शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
4
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
5
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
6
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
7
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
8
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
9
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
10
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
11
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
12
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
13
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
14
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
15
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
16
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
17
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
18
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
19
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
20
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

अतिवृष्टीने कोट्यवधीचे नुकसान मिळाला, रुपयाही नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:17 IST

पाठपुरावा सुरूच, तीन वर्षांत अतिवृष्टीने जिल्ह्यात कोट्यवधीची हानी अमरावती : शेती आणि नैसर्गिक प्रकोपसारखा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहेत. यातून ...

पाठपुरावा सुरूच, तीन वर्षांत अतिवृष्टीने जिल्ह्यात कोट्यवधीची हानी

अमरावती : शेती आणि नैसर्गिक प्रकोपसारखा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहेत. यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न शासकीय मदतीमधून करण्यात येतो, असे प्रशासनाच्यावतीने वारंवार सांगितले जाते. प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतरही थोडीथोडकीच मदत शेतकऱ्यांच्या हातात पडते. त्यातून मजुरीचा खर्चही निघत नाही. मात्र, शासकीय आकडेवारी सामूहिकरीत्या जाहीर झाल्याने खूप मोठी मदत दिल्याचे दिसते. प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या हातात कवडीमोल पैसा येतो. नुकसान झाल्यानंतर अनेक दिवसांची प्रतीक्षा करावी लागते. माहिती मिळण्यासाठी त्यातील दहा टक्के रक्कम खर्च होते आता शासनाने नुकसान ग्रस्त भागात शेतकऱ्यांना ठोस मदत देण्याची गरज आहे.

बॉक्स

अतिवृष्टी झालेल्या नुकसानाचे पाठविलेले प्रस्ताव

२०१७-००-००

२०१८-००.००

२०१९-१२.६०-००

२०२०-९२.७७-००

२०२१-१६.६२-००

प्रस्ताव कोटीत

मिळालेले कोटीत

बॉक्स

नुकसानानंतर पाहावी लागते मदतीची वाट

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजपर्यंतचा आलेला अनुभव फार वाईट आहे. नुकसान झाल्यानंतर तात्काळ मदत मिळत नाही. येणारी मदत फार उशिरा आणि टप्प्याटप्प्याने ते विशेष म्हणजे सरकारच्या निकषात केवळ हेक्टरी ६ हजार ८०० रुपये मदतीचा लाभ दिला जातो. मुळात नुकसान यापेक्षा कितीतरी जास्त असते. त्यामुळे मदतीनंतरही शेतकरी उभा राहू शकत नाही.

बॉक्स

सरकार बदलले, परिस्थिती सारखीच

सरकार बदलल्यानंतर धोरणात्मक निर्णयात बदल होईल, असा अनेकांचा अंदाज होता. मुळात कुठलीही सरकार आल्यानंतर परिस्थिती सारखीच राहिली आहे. यामुळे नुकसानग्रस्त भागातील शेतकरी आजपर्यंत संकटातून बाहेर पडू शकले नाही. त्यासाठी ठोस मोबदल्याची आवश्यकता आहे.

बॉक्स

लोकप्रतिनिधी म्हणतात

जिल्ह्यात सतत नैसर्गिक प्रकोप सुरू राहत आहे. यावर्षी अतिपावसाने पिकांचे नुकसान होत आहे. या नुकसानामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. पिकांच्या नुकसानासह रस्ते, पुलाचेही नुकसान झाले. या नुकसानभरपाई व रस्ते पुल दुरुस्तीसाठी शासनाकडे निधी मिळावा, याकरीता प्रस्ताव पाठविला आहे. हा निधी पालकमंत्र्याच्या माध्यामातून मिळविण्यासाठी प्रयन्न सुरू आहे.

- बबलू देशमुख, अध्यक्ष, जिल्हा परिषद, अमरावती

कोट

माझ्या कार्यकाळात नुकसानभरपाईची मागणीसाठी संबंधित विभागामार्फत शासनदरबारी पाठपुरावा केला आहे. अशातच यात काही प्रमाणात निधी मिळाला. मात्र, उर्वरित निधीही पालकमंत्र्याच्या सहकाऱ्याने जिल्हा परिषदेला मिळेल, यात काही शंका नाही. त्यासाठी विद्यमान अध्यक्ष, पालकमंत्री हे पाठपुरावा करतील.

- नितीन गोंडाणे, माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद