शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मताधिक्य घसरणार

By admin | Updated: September 29, 2014 00:31 IST

आघाडी, युतीत झालेली ताटातूट आणि बसप, मनसेचे उमेदवार स्वतंत्रपणे मैदानात उतरल्याने या विधानसभा निवडणुकीत उमेदवारांचे मताधिक्य घसरण्याची शक्यता आहे. शनिवारी शेवटच्या दिवशी

उमेदवारांची भाऊगर्दी : प्रचारासाठी अत्यंत कमी अवधीगणेश वासनिक - अमरावतीआघाडी, युतीत झालेली ताटातूट आणि बसप, मनसेचे उमेदवार स्वतंत्रपणे मैदानात उतरल्याने या विधानसभा निवडणुकीत उमेदवारांचे मताधिक्य घसरण्याची शक्यता आहे. शनिवारी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राजकीय पक्षांनी केलेली गर्दी पाहता या शक्यतेला बळ मिळत आहे. जिल्ह्यात आठही मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, मनसे, बसपचे उमेदवार रिंगणात कायम राहावेत, अशी पक्षस्तरावर नेत्यांनी तयारी चालविली आहे. १ आॅक्टोबरपासून निवडणूक प्रचारात खरी रंगत येईल. मात्र, पक्षाने दिलेल्या उमेदवाराची प्रतिमा बघूनच मतदार पुढील निर्णय घेतील, असे दिसून येते. काही मतदारसंघांमध्ये दुहेरी तर काही मतदारसंघात तिहेरी लढतीचे संकेत आहेत. जिल्ह्यात अनेक दिग्गजांनी निष्ठा आणि वैचारिकतेला तिलांजली देऊन आमदारकीसाठी पक्षांतर केले. दोन दिवसांपूर्वी जे नेते राष्ट्रवादीत होते आता ते शिवसेना, भाजपात गेले आहेत. ज्यांना राष्ट्रवादीची ‘अ‍ॅलर्जी’ होती, आता ते राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हाताला बांधून प्रचार करीत आहेत. पक्षाने उमेदवारी नाकारल्याने क्षणातच पक्षांतर करण्याचा अनुभव मतदारांना पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत आला. उमेदवारांची गर्दी लक्षात घेता प्रमुख पक्षांमध्येच काट्याची टक्कर होण्याची चिन्हे आहेत. यावेळी काहींना दुसऱ्यांदा तर काहींना तिसऱ्यांदा आमदार होण्याचे वेध लागले आहेत. परंतु उमेदवारांची गर्दी बघता मतांचे विभाजन अटळ आहे. परिणामी सर्वच उमेदवारांचे मताधिक्य घसरण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी, भाजप- सेनेची युती संपुष्टात आल्यामुळे या पक्षाचे उमेदवार स्वतंत्रपणे निवडणुकीच्या मैदानात आहेत. तसेच मनसे, बसप, रिपाइं, अपक्षांचीही गर्दी आहे. मात्र, काही मतदारसंघांमध्ये अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल करुन पाठिंब्याचा आणि पुढील ‘व्यवहारा’चा मार्ग खुला ठेवला आहे. आघाडी, युती संपुष्टात आल्याने वेळेवर उमेदवार शोधण्यासाठी सर्वच पक्षांची तारांबळ उडाली. बहुतांश पक्षांना बाहेरुन उमेदवार आयात करावे लागले त्यामुळे एकूण चित्र पालटले आहे.