शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

गाव समृद्ध करण्यासाठी प्रत्येकांनी शपथ घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:39 IST

धामणगाव रेल्वे : आपल्या गावात प्रत्येकाला स्वच्छ पाणी मिळावे, प्रत्येक कुटुंबाच्या घरासमोर शोषखड्डा असावा, जैविक विविधतेची ...

धामणगाव रेल्वे : आपल्या गावात प्रत्येकाला स्वच्छ पाणी मिळावे, प्रत्येक कुटुंबाच्या घरासमोर शोषखड्डा असावा, जैविक विविधतेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, वृक्षलागवड अशा विविध उपक्रम राबवले जात असून, प्रत्येकाने गाव समृद्ध करण्यासाठी शपथ घेऊन गाव विकासात सहकार्य करण्याचे आवाहन पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी माया वानखडे यांनी केले.

धामणगाव रेल्वे पंचायत समितीत राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत आमचं गाव आमचा विकास अंतर्गत तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींच्या सचिव प्रशासकांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी गावात पशुधनाच्या संख्येच्या प्रमाणानुसार पाणवठे बांधणे, प्रत्येक कुटुंबाने कचऱ्याचे वर्गीकरण करणे, गरोदर माता स्तनपानासाठी कक्ष उभारणे, गावात जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देणे, शेतकऱ्यांना शेतीपूरक जोडधंदा करण्यासाठी दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसायाला प्राधान्य ध्यावे, मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रचार व जनजागृती, महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण देणे अशा विविध योजना या कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणार आहे. यात प्रत्येक ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा, असे मत गट विकास अधिकारी माया वानखडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती महादेव समोसे, तर प्रमुख अतिथी उपसभापती माधुरी दुधे, पंचायत समिती सदस्य शुभम भोंगे, राजकुमार केला हे होते. मास्टर ट्रेनर सुधाकर उमप, पांडुरंग उलेमाले, पंकज आमले यांनी या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. प्रशासकीय अधिकारी प्रशांत जोशी, विस्तार अधिकारी किशोर चव्हाण, मिलिंद ठुनुकले, पवार केंद्रप्रमुख दिलीप चव्हाण, अजय बावणे डी. एस. राठोड, प्रवीण आखरे, प्रवीण राठोड, खान यांच्यासह प्रशासक व ग्रामसेवक यावेळी उपस्थित होते.