शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
2
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
3
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
4
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
5
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
6
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
7
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
8
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
9
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
10
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
11
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
12
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
13
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
14
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
16
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
17
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
18
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
19
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
20
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

‘आरटीई’साठी ४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 11:42 PM

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क अधिनियमानुसार खासगी शाळांमध्ये २५ टक्के राजीव जागांसाठी पहिल्या सोडतीत समाविष्ट झालेल्या बालकांना आता येत्या ४ एप्रिलपर्यंत प्रवेश घेता येणार आहे

ठळक मुद्देपालकांना दिलासा : शिक्षण विभागाचा निर्णय

आॅनलाईन लोकमतअमरावती : बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क अधिनियमानुसार खासगी शाळांमध्ये २५ टक्के राजीव जागांसाठी पहिल्या सोडतीत समाविष्ट झालेल्या बालकांना आता येत्या ४ एप्रिलपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने मुदतवाढीचे पत्र जिल्हा परिषदेला पाठविले आहे.वास्तव्य पुराव्यातही दिलासावास्तव्याचा पुरावा म्हणून आई-वडिलांचे आधार कार्ड, पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र, वीजबिल, टेलिफोन बिल, घरभाड्याची पावती, वाहन चालविण्याचा परवाना यापैकी एक ग्राह्य धरण्यात येणार आहे. यापैकी काहीएक नसले तरच दुय्यम निबंधक कार्यालयातील भाडेकरदाराची नोंदणीकृत प्रत वास्तव्याचा पुरावा म्हणून जोडावी लागणार आहे. शिक्षण उपसंचालक शरद गोसावी यांनी तसे पत्र काढले आहे.जिल्ह्यातील एकूण २३३ शाळांमध्ये पहिलीच्या वर्गासाठी तीन हजारांवर जागा राखीव ठेवण्यात आल्या असून, या जागांसाठी ७ हजारांवर अर्ज प्राप्त झाले आहेत. जास्तीत जास्त बालकांना प्रवेश देण्यासाठी तीन टप्प्यांत सोडत काढण्यात येणार आहे. पहिली सोडत १२ मार्च रोजी काढण्यात आली आहे. त्यात हजारो विद्यार्थ्यांचा समावेश झाला असून या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यसाठी २४ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपण्याच्या पूर्वसंध्येला मोजक्याच विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन प्रवेश घेणे शक्य झाले, तर अनेक विद्यार्थ्यांचे पालक पाल्याच्या प्रवेशापासून वंचित आहेत. मुदत संपल्यास त्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागणार असल्याची बाब लक्षात घेऊन प्रवेशासाठी येत्या ४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पालकांनी विनंती केल्यानेच शिक्षण संचालनालयाने मुदतवाढीचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.