शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
5
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
6
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
7
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
8
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
9
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
10
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
11
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
12
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
13
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
14
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
15
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
16
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
17
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
18
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
19
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
20
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक संकटाच्या गर्तेत शेतकरी

By admin | Updated: December 2, 2014 22:58 IST

यंदाच्या हंगामात पेरणीपासून दोन महिने उशिरा पाऊस आल्यामुळे खरिपाचा हंगाम उद्ध्वस्त झाला. त्यामुळे उसणवारी घेऊन रबीची तयारी सुरू असताना शासकीय मदतीची प्रतीक्षा शेतकरी करीत आहे.

मदत केव्हा ? : उसणवारीवर दिवस काढण्याची वेळअमरावती : यंदाच्या हंगामात पेरणीपासून दोन महिने उशिरा पाऊस आल्यामुळे खरिपाचा हंगाम उद्ध्वस्त झाला. त्यामुळे उसणवारी घेऊन रबीची तयारी सुरू असताना शासकीय मदतीची प्रतीक्षा शेतकरी करीत आहे.जमिनीत आर्द्रता नसल्यामुळे रबीची पेरणी ३० टक्क्यावर आली. वर आलेली हरभऱ्याची रोप कोमेजायला लागली आहे. कापसावर लाल्या, तुरीवर शेंग पोखरणाऱ्या अळीचा प्रकोप वाढला. निसर्गाचा दृष्टचक्र शेतकऱ्यांचा पिच्छा सोडायच्या मानसिकतेत दिसत नाही. त्यामुळे दुष्काळ जाहीर झाला. मात्र, प्रत्यक्षात कुठलीच मदत नाही. शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. अगदी उसणवारीवर दिवस काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अत्यल्प पावसामुळे खरिपाचा हंगाम गारद झाला. पेरणीचा कालावधी संपून गेल्यामुळे मूग, उडीद पीक पेरण्यातच आले नाही. निकृष्ट बियाण्यांअभावी दुबार, तिबार पेरणीची वेळ आली, उगवलेल्या सोयाबीनला वाढीसाठी कालावधी मिळालाच नाही. शेंगा फुलोरावर व भरण्याच्या अवस्थेत पावसाने दडी मारल्यामुळे शेंगा पोचट व दाणा बारकावला. परिणामी सोयाबीनच्या सरासरी उत्पन्नात ६० ते ८० टक्क्यांनी घट झाली. एकरी एक पोत्याचीही झडती होत नसल्याचे विदारक चित्र आहे. शेतकऱ्याजवळ होता नव्हता पैसा पीक पेरणी, मशागतीमध्ये खर्च झाला. उत्पादन खर्चाच्या अर्धेही उत्पन्न पदरी पडले नाही. यंदा कपाशीचा आधारदेखील शेतकऱ्यांना मिळाला नाही. कपाशीवर ‘लाल्या’चा प्रादुर्भाव आहे. जमिनीत ओलावा नसल्याने कपाशीची बोंड फुटत नाही. जी फुटली ती अर्धवट स्थितीत असल्यामुळे कपाशीच्या सरासरी उत्पन्नातदेखील ४० ते ६० टक्क्यांनी घट झाली आहे. खरीप हातचा गेल्यानंतर रबी तरी साथ देईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु रबीचा हंगाम दीड महिना उशिरा झाला. परिणामी रबीची पेरणीदेखील उशिरा सुरू झाली. जमिनीत आर्द्रता नाही. त्यामुळे हरभऱ्याची उगवणशक्ती कमी होत आहे. वर आलेली हरभऱ्याची रोपे कोमेजायला लागली आहे. तूर बहरात आली. परंतु शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रकोप झाला, आर्द्रतेअभावी फुलगळ झाली. गत दोन वर्षांपासून आलेल्या संकटांनी शेतकरी डबघाईस आला आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत निम्मेही उत्पन्न नाही. खरिपाची आणेवारी ४६ पैसे जाहीर झाल्याने दुष्काळाच्या वास्तवावर शासनाने शिक्कामोर्तब केले. रोखीची मदत मात्र नाही. त्यामुळे दुष्काळाच्या दृष्टचक्रात शेतकऱ्यांसमोर अनेक समस्यांचा डोंगर उभा आहे. जगायचं कसं, दैनंदिन गरजा कशा भागवायच्या या विवंचनेत शेतकरी आहे.