शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणने घेतला शेतकऱ्याचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 06:00 IST

सालोरा शिवारातील विद्युत खांब व तारा जमिनीच्या टेकल्या आहेत. नागरिकांनी अनेकदा महावितरणला कळवूनही याबाबत उपाययोजना झाल्या नाहीत. या मुद्द्यावर संतप्त गावकऱ्यांनी रोष व्यक्त केल्याने अमरावतीच्या इर्विन रुग्णालयात शवविच्छेदनादरम्यान तणावसदृश स्थिती निर्माण झाली होती.

ठळक मुद्देनिष्काळजीपणाचा कळस : सालोºयात हळहळ, इर्विनमध्ये तणाव

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महावितरणचा भोंगळ कारभार व निष्काळजीपणामुळे एका शेतकऱ्याचा लोंबकळलेल्या वीज तारांच्या स्पर्शाने मंगळवारी सकाळी करुण अंत झाला. रूपराव नागोराव ठाकरे (६८, रा. सालोरा बु.) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.सालोरा शिवारातील विद्युत खांब व तारा जमिनीच्या टेकल्या आहेत. नागरिकांनी अनेकदा महावितरणला कळवूनही याबाबत उपाययोजना झाल्या नाहीत. या मुद्द्यावर संतप्त गावकऱ्यांनी रोष व्यक्त केल्याने अमरावतीच्या इर्विन रुग्णालयात शवविच्छेदनादरम्यान तणावसदृश स्थिती निर्माण झाली होती. संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध कायदेशिर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन महावितरण अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर गावकऱ्यांचा रोष निवळला.दरम्यान, ठाकरे कुटुंबीयांकडे सालोगा बु. गावानजीक दोन ते तीन एकर शेती आहे. मंगळवारी सकाळी ९ वाजता रूपराव ठाकरे हे शेतात गेले. यादरम्यान पाऊस सुरू झाला. दुपारी ३ वाजेपर्यंत ते घरी परतले नसल्याचे पाहून कुटुंबीयांनी शेतात जाऊन बघितले असता, रूपराव जमिनीशी समांतर विद्युत खांबाजवळ निपचित पडलेले होते. त्यांचा मृत्यू झाल्याचे कळताच कुटुंबीयांचा आक्रोश सुरू झाला. तारेमध्ये विज प्रवाह असल्यामुळे कुणी रूपराव यांना स्पर्श करू शकले नाही. या घटनेची माहिती वलगाव पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यादरम्यान कुटुंबीय व पोलिसांनी महावितरण अधिकाऱ्यांशी संपर्क केला. मात्र, दुपारी ३ नंतर वीज अधिकाऱ्यांनी फोन बंद करून ठेवले. त्यामुळे कुणाशीच संपर्क होत नव्हता. बराच वेळ निघून गेल्यानंतरही कुणीच तेथे पोहोचले नाही. सायंकाळ होत असल्याचे पाहून पोलिसांनी रूपराव यांचा मृतदेह ताब्यात घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालयात आणला. सरपंच महेश दिवाण यांनी महावितरण अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यांना येथे बोलाविले. अमरावती ग्रामीण सर्कलचे उपकार्यकारी अभियंता उज्ज्वल गावंडे व गोकुल मोरे यांच्यासमोर गावकरी व नातेवाइकांनी घटनेची आपबिती मांडली.पोलिसांची तारांबळअमरावती : शिराळा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच रूपराव ठाकरे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. त्यामुळे तेथील अधिकारी व कर्मचाºयांवर कारवाई करा, त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा, अशी मागणी नातेवाइकांसह गावकऱ्यांनी रेटून धरल्याने पोलिसांचीही ताराबंळ उडाली. वाढता तणाव पाहता, पोलिसांचा मोठा ताफा इर्विनला पोहोचला. यादरम्यान आ. यशोमती ठाकुर यांनीही इर्विन जाऊन घटनेची माहिती घेतली. महावितरण अधिकाऱ्यांना या निष्काकाळजीपणाचा जाब विचारला. त्यानंतर महावितरण अधिकाºयांनी दोषीवर कायदेशीर कारवाईचे लेखी आश्वासन दिले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणDeathमृत्यू