शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीने कोट्यवधीचे नुकसान मिळाला, रुपयाही नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:17 IST

पाठपुरावा सुरूच, तीन वर्षांत अतिवृष्टीने जिल्ह्यात कोट्यवधीची हानी अमरावती : शेती आणि नैसर्गिक प्रकोपसारखा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहेत. यातून ...

पाठपुरावा सुरूच, तीन वर्षांत अतिवृष्टीने जिल्ह्यात कोट्यवधीची हानी

अमरावती : शेती आणि नैसर्गिक प्रकोपसारखा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहेत. यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न शासकीय मदतीमधून करण्यात येतो, असे प्रशासनाच्यावतीने वारंवार सांगितले जाते. प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतरही थोडीथोडकीच मदत शेतकऱ्यांच्या हातात पडते. त्यातून मजुरीचा खर्चही निघत नाही. मात्र, शासकीय आकडेवारी सामूहिकरीत्या जाहीर झाल्याने खूप मोठी मदत दिल्याचे दिसते. प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या हातात कवडीमोल पैसा येतो. नुकसान झाल्यानंतर अनेक दिवसांची प्रतीक्षा करावी लागते. माहिती मिळण्यासाठी त्यातील दहा टक्के रक्कम खर्च होते आता शासनाने नुकसान ग्रस्त भागात शेतकऱ्यांना ठोस मदत देण्याची गरज आहे.

बॉक्स

अतिवृष्टी झालेल्या नुकसानाचे पाठविलेले प्रस्ताव

२०१७-००-००

२०१८-००.००

२०१९-१२.६०-००

२०२०-९२.७७-००

२०२१-१६.६२-००

प्रस्ताव कोटीत

मिळालेले कोटीत

बॉक्स

नुकसानानंतर पाहावी लागते मदतीची वाट

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजपर्यंतचा आलेला अनुभव फार वाईट आहे. नुकसान झाल्यानंतर तात्काळ मदत मिळत नाही. येणारी मदत फार उशिरा आणि टप्प्याटप्प्याने ते विशेष म्हणजे सरकारच्या निकषात केवळ हेक्टरी ६ हजार ८०० रुपये मदतीचा लाभ दिला जातो. मुळात नुकसान यापेक्षा कितीतरी जास्त असते. त्यामुळे मदतीनंतरही शेतकरी उभा राहू शकत नाही.

बॉक्स

सरकार बदलले, परिस्थिती सारखीच

सरकार बदलल्यानंतर धोरणात्मक निर्णयात बदल होईल, असा अनेकांचा अंदाज होता. मुळात कुठलीही सरकार आल्यानंतर परिस्थिती सारखीच राहिली आहे. यामुळे नुकसानग्रस्त भागातील शेतकरी आजपर्यंत संकटातून बाहेर पडू शकले नाही. त्यासाठी ठोस मोबदल्याची आवश्यकता आहे.

बॉक्स

लोकप्रतिनिधी म्हणतात

जिल्ह्यात सतत नैसर्गिक प्रकोप सुरू राहत आहे. यावर्षी अतिपावसाने पिकांचे नुकसान होत आहे. या नुकसानामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. पिकांच्या नुकसानासह रस्ते, पुलाचेही नुकसान झाले. या नुकसानभरपाई व रस्ते पुल दुरुस्तीसाठी शासनाकडे निधी मिळावा, याकरीता प्रस्ताव पाठविला आहे. हा निधी पालकमंत्र्याच्या माध्यामातून मिळविण्यासाठी प्रयन्न सुरू आहे.

- बबलू देशमुख, अध्यक्ष, जिल्हा परिषद, अमरावती

कोट

माझ्या कार्यकाळात नुकसानभरपाईची मागणीसाठी संबंधित विभागामार्फत शासनदरबारी पाठपुरावा केला आहे. अशातच यात काही प्रमाणात निधी मिळाला. मात्र, उर्वरित निधीही पालकमंत्र्याच्या सहकाऱ्याने जिल्हा परिषदेला मिळेल, यात काही शंका नाही. त्यासाठी विद्यमान अध्यक्ष, पालकमंत्री हे पाठपुरावा करतील.

- नितीन गोंडाणे, माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद