शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

पेरणी पूर्वमशागतीत शेतकरी व्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:12 IST

कावली वसाड : पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपल्याने खरीप हंगामाच्या पूर्वमशागतीला वेग आला आहे. बळीराजा शेतीच्या कामात व्यस्त ...

कावली वसाड : पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपल्याने खरीप हंगामाच्या पूर्वमशागतीला वेग आला आहे. बळीराजा शेतीच्या कामात व्यस्त असल्याचे दिसत आहे.

शेतातील काडीकचरा वेचून जमिनीची ट्रॅक्‍टरच्या साह्याने नांगरणी, वखरणी तसेच आपल्या शेतातील धुरे, बांध जेसीबीच्या साह्याने व्यवस्थित करताना शेतकरी दिसत आहे. रासायनिक खताचे दर अधिकच वाढल्याने ते शेतकऱ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला मोर्चा शेणखताकडे वळविला आहे. शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात शेणखताची खरेदी सुरू केली आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय असल्याने जनावरांची संख्या अधिक प्रमाणात आहे. त्यामुळे शेणखताची निर्मितीसुद्धा मोठ्या प्रमाणात होत असल्याने व ती शेतकऱ्यांना परवडणारी असल्यामुळे शेणखताची खरेदी वाढली आहे. शेणखतामुळे जमिनीचा पोत कायम राहत असल्याने यावर्षी शेणखताची खरेदी मोठ्या प्रमाणात केल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले.

बॉक्स

शेणखताकडे वाढला शेतकऱ्यांचा कल

सध्या शेतकरी आपल्या शेतात शेणखत टाकत असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी खरीप हंगामातील मशागतीला वेग आला आहे. कोरोनाला न जुमानता शेतीची कामे वेळेत पूर्ण करावी लागत असल्याने त्याकडे लक्षसुद्धा देत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

बॉक्स

आर्थिक जुळवाजुळवीचे शेतकऱ्यांपुढे आव्हान

यंदा अल्प उत्पन्नामुळे शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था ढासळलेली असली तरी येणाऱ्या हंगामात शेतीसाठी बी बियाणे आणण्यासाठी पैशांची जुळवाजुळव करणे हे सर्व शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान ठरत आहे.