शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांच्या रुद्रावतारानंतर कृषी अधिका-यांचा शेतातून काढता पाय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 16:39 IST

संतप्त शेतक-यांच्या रोषामुळे जसापूर येथे नुकसानाचे सर्वेक्षण करण्यास गेलेल्या कृषी अधिका-यांना शेतातून काढता पाय घ्यावा लागला.

चांदूर बाजार (अमरावती) - संतप्त शेतक-यांच्या रोषामुळे जसापूर येथे नुकसानाचे सर्वेक्षण करण्यास गेलेल्या कृषी अधिका-यांना शेतातून काढता पाय घ्यावा लागला. चांदूर बाजार तालुक्यात संत्र्याची फळगळ मोठी असल्याने शेतकरी जेरीस आले आहेत. दोन वर्षांपासून नागपूर येथील एनआरसीच्या शास्त्रज्ञांनी सुचविलेल्या उपाययोजना करूनही ही गळती थांबली नाही. तालुक्यातील जसापूर येथे जिल्हा कृषी विभागाचे अधिकारी व अकोला येथील कृषी विभागाचे शास्त्रज्ञ हे संत्राउत्पादक शेतकरी अभिजित पोहोकार व प्रदीप बंड यांच्या शेतात गेले. मात्र, नागपूर एनआरसीच्या शास्त्रज्ञांकडून शेतक-यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याचे सांगत संतापलेल्या शेतकºयांनी या पथकाला शेतातून अक्षरश: हाकलून लावले. यावर्षीच्या सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने मृग बहर हातचा गेला. दुसरीकडे योग्य वातावरणाअभावी फुललेला आंबिया बहर कडाक्याचे उन्ह आणि अज्ञात रोगामुळे गळू लागला आहे. या फळगळतीबाबत कृषी विभागाने दोन वर्षांपासून मार्गदर्शन शिबिर घेतलेले नाही तसेच नेमक्या कोणत्या कारणामुळे फळगळ होते, याचे कारणही स्पष्ट केले नसल्याचा आरोप उपस्थित शेतकºयांनी केले आहे.नागपूर येथील एनआरसीच्या शास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे फवारणी व खताची मात्रा देऊनही संत्र्याला गळती लागली. त्यामुळे गलेलठ्ठ पगार घेणारे शास्त्रज्ञांचा काय उपयोग, असा सवाल संतप्त शेतकºयांनी यावेळी पथकाला केला. शेतकºयांचा रूद्रावतार पाहून कृषी अधिकाºयांनी परतणेच इष्ट समजले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी इंगळे, तालुका कृषी अधिकारी प्रदीप भारसकळे, मंडळ कृषी अधिकारी यांच्यासह डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ उपस्थित होते.    फळगळीच्या वेळी न दिसणारा कृषी विभाग व शास्त्रज्ञ त्यानंतर शेतक-यांना भेट देऊन जखमेवर मीठ चोळतात. लाखो रुपये पगार घेऊनही शेतक-यांचे नुकसान होत असेल, तर शासनाने या अधिका-यांवर कारवाई करावी. - प्रदीप बंड, शेतकरी, जसापूर  

गतवर्षी पंचायत समिती सभागृहात नागपूर एनआरसीच्या शास्त्रज्ञांनी जानेवारी ते फळ तयार होईपर्यंत पाच मार्गदर्शन शिबिरे घेणार असल्याचे आश्वासन दिले होते. यावेळी शास्त्रज्ञांनी सूचविलेल्या सूचनेनुसार संत्राउत्पादक शेतकºयांनी पिकांना खत व औषधी दिल्या. तरीही फळगळ थांबली नाही. यानंतर एनआरसीच्या शास्त्रज्ञानी फिरकूनही पाहिले नाही. - अभिजित पोहोकार, शेतकरी जसापूर

टॅग्स :FarmerशेतकरीAmravatiअमरावती