणाऱ्या महाराष्ट्र शासनाचा निषेध करण्यासाठी तालुक्यातील ग्राम भंडारज येथे शेतकऱ्यांनी सोमवार २४ ऑक्टोबर दिवाळीला अन्नत्याग आंदोलन करून निषेध नोंदविला.

राज्यात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या चार महिन्यांमध्ये झालेल्या संततधार पावसामुळे सोयाबीन, कापूस, संत्रा, लिंबू, केळी, मुंग, उडीद, तूर पिकांचे पूर्णतः नुकसान झाले. या सर्व पिकांचे शासनाने पंचनामे करून दिवाळीपूर्वी पिकांची नुकसानभरपाई व स्वस्त धान्य दुकानामार्फत आनंदाचा शिधा वाटप करून शेतकऱ्यांची दिवाळी आम्ही साजरी करणार, असे आश्वासन दिले होते. परंतु, प्रत्यक्षात मात्र हे आश्वासन कागदावरच राहिले. पिकाचा दाणाही शेतकऱ्याच्या घरात गेला नाही. परिणामी शेतकऱ्यांचे जीवन पूर्णतः उद्ध्वस्त झाले. अनेक निवेदनांतून शेतकऱ्यांनी वारंवार नुकसानभरपाईची मागणी केली; परंतु तरीही त्यांच्यावर दिवाळीच्या दिवशी उपाशी राहण्याची वेळ आली. आठ ते दहा दिवसांमध्ये ही समस्या निकाली न निघाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वपक्षीय ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. 

अधिवेशनात प्रश्न मांडू

शासनाच्या शेतकऱ्यांप्रति असलेल्या उदासीन धोरणाचा हा प्रतीकात्मक निषेध आहे. दिवाळीपूर्वी मदत मिळणे गरजेचे होते. माझा या आंदोलनाला पाठिंबा असून, हा विषय विधिमंडळात मांडला जाईल.

- बळवंत वानखडे, आमदार

आठ दिवसांत मिळेल मदत

पावसामुळे झालेले नुकसान व आनंदाचा शिधा ही दोन्ही आश्वासने दिवाळीपूर्वी सरकारने पूर्ण करावयाची होती. परंतु, काही कारणास्तव ती पूर्ण होऊ शकली नाही. येत्या आठ-दहा दिवसांत ही आश्वासने पूर्ण होतील.

- रमेश बुंदीले, माजी आमदार

टॅग्स :agitationआंदोलनFarmerशेतकरीagricultureशेतीAmravatiअमरावती