शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत - रवि राणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:01 IST

आमदार राणा यांनी विधानसभा निवडणुकीत तिसºयांदा विजय संपादन करून नवा विक्रम घडविला. बडनेरा मतदारसंघाच्या स्थापनेपासून यापूर्वी कुणीही सलग तीनवेळा निवडून आले नव्हते. आमदार रवि राणा यांच्या जोडीला खासदार नवनीत राणा यादेखील असल्यामुळे त्यांच्याकडून विकासाच्या शक्यता वाढल्या आहेत. पती अपक्ष आमदार आणि पत्नी अपक्ष खासदार असलेले देशभरातील हे एकमेव जोडपे ठरले आहे.

ठळक मुद्देअचलपूर जिल्ह्याची निर्मितीही : भातकुलीत तीन महिन्यांत तहसील कार्यालय

गणेश देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्ककधी नव्हे ती सर्वांनी एकजूट करून मला हरविण्याचा प्रयत्न केला असला तरी बडनेºयाच्या जनतेनेच तिसऱ्यांदा विधानसभेत पाठविले. जनतेच्या या विश्वासाचे ऋण बडनेरा मतदारसंघाचा बारामतीसम विकास करून फेडणार असल्याच्या भावना आमदार रवि राणा यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केल्या. खासदार नवनीत राणा यादेखील चर्चेदरम्यान उपस्थित होत्या.आमदार राणा यांनी विधानसभा निवडणुकीत तिसºयांदा विजय संपादन करून नवा विक्रम घडविला. बडनेरा मतदारसंघाच्या स्थापनेपासून यापूर्वी कुणीही सलग तीनवेळा निवडून आले नव्हते. आमदार रवि राणा यांच्या जोडीला खासदार नवनीत राणा यादेखील असल्यामुळे त्यांच्याकडून विकासाच्या शक्यता वाढल्या आहेत. पती अपक्ष आमदार आणि पत्नी अपक्ष खासदार असलेले देशभरातील हे एकमेव जोडपे ठरले आहे.शेतकºयांसाठी बडनेरा मतदारसंघात थेट शेतमाल विक्रीसाठीचे संकुल निर्माण करण्याचा निर्धार आमदार राणा यांनी व्यक्त केला. भाजीपाला आणि इतर शेतमालासोबतच पानउत्पादक शेतकºयांकरिता पानविक्रीसाठीचे नवे दालन उघडण्याची योजना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बडनेरा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पानांचे उत्पादन केले जाते. त्यांना गतवैभव प्राप्त व्हावे, हा त्यामागे उद्देश असल्याचे ते म्हणाले.रखडलेले विमानतळ, वॅगन निर्मिती केंद्र लवकरच पूर्ण केले जाईल. रेल्वे जंक्शन असलेल्या बडनेºयात मॉडेल रेल्वे स्टेशन आणि वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती केली जाईल. जिल्हाभरातील महिलांसाठी केवळ महिलाच कर्मचारी आणि अधिकारी असलेले पोलीस ठाणे निर्माण करूया. महिला, मुलींचा सन्मान राखला जावा, त्या सुरक्षित असाव्यात, त्यांच्यावर कुणी अन्याय केलाच, तर त्याच्या मुसक्या आवळण्याचे काम संवेदनशीलपणे व्हावे, यासाठी हे महिला पोलीस ठाणे महत्त्वाची भूमिका निभावेल, असा विश्वास आमदार-खासदार राणा दाम्पत्याने व्यक्त केला. भातकुली तहसील कार्यालय भातकुली शहरात स्थलांतरित करण्याच्या निर्णयाची अंंमलबजावणी तीन महिन्यांत केली जाईल, असे ठासून सांगताना अचलपूर जिल्ह्याच्या निर्मितीची प्रक्रिया नजीकच्या काळात आरंभली जाईल, या वचनाची स्वत:च आठवण करून देण्यासही ते विसरले नाहीत.शिवसेना, भाजप, काही स्थानिक नेते यांनी एकत्र येऊन मला हरविण्याचा संकल्प सोडला होता. परंतु, जनतेने माझी साथ सोडली नाही. विकास हाच आमचा ध्यास असल्याचे पुनरुद्गार राणा दाम्पत्याने काढले.

टॅग्स :Socialसामाजिक