शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानावर बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
2
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
3
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
4
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
5
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
6
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
7
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
8
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
9
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
10
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
11
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
12
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
13
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
14
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
15
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
16
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
17
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
18
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
19
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
20
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?

शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत - रवि राणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:01 IST

आमदार राणा यांनी विधानसभा निवडणुकीत तिसºयांदा विजय संपादन करून नवा विक्रम घडविला. बडनेरा मतदारसंघाच्या स्थापनेपासून यापूर्वी कुणीही सलग तीनवेळा निवडून आले नव्हते. आमदार रवि राणा यांच्या जोडीला खासदार नवनीत राणा यादेखील असल्यामुळे त्यांच्याकडून विकासाच्या शक्यता वाढल्या आहेत. पती अपक्ष आमदार आणि पत्नी अपक्ष खासदार असलेले देशभरातील हे एकमेव जोडपे ठरले आहे.

ठळक मुद्देअचलपूर जिल्ह्याची निर्मितीही : भातकुलीत तीन महिन्यांत तहसील कार्यालय

गणेश देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्ककधी नव्हे ती सर्वांनी एकजूट करून मला हरविण्याचा प्रयत्न केला असला तरी बडनेºयाच्या जनतेनेच तिसऱ्यांदा विधानसभेत पाठविले. जनतेच्या या विश्वासाचे ऋण बडनेरा मतदारसंघाचा बारामतीसम विकास करून फेडणार असल्याच्या भावना आमदार रवि राणा यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केल्या. खासदार नवनीत राणा यादेखील चर्चेदरम्यान उपस्थित होत्या.आमदार राणा यांनी विधानसभा निवडणुकीत तिसºयांदा विजय संपादन करून नवा विक्रम घडविला. बडनेरा मतदारसंघाच्या स्थापनेपासून यापूर्वी कुणीही सलग तीनवेळा निवडून आले नव्हते. आमदार रवि राणा यांच्या जोडीला खासदार नवनीत राणा यादेखील असल्यामुळे त्यांच्याकडून विकासाच्या शक्यता वाढल्या आहेत. पती अपक्ष आमदार आणि पत्नी अपक्ष खासदार असलेले देशभरातील हे एकमेव जोडपे ठरले आहे.शेतकºयांसाठी बडनेरा मतदारसंघात थेट शेतमाल विक्रीसाठीचे संकुल निर्माण करण्याचा निर्धार आमदार राणा यांनी व्यक्त केला. भाजीपाला आणि इतर शेतमालासोबतच पानउत्पादक शेतकºयांकरिता पानविक्रीसाठीचे नवे दालन उघडण्याची योजना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बडनेरा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पानांचे उत्पादन केले जाते. त्यांना गतवैभव प्राप्त व्हावे, हा त्यामागे उद्देश असल्याचे ते म्हणाले.रखडलेले विमानतळ, वॅगन निर्मिती केंद्र लवकरच पूर्ण केले जाईल. रेल्वे जंक्शन असलेल्या बडनेºयात मॉडेल रेल्वे स्टेशन आणि वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती केली जाईल. जिल्हाभरातील महिलांसाठी केवळ महिलाच कर्मचारी आणि अधिकारी असलेले पोलीस ठाणे निर्माण करूया. महिला, मुलींचा सन्मान राखला जावा, त्या सुरक्षित असाव्यात, त्यांच्यावर कुणी अन्याय केलाच, तर त्याच्या मुसक्या आवळण्याचे काम संवेदनशीलपणे व्हावे, यासाठी हे महिला पोलीस ठाणे महत्त्वाची भूमिका निभावेल, असा विश्वास आमदार-खासदार राणा दाम्पत्याने व्यक्त केला. भातकुली तहसील कार्यालय भातकुली शहरात स्थलांतरित करण्याच्या निर्णयाची अंंमलबजावणी तीन महिन्यांत केली जाईल, असे ठासून सांगताना अचलपूर जिल्ह्याच्या निर्मितीची प्रक्रिया नजीकच्या काळात आरंभली जाईल, या वचनाची स्वत:च आठवण करून देण्यासही ते विसरले नाहीत.शिवसेना, भाजप, काही स्थानिक नेते यांनी एकत्र येऊन मला हरविण्याचा संकल्प सोडला होता. परंतु, जनतेने माझी साथ सोडली नाही. विकास हाच आमचा ध्यास असल्याचे पुनरुद्गार राणा दाम्पत्याने काढले.

टॅग्स :Socialसामाजिक