शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

मताधिक्य घसरणार

By admin | Updated: September 29, 2014 00:31 IST

आघाडी, युतीत झालेली ताटातूट आणि बसप, मनसेचे उमेदवार स्वतंत्रपणे मैदानात उतरल्याने या विधानसभा निवडणुकीत उमेदवारांचे मताधिक्य घसरण्याची शक्यता आहे. शनिवारी शेवटच्या दिवशी

उमेदवारांची भाऊगर्दी : प्रचारासाठी अत्यंत कमी अवधीगणेश वासनिक - अमरावतीआघाडी, युतीत झालेली ताटातूट आणि बसप, मनसेचे उमेदवार स्वतंत्रपणे मैदानात उतरल्याने या विधानसभा निवडणुकीत उमेदवारांचे मताधिक्य घसरण्याची शक्यता आहे. शनिवारी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राजकीय पक्षांनी केलेली गर्दी पाहता या शक्यतेला बळ मिळत आहे. जिल्ह्यात आठही मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, मनसे, बसपचे उमेदवार रिंगणात कायम राहावेत, अशी पक्षस्तरावर नेत्यांनी तयारी चालविली आहे. १ आॅक्टोबरपासून निवडणूक प्रचारात खरी रंगत येईल. मात्र, पक्षाने दिलेल्या उमेदवाराची प्रतिमा बघूनच मतदार पुढील निर्णय घेतील, असे दिसून येते. काही मतदारसंघांमध्ये दुहेरी तर काही मतदारसंघात तिहेरी लढतीचे संकेत आहेत. जिल्ह्यात अनेक दिग्गजांनी निष्ठा आणि वैचारिकतेला तिलांजली देऊन आमदारकीसाठी पक्षांतर केले. दोन दिवसांपूर्वी जे नेते राष्ट्रवादीत होते आता ते शिवसेना, भाजपात गेले आहेत. ज्यांना राष्ट्रवादीची ‘अ‍ॅलर्जी’ होती, आता ते राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हाताला बांधून प्रचार करीत आहेत. पक्षाने उमेदवारी नाकारल्याने क्षणातच पक्षांतर करण्याचा अनुभव मतदारांना पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत आला. उमेदवारांची गर्दी लक्षात घेता प्रमुख पक्षांमध्येच काट्याची टक्कर होण्याची चिन्हे आहेत. यावेळी काहींना दुसऱ्यांदा तर काहींना तिसऱ्यांदा आमदार होण्याचे वेध लागले आहेत. परंतु उमेदवारांची गर्दी बघता मतांचे विभाजन अटळ आहे. परिणामी सर्वच उमेदवारांचे मताधिक्य घसरण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी, भाजप- सेनेची युती संपुष्टात आल्यामुळे या पक्षाचे उमेदवार स्वतंत्रपणे निवडणुकीच्या मैदानात आहेत. तसेच मनसे, बसप, रिपाइं, अपक्षांचीही गर्दी आहे. मात्र, काही मतदारसंघांमध्ये अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल करुन पाठिंब्याचा आणि पुढील ‘व्यवहारा’चा मार्ग खुला ठेवला आहे. आघाडी, युती संपुष्टात आल्याने वेळेवर उमेदवार शोधण्यासाठी सर्वच पक्षांची तारांबळ उडाली. बहुतांश पक्षांना बाहेरुन उमेदवार आयात करावे लागले त्यामुळे एकूण चित्र पालटले आहे.