शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

दिवाळीच्या दिवशी शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन; नुकसानभरपाई न मिळाल्याने सरकारचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2022 18:34 IST

आठ ते दहा दिवसांमध्ये ही समस्या निकाली न निघाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वपक्षीय ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. 

वनोजा बाग (अमरावती) : शासनाने दिलेली आश्वासाने फसवी आहेत. दिवाळीपूर्वी शेतकरी, गोरगरीब, कष्टकरी यांची दिवाळी अंधारात ठेवणाऱ्या महाराष्ट्र शासनाचा निषेध करण्यासाठी तालुक्यातील ग्राम भंडारज येथे शेतकऱ्यांनी सोमवार २४ ऑक्टोबर दिवाळीला अन्नत्याग आंदोलन करून निषेध नोंदविला.

राज्यात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या चार महिन्यांमध्ये झालेल्या संततधार पावसामुळे सोयाबीन, कापूस, संत्रा, लिंबू, केळी, मुंग, उडीद, तूर पिकांचे पूर्णतः नुकसान झाले. या सर्व पिकांचे शासनाने पंचनामे करून दिवाळीपूर्वी पिकांची नुकसानभरपाई व स्वस्त धान्य दुकानामार्फत आनंदाचा शिधा वाटप करून शेतकऱ्यांची दिवाळी आम्ही साजरी करणार, असे आश्वासन दिले होते. परंतु, प्रत्यक्षात मात्र हे आश्वासन कागदावरच राहिले. पिकाचा दाणाही शेतकऱ्याच्या घरात गेला नाही. परिणामी शेतकऱ्यांचे जीवन पूर्णतः उद्ध्वस्त झाले. अनेक निवेदनांतून शेतकऱ्यांनी वारंवार नुकसानभरपाईची मागणी केली; परंतु तरीही त्यांच्यावर दिवाळीच्या दिवशी उपाशी राहण्याची वेळ आली. आठ ते दहा दिवसांमध्ये ही समस्या निकाली न निघाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वपक्षीय ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. 

अधिवेशनात प्रश्न मांडू

शासनाच्या शेतकऱ्यांप्रति असलेल्या उदासीन धोरणाचा हा प्रतीकात्मक निषेध आहे. दिवाळीपूर्वी मदत मिळणे गरजेचे होते. माझा या आंदोलनाला पाठिंबा असून, हा विषय विधिमंडळात मांडला जाईल.

- बळवंत वानखडे, आमदार

आठ दिवसांत मिळेल मदत

पावसामुळे झालेले नुकसान व आनंदाचा शिधा ही दोन्ही आश्वासने दिवाळीपूर्वी सरकारने पूर्ण करावयाची होती. परंतु, काही कारणास्तव ती पूर्ण होऊ शकली नाही. येत्या आठ-दहा दिवसांत ही आश्वासने पूर्ण होतील.

- रमेश बुंदीले, माजी आमदार

टॅग्स :agitationआंदोलनFarmerशेतकरीagricultureशेतीAmravatiअमरावती