शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
2
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
3
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
4
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
5
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
6
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
7
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
8
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
9
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
10
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
11
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला
12
Pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
13
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
14
महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी
15
"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...
16
TATA Motors ला ₹२,३८,६१,६६,००,००० चं मोठं नुकसान! JLR वर सायबर हल्ला; उत्पादन थांबलं, शेअर्समध्ये मोठी घसरण
17
हृदयद्रावक! नवरात्रीत मोठी दुर्घटना; देवीच्या मंडपात अचानक पसरला करंट; २ मुलांचा मृत्यू
18
मूलबाळ नसलेल्या हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कुणाला मिळणार?; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
19
३०० पानांमध्ये लिहिलेत बाबाचे काळे कारनामे; इंस्टिट्यूटमध्ये होता टॉर्चर चेंबर! दिल्लीत खळबळ
20
GST मध्ये आणखी कपातीचे पंतप्रधान मोदींचे संकेत; म्हणाले, "आम्ही इकडेच थांबवणार नाही..."

शेतमालाला किफायतशीर भाव मिळण्यासाठी संघर्ष करावाच लागले - राजू शेट्टी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2017 18:28 IST

विदर्भातील शेतक-यांनी शांत न राहता शेतमालाला किफायतशीर भाव मिळण्यासाठी संघर्ष करावाच लागले, याशिवाय सरकारला जाग येणार नाही. शेतमालाला किफायतशीर भाव मिळवायचा असेल तर सरकाशी दोन  हात करण्याची तयारी सुरू करा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केले. 

- प्रभाकर भगोले चांदूररेल्वे (अमरावती) : विदर्भातील शेतक-यांनी शांत न राहता शेतमालाला किफायतशीर भाव मिळण्यासाठी संघर्ष करावाच लागले, याशिवाय सरकारला जाग येणार नाही. शेतमालाला किफायतशीर भाव मिळवायचा असेल तर सरकाशी दोन  हात करण्याची तयारी सुरू करा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केले. ते चांदूर बाजार तालुक्यातील आमला विश्वेश्वर येथे हजारो शेतक-यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या दुष्काळ परिषदेत बोलत होते. यावेळी वस्त्रोद्योग मंडळाचे माजी अध्यक्ष रवींद्र तुपकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित अढावू, प्रवीण मोहोड, अंकूश कडू, अतुल ढोके, नगरसेवक बच्चू वानरे, पूजा मोरे, आशिष वानखडे, संजय ठाकरे, आशिष वानखडे उपस्थित होते. ऊस उत्पादक शेतक-यांचा दाखला देत राजू शेट्टी म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी ऊस आंदोलन करताना छातीवर गोळ्या झेलण्यासाठी आम्ही तयार होतो. विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी देवाची मदत ही अपेक्षा बाळगून आहे. याचमुळे सरकार विदर्भ व मराठवाड्यावर अन्याय करीत आहे. महाराष्ट्रात अद्याप सन १९५५ च्या कायद्याची अंमलबजावणी झाली नाही. शेतमालाचे किमान भावाची संपूर्ण जबाबदारी राज्य शासनाची आहे. त्यानुसार बाजारभाव कितीही खाली आला तरी सरकारला योग्य हमी शेतक-याच्या शेतीमालाला द्यावाच लागेल. मात्र, आपण शेतकरी भाजप नेत्याच्या भुलथापांना बळी पडलो, असेही खासदार शेट्टी म्हणाले.  

पाठीत खंजीर खुपसला भाजपा सरकारने स्वाभिमानी शेतकरी संघटनेची युती केली व आम्हीही त्यांना पाठिंबा जाहीर केला. परंतु, शेतक-याच्या पाठीत खंजीर खुपसण्याची भूमिका फडणवीस सरकारने घेतल्याने आम्ही सरकारचा सातत्याने विरोध करीत आहोत, असे वस्त्रोद्योग मंडळाचे माजी अध्यक्ष रवींद्र तुपकर म्हणाले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीAmravatiअमरावती