शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षित गटांसाठी उमेदवारांची चाचपणी

By admin | Updated: October 13, 2016 00:26 IST

जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होणार आहे.

पेचप्रसंग : राजकीय पक्षांकडे उमेदवारांची वानवाअमरावती : जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होणार आहे. त्याअनुषंगाने झेडपीच्या सर्कल आरक्षणाचे वेध राजकीय पुढाऱ्यांना लागले होते. जिल्हा परिषदेच्या ५९ गटांचे आरक्षण ५ आॅक्टोबरला जाहीर झाल्यानंतर आता २३ राखीव गटांसाठी सक्षम उमेदवारांची राजकीय पक्षात वानवा आहे. त्यामुळे उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. आरक्षणाची सोडत काढण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे आधीच संकटात सापडलेल्या जिल्हा परिषदेतील दिग्गजांना नव्या आरक्षणाने आणखी हादरा दिला आहे. जिल्हा परिषदेत प्रतिनिधीत्व करणाऱ्या या नेत्यांवर त्यांचे हक्काचे गट आरक्षित झाल्याने राजकीय दृष्ट्या घरी बसण्याची वेळ आली आहे. तर दुसरीकडे जिल्हा परिषदेचे ५९ पैकी २३ गट अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत. त्यामुळे या गटामध्ये योग्य व सक्षम उमेदवारांचीे चाचपणी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. बहुतांश आरक्षित जिल्हा परिषदेच्या गटात राजकीय पक्षांना उमेदवार मिळत नसल्याने दुसऱ्या ठिकाणचे इच्छूक पुढारी मात्र आरक्षित गटात निवडणूक लढण्यासाठी गटात व राजकीय पक्षाचे जिल्हास्तरावरील नेत्यांकडेही तिकीटा करिता लॉबीग करीत आहे. मात्र आरक्षित गटाचे तिकीटाकरिता स्थानिक पातळीवरील उमेदवारांना प्राधान्य देण्याकडे बहूतांश राजकीय पक्षांचा कल दिसून येत आहे. जर हा पर्याय मिळालाच नाही तर मात्र दुसरीकडील इच्छुकांचा विचार होऊ शकतो. त्यादुष्टीने काही पुढाऱ्यांनी जिल्हा परिषदेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जिल्हा परिषदेच्या ५९ गटापैकी अनु.जाती ११ गट राखीव झाले. यामध्ये ६ गट महिलांसाठी आरक्षित आहेत तर ५ गट पुरूषांसाठी राखीव झाले आहेत. अनु. जमातीकरिता १२ गट राखीव ठेवण्यात आले आहेत. यात प्रत्येकी ६ महिला व पुरूषांकरिता आहेत. नामाप्र.साठी १६ जागा राखीव आहेत. यात प्रत्येकी ८ गट महिला आणि पुरूषांकरीता राखीव आहेत. याशिवाय सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण २० जागा असून यापैकी १० जागा आहे. यामध्ये राखीव गटातून निवडणूक लढविणाऱ्या इच्छूक उमेदवारांची गर्दी कमी आहे. यातूनही निवडून येणारा व जनसंपर्क असलेल्यांना तिकिट देण्याची तयारी राजकीय पक्षाची आहे. मात्र काही ठिकाणी उमेदवार मिळत नसल्याने त्या गटाकरीता उमेदवारांची चाचपणी केली जात आहेत. (प्रतिनिधी)