शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव
2
“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
3
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
4
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
5
नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...
6
"हे लोक अणुबॉम्बला एवढे घाबरत नाहीत, जेवढे...!" जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अरशद मदनी यांचं विधान
7
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
8
अजय देवगनकडे या कंपनीचे १०००००० शेअर, आता कंपनीने  घेतला मोठा निर्णय; दिलाय 6000% चा बंपर परतावा!
9
इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण
10
60% हूनही अधिक घसरला ओला इलेक्ट्रिकचा शेअर, गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ!
11
'मी खोटे काम केलं नाही!' छत्रपती संभाजीनगरची बोगस 'IAS' कल्पना भागवत अखेर 'बोलली'...
12
₹६७००००० चं टॉयलेट, ₹७६००० चा ब्रश अन्... किती श्रीमंत आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन? रहस्यमय आहे संपत्ती!
13
MS धोनीचा लाडका, वर्ल्डकपही खेळला; पण नंतर १० वर्ष संघाबाहेर बसला... अखेर क्रिकेटला रामराम
14
पुतिन यांच्या भारत दौऱ्यामुळे शेअर बाजारात खळबळ, 'हे' शेअर्स फोकसमध्ये राहणार...
15
Team India's New Jersey For T20 World Cup 2026: रोहितनं दाखवली टीम इंडियाची नवी जर्सी; कॉलरवरील तिरंगा चर्चेत!
16
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
17
सायको काकी! सुंदर मुलांचा काटा काढायची अन् पार्टी करायची, स्वत:च्या मुलालाही सोडलं नाही
18
India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!
19
एलॉन मस्कची धडकी भरवणारी भविष्यवाणी, म्हणाला- येत्या काळात महायुद्ध अटळ! २०३० पर्यंत...
20
हाहाकार! जमिनीतून अचानक विषारी गॅस बाहेर पडू लागला; धनबादमध्ये मुलाचा मृत्यू, शेकडो पक्षी दगावले
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणने घेतला शेतकऱ्याचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 06:00 IST

सालोरा शिवारातील विद्युत खांब व तारा जमिनीच्या टेकल्या आहेत. नागरिकांनी अनेकदा महावितरणला कळवूनही याबाबत उपाययोजना झाल्या नाहीत. या मुद्द्यावर संतप्त गावकऱ्यांनी रोष व्यक्त केल्याने अमरावतीच्या इर्विन रुग्णालयात शवविच्छेदनादरम्यान तणावसदृश स्थिती निर्माण झाली होती.

ठळक मुद्देनिष्काळजीपणाचा कळस : सालोºयात हळहळ, इर्विनमध्ये तणाव

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महावितरणचा भोंगळ कारभार व निष्काळजीपणामुळे एका शेतकऱ्याचा लोंबकळलेल्या वीज तारांच्या स्पर्शाने मंगळवारी सकाळी करुण अंत झाला. रूपराव नागोराव ठाकरे (६८, रा. सालोरा बु.) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.सालोरा शिवारातील विद्युत खांब व तारा जमिनीच्या टेकल्या आहेत. नागरिकांनी अनेकदा महावितरणला कळवूनही याबाबत उपाययोजना झाल्या नाहीत. या मुद्द्यावर संतप्त गावकऱ्यांनी रोष व्यक्त केल्याने अमरावतीच्या इर्विन रुग्णालयात शवविच्छेदनादरम्यान तणावसदृश स्थिती निर्माण झाली होती. संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध कायदेशिर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन महावितरण अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर गावकऱ्यांचा रोष निवळला.दरम्यान, ठाकरे कुटुंबीयांकडे सालोगा बु. गावानजीक दोन ते तीन एकर शेती आहे. मंगळवारी सकाळी ९ वाजता रूपराव ठाकरे हे शेतात गेले. यादरम्यान पाऊस सुरू झाला. दुपारी ३ वाजेपर्यंत ते घरी परतले नसल्याचे पाहून कुटुंबीयांनी शेतात जाऊन बघितले असता, रूपराव जमिनीशी समांतर विद्युत खांबाजवळ निपचित पडलेले होते. त्यांचा मृत्यू झाल्याचे कळताच कुटुंबीयांचा आक्रोश सुरू झाला. तारेमध्ये विज प्रवाह असल्यामुळे कुणी रूपराव यांना स्पर्श करू शकले नाही. या घटनेची माहिती वलगाव पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यादरम्यान कुटुंबीय व पोलिसांनी महावितरण अधिकाऱ्यांशी संपर्क केला. मात्र, दुपारी ३ नंतर वीज अधिकाऱ्यांनी फोन बंद करून ठेवले. त्यामुळे कुणाशीच संपर्क होत नव्हता. बराच वेळ निघून गेल्यानंतरही कुणीच तेथे पोहोचले नाही. सायंकाळ होत असल्याचे पाहून पोलिसांनी रूपराव यांचा मृतदेह ताब्यात घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालयात आणला. सरपंच महेश दिवाण यांनी महावितरण अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यांना येथे बोलाविले. अमरावती ग्रामीण सर्कलचे उपकार्यकारी अभियंता उज्ज्वल गावंडे व गोकुल मोरे यांच्यासमोर गावकरी व नातेवाइकांनी घटनेची आपबिती मांडली.पोलिसांची तारांबळअमरावती : शिराळा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच रूपराव ठाकरे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. त्यामुळे तेथील अधिकारी व कर्मचाºयांवर कारवाई करा, त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा, अशी मागणी नातेवाइकांसह गावकऱ्यांनी रेटून धरल्याने पोलिसांचीही ताराबंळ उडाली. वाढता तणाव पाहता, पोलिसांचा मोठा ताफा इर्विनला पोहोचला. यादरम्यान आ. यशोमती ठाकुर यांनीही इर्विन जाऊन घटनेची माहिती घेतली. महावितरण अधिकाऱ्यांना या निष्काकाळजीपणाचा जाब विचारला. त्यानंतर महावितरण अधिकाºयांनी दोषीवर कायदेशीर कारवाईचे लेखी आश्वासन दिले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणDeathमृत्यू