शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
4
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
5
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
6
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
7
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?
8
पाशांकुश एकादशीला 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; काय घ्यावी काळजी? वाचा!
9
उद्धव ठाकरेंची सोडली साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजन तेली म्हणाले, "दुर्दैवाने तिथे..."
10
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
11
एआयपासून बनलेली जगातील पहिली अभिनेत्री, ओळखून दाखवणं कठीण; कलाकारांकडून तीव्र निषेध!
12
सकाळी रुग्णालयात... संध्याकाळी जिंकलं गोल्ड मेडल; रोझा कोझाकोव्स्काच्या जिद्दीला सॅल्यूट!
13
"मला त्याची गरज आहे...", घटस्फोटानंतर एकटीच करतेय मुलाचा सांभाळ; अभिनेत्री म्हणाली...
14
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
15
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
16
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
17
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
18
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
19
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
20
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल

आर्थिक संकटाच्या गर्तेत शेतकरी

By admin | Updated: December 2, 2014 22:58 IST

यंदाच्या हंगामात पेरणीपासून दोन महिने उशिरा पाऊस आल्यामुळे खरिपाचा हंगाम उद्ध्वस्त झाला. त्यामुळे उसणवारी घेऊन रबीची तयारी सुरू असताना शासकीय मदतीची प्रतीक्षा शेतकरी करीत आहे.

मदत केव्हा ? : उसणवारीवर दिवस काढण्याची वेळअमरावती : यंदाच्या हंगामात पेरणीपासून दोन महिने उशिरा पाऊस आल्यामुळे खरिपाचा हंगाम उद्ध्वस्त झाला. त्यामुळे उसणवारी घेऊन रबीची तयारी सुरू असताना शासकीय मदतीची प्रतीक्षा शेतकरी करीत आहे.जमिनीत आर्द्रता नसल्यामुळे रबीची पेरणी ३० टक्क्यावर आली. वर आलेली हरभऱ्याची रोप कोमेजायला लागली आहे. कापसावर लाल्या, तुरीवर शेंग पोखरणाऱ्या अळीचा प्रकोप वाढला. निसर्गाचा दृष्टचक्र शेतकऱ्यांचा पिच्छा सोडायच्या मानसिकतेत दिसत नाही. त्यामुळे दुष्काळ जाहीर झाला. मात्र, प्रत्यक्षात कुठलीच मदत नाही. शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. अगदी उसणवारीवर दिवस काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अत्यल्प पावसामुळे खरिपाचा हंगाम गारद झाला. पेरणीचा कालावधी संपून गेल्यामुळे मूग, उडीद पीक पेरण्यातच आले नाही. निकृष्ट बियाण्यांअभावी दुबार, तिबार पेरणीची वेळ आली, उगवलेल्या सोयाबीनला वाढीसाठी कालावधी मिळालाच नाही. शेंगा फुलोरावर व भरण्याच्या अवस्थेत पावसाने दडी मारल्यामुळे शेंगा पोचट व दाणा बारकावला. परिणामी सोयाबीनच्या सरासरी उत्पन्नात ६० ते ८० टक्क्यांनी घट झाली. एकरी एक पोत्याचीही झडती होत नसल्याचे विदारक चित्र आहे. शेतकऱ्याजवळ होता नव्हता पैसा पीक पेरणी, मशागतीमध्ये खर्च झाला. उत्पादन खर्चाच्या अर्धेही उत्पन्न पदरी पडले नाही. यंदा कपाशीचा आधारदेखील शेतकऱ्यांना मिळाला नाही. कपाशीवर ‘लाल्या’चा प्रादुर्भाव आहे. जमिनीत ओलावा नसल्याने कपाशीची बोंड फुटत नाही. जी फुटली ती अर्धवट स्थितीत असल्यामुळे कपाशीच्या सरासरी उत्पन्नातदेखील ४० ते ६० टक्क्यांनी घट झाली आहे. खरीप हातचा गेल्यानंतर रबी तरी साथ देईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु रबीचा हंगाम दीड महिना उशिरा झाला. परिणामी रबीची पेरणीदेखील उशिरा सुरू झाली. जमिनीत आर्द्रता नाही. त्यामुळे हरभऱ्याची उगवणशक्ती कमी होत आहे. वर आलेली हरभऱ्याची रोपे कोमेजायला लागली आहे. तूर बहरात आली. परंतु शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रकोप झाला, आर्द्रतेअभावी फुलगळ झाली. गत दोन वर्षांपासून आलेल्या संकटांनी शेतकरी डबघाईस आला आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत निम्मेही उत्पन्न नाही. खरिपाची आणेवारी ४६ पैसे जाहीर झाल्याने दुष्काळाच्या वास्तवावर शासनाने शिक्कामोर्तब केले. रोखीची मदत मात्र नाही. त्यामुळे दुष्काळाच्या दृष्टचक्रात शेतकऱ्यांसमोर अनेक समस्यांचा डोंगर उभा आहे. जगायचं कसं, दैनंदिन गरजा कशा भागवायच्या या विवंचनेत शेतकरी आहे.