शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

शेतक-यांच्या रुद्रावतारानंतर कृषी अधिका-यांचा शेतातून काढता पाय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 16:39 IST

संतप्त शेतक-यांच्या रोषामुळे जसापूर येथे नुकसानाचे सर्वेक्षण करण्यास गेलेल्या कृषी अधिका-यांना शेतातून काढता पाय घ्यावा लागला.

चांदूर बाजार (अमरावती) - संतप्त शेतक-यांच्या रोषामुळे जसापूर येथे नुकसानाचे सर्वेक्षण करण्यास गेलेल्या कृषी अधिका-यांना शेतातून काढता पाय घ्यावा लागला. चांदूर बाजार तालुक्यात संत्र्याची फळगळ मोठी असल्याने शेतकरी जेरीस आले आहेत. दोन वर्षांपासून नागपूर येथील एनआरसीच्या शास्त्रज्ञांनी सुचविलेल्या उपाययोजना करूनही ही गळती थांबली नाही. तालुक्यातील जसापूर येथे जिल्हा कृषी विभागाचे अधिकारी व अकोला येथील कृषी विभागाचे शास्त्रज्ञ हे संत्राउत्पादक शेतकरी अभिजित पोहोकार व प्रदीप बंड यांच्या शेतात गेले. मात्र, नागपूर एनआरसीच्या शास्त्रज्ञांकडून शेतक-यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याचे सांगत संतापलेल्या शेतकºयांनी या पथकाला शेतातून अक्षरश: हाकलून लावले. यावर्षीच्या सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने मृग बहर हातचा गेला. दुसरीकडे योग्य वातावरणाअभावी फुललेला आंबिया बहर कडाक्याचे उन्ह आणि अज्ञात रोगामुळे गळू लागला आहे. या फळगळतीबाबत कृषी विभागाने दोन वर्षांपासून मार्गदर्शन शिबिर घेतलेले नाही तसेच नेमक्या कोणत्या कारणामुळे फळगळ होते, याचे कारणही स्पष्ट केले नसल्याचा आरोप उपस्थित शेतकºयांनी केले आहे.नागपूर येथील एनआरसीच्या शास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे फवारणी व खताची मात्रा देऊनही संत्र्याला गळती लागली. त्यामुळे गलेलठ्ठ पगार घेणारे शास्त्रज्ञांचा काय उपयोग, असा सवाल संतप्त शेतकºयांनी यावेळी पथकाला केला. शेतकºयांचा रूद्रावतार पाहून कृषी अधिकाºयांनी परतणेच इष्ट समजले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी इंगळे, तालुका कृषी अधिकारी प्रदीप भारसकळे, मंडळ कृषी अधिकारी यांच्यासह डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ उपस्थित होते.    फळगळीच्या वेळी न दिसणारा कृषी विभाग व शास्त्रज्ञ त्यानंतर शेतक-यांना भेट देऊन जखमेवर मीठ चोळतात. लाखो रुपये पगार घेऊनही शेतक-यांचे नुकसान होत असेल, तर शासनाने या अधिका-यांवर कारवाई करावी. - प्रदीप बंड, शेतकरी, जसापूर  

गतवर्षी पंचायत समिती सभागृहात नागपूर एनआरसीच्या शास्त्रज्ञांनी जानेवारी ते फळ तयार होईपर्यंत पाच मार्गदर्शन शिबिरे घेणार असल्याचे आश्वासन दिले होते. यावेळी शास्त्रज्ञांनी सूचविलेल्या सूचनेनुसार संत्राउत्पादक शेतकºयांनी पिकांना खत व औषधी दिल्या. तरीही फळगळ थांबली नाही. यानंतर एनआरसीच्या शास्त्रज्ञानी फिरकूनही पाहिले नाही. - अभिजित पोहोकार, शेतकरी जसापूर

टॅग्स :FarmerशेतकरीAmravatiअमरावती