शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
2
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
3
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
4
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
5
वयाच्या १५ व्या वर्षीच अक्षय कुमारच्या लेकाने सोडलंय घर, आरवच्या सवयी वाचून व्हाल शॉक!
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
7
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
8
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
9
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
10
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
11
खवळलेल्या समुद्रातून २४ पर्यटकांची सुटका, दोन तास थरार, तटरक्षक दलाच्या शाैर्याचे सर्वत्र काैतुक
12
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
13
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?
14
विदेशी नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा धंदा जोरात, परराष्ट्र मंत्रालयाकडून सावधगिरीचा इशारा
15
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
16
आता औषधे संशयाच्या भोवऱ्यात; दर्जाबाबत शंका आल्याने भारतीय कंपन्यांची उत्पादने परत पाठविली
17
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
18
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
19
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
20
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ

महावितरणने घेतला शेतकऱ्याचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 6:00 AM

सालोरा शिवारातील विद्युत खांब व तारा जमिनीच्या टेकल्या आहेत. नागरिकांनी अनेकदा महावितरणला कळवूनही याबाबत उपाययोजना झाल्या नाहीत. या मुद्द्यावर संतप्त गावकऱ्यांनी रोष व्यक्त केल्याने अमरावतीच्या इर्विन रुग्णालयात शवविच्छेदनादरम्यान तणावसदृश स्थिती निर्माण झाली होती.

ठळक मुद्देनिष्काळजीपणाचा कळस : सालोºयात हळहळ, इर्विनमध्ये तणाव

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महावितरणचा भोंगळ कारभार व निष्काळजीपणामुळे एका शेतकऱ्याचा लोंबकळलेल्या वीज तारांच्या स्पर्शाने मंगळवारी सकाळी करुण अंत झाला. रूपराव नागोराव ठाकरे (६८, रा. सालोरा बु.) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.सालोरा शिवारातील विद्युत खांब व तारा जमिनीच्या टेकल्या आहेत. नागरिकांनी अनेकदा महावितरणला कळवूनही याबाबत उपाययोजना झाल्या नाहीत. या मुद्द्यावर संतप्त गावकऱ्यांनी रोष व्यक्त केल्याने अमरावतीच्या इर्विन रुग्णालयात शवविच्छेदनादरम्यान तणावसदृश स्थिती निर्माण झाली होती. संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध कायदेशिर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन महावितरण अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर गावकऱ्यांचा रोष निवळला.दरम्यान, ठाकरे कुटुंबीयांकडे सालोगा बु. गावानजीक दोन ते तीन एकर शेती आहे. मंगळवारी सकाळी ९ वाजता रूपराव ठाकरे हे शेतात गेले. यादरम्यान पाऊस सुरू झाला. दुपारी ३ वाजेपर्यंत ते घरी परतले नसल्याचे पाहून कुटुंबीयांनी शेतात जाऊन बघितले असता, रूपराव जमिनीशी समांतर विद्युत खांबाजवळ निपचित पडलेले होते. त्यांचा मृत्यू झाल्याचे कळताच कुटुंबीयांचा आक्रोश सुरू झाला. तारेमध्ये विज प्रवाह असल्यामुळे कुणी रूपराव यांना स्पर्श करू शकले नाही. या घटनेची माहिती वलगाव पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यादरम्यान कुटुंबीय व पोलिसांनी महावितरण अधिकाऱ्यांशी संपर्क केला. मात्र, दुपारी ३ नंतर वीज अधिकाऱ्यांनी फोन बंद करून ठेवले. त्यामुळे कुणाशीच संपर्क होत नव्हता. बराच वेळ निघून गेल्यानंतरही कुणीच तेथे पोहोचले नाही. सायंकाळ होत असल्याचे पाहून पोलिसांनी रूपराव यांचा मृतदेह ताब्यात घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालयात आणला. सरपंच महेश दिवाण यांनी महावितरण अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यांना येथे बोलाविले. अमरावती ग्रामीण सर्कलचे उपकार्यकारी अभियंता उज्ज्वल गावंडे व गोकुल मोरे यांच्यासमोर गावकरी व नातेवाइकांनी घटनेची आपबिती मांडली.पोलिसांची तारांबळअमरावती : शिराळा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच रूपराव ठाकरे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. त्यामुळे तेथील अधिकारी व कर्मचाºयांवर कारवाई करा, त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा, अशी मागणी नातेवाइकांसह गावकऱ्यांनी रेटून धरल्याने पोलिसांचीही ताराबंळ उडाली. वाढता तणाव पाहता, पोलिसांचा मोठा ताफा इर्विनला पोहोचला. यादरम्यान आ. यशोमती ठाकुर यांनीही इर्विन जाऊन घटनेची माहिती घेतली. महावितरण अधिकाऱ्यांना या निष्काकाळजीपणाचा जाब विचारला. त्यानंतर महावितरण अधिकाºयांनी दोषीवर कायदेशीर कारवाईचे लेखी आश्वासन दिले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणDeathमृत्यू