शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत - रवि राणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:01 IST

आमदार राणा यांनी विधानसभा निवडणुकीत तिसºयांदा विजय संपादन करून नवा विक्रम घडविला. बडनेरा मतदारसंघाच्या स्थापनेपासून यापूर्वी कुणीही सलग तीनवेळा निवडून आले नव्हते. आमदार रवि राणा यांच्या जोडीला खासदार नवनीत राणा यादेखील असल्यामुळे त्यांच्याकडून विकासाच्या शक्यता वाढल्या आहेत. पती अपक्ष आमदार आणि पत्नी अपक्ष खासदार असलेले देशभरातील हे एकमेव जोडपे ठरले आहे.

ठळक मुद्देअचलपूर जिल्ह्याची निर्मितीही : भातकुलीत तीन महिन्यांत तहसील कार्यालय

गणेश देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्ककधी नव्हे ती सर्वांनी एकजूट करून मला हरविण्याचा प्रयत्न केला असला तरी बडनेºयाच्या जनतेनेच तिसऱ्यांदा विधानसभेत पाठविले. जनतेच्या या विश्वासाचे ऋण बडनेरा मतदारसंघाचा बारामतीसम विकास करून फेडणार असल्याच्या भावना आमदार रवि राणा यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केल्या. खासदार नवनीत राणा यादेखील चर्चेदरम्यान उपस्थित होत्या.आमदार राणा यांनी विधानसभा निवडणुकीत तिसºयांदा विजय संपादन करून नवा विक्रम घडविला. बडनेरा मतदारसंघाच्या स्थापनेपासून यापूर्वी कुणीही सलग तीनवेळा निवडून आले नव्हते. आमदार रवि राणा यांच्या जोडीला खासदार नवनीत राणा यादेखील असल्यामुळे त्यांच्याकडून विकासाच्या शक्यता वाढल्या आहेत. पती अपक्ष आमदार आणि पत्नी अपक्ष खासदार असलेले देशभरातील हे एकमेव जोडपे ठरले आहे.शेतकºयांसाठी बडनेरा मतदारसंघात थेट शेतमाल विक्रीसाठीचे संकुल निर्माण करण्याचा निर्धार आमदार राणा यांनी व्यक्त केला. भाजीपाला आणि इतर शेतमालासोबतच पानउत्पादक शेतकºयांकरिता पानविक्रीसाठीचे नवे दालन उघडण्याची योजना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बडनेरा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पानांचे उत्पादन केले जाते. त्यांना गतवैभव प्राप्त व्हावे, हा त्यामागे उद्देश असल्याचे ते म्हणाले.रखडलेले विमानतळ, वॅगन निर्मिती केंद्र लवकरच पूर्ण केले जाईल. रेल्वे जंक्शन असलेल्या बडनेºयात मॉडेल रेल्वे स्टेशन आणि वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती केली जाईल. जिल्हाभरातील महिलांसाठी केवळ महिलाच कर्मचारी आणि अधिकारी असलेले पोलीस ठाणे निर्माण करूया. महिला, मुलींचा सन्मान राखला जावा, त्या सुरक्षित असाव्यात, त्यांच्यावर कुणी अन्याय केलाच, तर त्याच्या मुसक्या आवळण्याचे काम संवेदनशीलपणे व्हावे, यासाठी हे महिला पोलीस ठाणे महत्त्वाची भूमिका निभावेल, असा विश्वास आमदार-खासदार राणा दाम्पत्याने व्यक्त केला. भातकुली तहसील कार्यालय भातकुली शहरात स्थलांतरित करण्याच्या निर्णयाची अंंमलबजावणी तीन महिन्यांत केली जाईल, असे ठासून सांगताना अचलपूर जिल्ह्याच्या निर्मितीची प्रक्रिया नजीकच्या काळात आरंभली जाईल, या वचनाची स्वत:च आठवण करून देण्यासही ते विसरले नाहीत.शिवसेना, भाजप, काही स्थानिक नेते यांनी एकत्र येऊन मला हरविण्याचा संकल्प सोडला होता. परंतु, जनतेने माझी साथ सोडली नाही. विकास हाच आमचा ध्यास असल्याचे पुनरुद्गार राणा दाम्पत्याने काढले.

टॅग्स :Socialसामाजिक